शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

“भाजप नेत्यांना त्यांच्या काळातील वसुली आठवत असेल”; राणेंना शिवसेनेचे प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2021 17:11 IST

नारायण राणे यांनी केलेल्या टीकेला शिवसेनेकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांना संकटमोचन हे नाव दिले गेलेयभाजप नेत्यांना त्यांच्या काळातील वसुली आठवत असेलशिवसंपर्क अभियानामुळेच भाजपच्या नेत्यांनी जनआशीर्वाद यात्रा काढली

मुंबई: भाजपच्या केंद्रात मंत्री झालेल्या चारही नेत्यांनी आपापल्या जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात केली आहे. केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनीही गुरुवारपासून मुंबईतून आपल्या जनआशीर्वाद यात्रेला प्रारंभ केला. मुंबई विमानतळावरून सुरुवात करत कलानगर येथून दादर येथे ही यात्रा पुढे गेली. यावेळी नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत, उद्धव ठाकरे यांनी राज्याला उद्ध्वस्त केले आहे. मुंबई महापालिकेतील ३२ वर्षांचा पापाचा घडा आता फुटल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका नारायण राणे यांनी केली. याला शिवसेनेच्या आमदाराने प्रत्युत्तर देत, भाजप नेत्यांना त्यांच्या काळातील वसुली आठवत असेल, असा पलटवार केला. (abdul sattar replied to bjp narayan rane over criticism on uddhav thackeray and shiv sena) 

“छत्रपतींना स्वकीयांकडून त्रास झाला, तसा मला झाला”; सेनेला रामराम केलेल्या नेत्याचा आरोप

नारायण राणेंनी दादर येथील शिवाजी पार्क मैदानात दिवगंत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन अभिवादन केले. साहेब आज हवे होते. ते असते तर त्यांनी नक्कीच मला आशीर्वाद दिला असता आणि म्हणाले असते नारायण तू असाच पुढे जात राहा. साहेबांचा हात जरी आज माझ्या डोक्यावर नसला तरी त्यांचे आशीर्वाद नक्कीच माझ्यासोबत आहेत असे मी समजतो. स्मृतीस्थळ आणि स्मारकांवर कुणाला रोखण्याचा प्रकार कुणी करू नये. बाळासाहेब ही काही कुणाची खासगी मालमत्ता नव्हते. ते संपूर्ण राज्याचे आणि देशाचे नेते होते. त्यांच्याबद्दल प्रत्येकालाच खूप आदर आणि अभिमान आहे. त्यामुळे त्यांचे आशीर्वाद घेण्यापासून कुणी कुणाला रोखू शकत नाही, अशी टीका नारायण राणेंनी केली. याला शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

जगभरात कुठेही कोरोना लसीच्या बुस्टर डोसची सध्या गरज नाही; WHO ने केले स्पष्ट

भाजप नेत्यांना त्यांच्या काळातील वसुली आठवत असेल

देशातील अनेक नेते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची उत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून स्तुती करत आहेत. महाविकास आघाडीवर भाजप नेते वसुलीचा आरोप करत आहेत. महाविकास आघाडी सरकार शासनाचा जो महसूल आहे तो वसूल करत आहे. पण भाजप नेत्यांना त्यांच्या काळात जी वसुली होत होती, त्याची आठवण येत असेल, असा टोला लगावत मुख्यमंत्र्यांच्या शिवसंपर्क अभियानामुळेच भाजपच्या नेत्यांनी जन आशीर्वाद यात्रा काढली, असे सत्तार म्हणाले. 

“अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनींना भारतात येण्याचे आमंत्रण द्यावे”: BJP खासदार

मुख्यमंत्र्यांना संकटमोचन हे नाव दिले गेलेय

मुख्यमंत्र्यांना संकटमोचन हे नाव दिले गेले आहे. अनेक संकटे येत आहेत, तरीही ते उत्कृष्ट काम करत आहेत. मात्र, दिल्लीच्या सरकारला जनता कंटाळली आहे. त्यामुळे हे जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सर्व्हेमध्ये जनतेशी संवाद कमी झाल्याचे सांगितले गेले. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत जनताच भाजपला धडा शिकवेल, अशी टीका सत्तार यांनी केली आहे.

TATA ग्रुपचा धमाका! ‘या’ कंपनीतील कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज; २७० कोटींचा बोनस घोषित

दरम्यान, हे जनतेचं प्रेम आहे. मला केंद्रात कॅबिनेट मंत्रिपद मिळालं. पंतप्रधान मोदींसाहेबांमुळे हे पद मिळालं. अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांचे आभार. मंत्रिपद मिळाल्याच्या दीड महिन्यांनी मी महाराष्ट्रात आलो आहे. भाजपकडून आज जन आशीर्वाद यात्रा काढली आहे, असे सांगत विरोधाबाबत डाव्या उजव्याला बोलायला लावू नये, स्वत: बोलावे. आम्ही जशास तसे उत्तर देऊ शकतो. आमची तशी ख्याती आहे. मांजरीसारखे आडवे येऊ नये. येणारी मुंबई महापालिकेची निवडणूक भाजप जिंकणार. ३२ वर्षांचा पापाचा घडा फुटल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास आहे, असा हल्लाबोल नारायण राणे यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केला. 

टॅग्स :PoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाBJPभाजपाNarayan Raneनारायण राणेUddhav Thackerayउद्धव ठाकरेAbdul Sattarअब्दुल सत्तारMumbaiमुंबई