शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

७० टक्के तरुणांना हवा केवळ चार दिवसांचा आठवडा, तर पूर्णवेळ कार्यालयाबाबत ७६ टक्के कर्मचारी म्हणतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2021 10:13 IST

Four days a week : भारतातील बहुतांश तरुण कर्मचाऱ्यांना ४ दिवसांचा कामकाजी आठवडा हवा आहे. यासंबंधी करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात १० पैकी ७ तरुण कर्मचाऱ्यांनी ४ दिवसांच्या कामकाजी आठवड्याच्या बाजूने कौल दिला आहे.

नवी दिल्ली : भारतातील बहुतांश तरुण कर्मचाऱ्यांना ४ दिवसांचा कामकाजी आठवडा हवा आहे. यासंबंधी करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात १० पैकी ७ तरुण कर्मचाऱ्यांनी ४ दिवसांच्या कामकाजी आठवड्याच्या बाजूने कौल दिला आहे.‘सायट्रिक्स सिस्टिम्स’ने केलेल्या ‘बॉर्न डिजिटल इफेक्ट’ सर्वेक्षणात ही माहिती समोर आली आहे. सर्वेक्षणानुसार, भारतातील तरुण पिढी करिअरच्या बाबतीत सर्वाधिक ९४ टक्के प्राधान्य स्थैर्य आणि सुरक्षेला देते. पात्रता वृद्धी तसेच प्रशिक्षण अथवा कौशल्य वृद्धीला ९३ टक्के, तर उच्च दर्जाचे कार्यस्थळ यास ९२ टक्के प्राधान्य मिळाले आहे.  सर्वेक्षणाच्या अहवालानुसार ७६ टक्के कर्मचारी साथपश्चात काळात पूर्णवेळ कार्यालयात बसून काम करू इच्छित नाहीत. घरी बसून अथवा हायब्रिड कार्यपद्धतीला ते पसंती देत आहेत. ‘सायट्रिक्स’च्या शासकीय उपाध्यक्ष आणि मुख्य व्यक्ती अधिकारी डोना किमेल यांनी सांगितले की, ही तरुण पिढी आधीच्या पिढ्यांपासून पूर्णत: वेगळी आहे. कंपन्यांना यशस्वी व्हायचे असेल, तर या तरुणांची मूल्ये, करिअरविषयी महत्त्वाकांक्षा आणि कार्यशैली या बाबी समजून घ्याव्या लागतील. त्यांच्या विकासासाठी गुंतवणूक करावी लागेल. भारतातील ७६ टक्के बॉर्न डिजिटल कर्मचाऱ्यांना वाटते की, साथीनंतर कंपन्यांनी ५ ऐवजी ४ दिवसांचाच कामकाजी आठवडा करायला हवा. साथीमुळे बदललेल्या परिस्थितीत आठवड्यातील कामाचे दिवस कमी व्हायला हवेत, असे त्यांना वाटते. कंपनी निवडण्याच्या बाबतीत तीन घटकांची निवड करण्यास सांगितले, तेव्हा या तंत्रज्ञांनी स्वायत्तता व  विश्वसनीय वातारण,  नवता आणि शिकण्याची दिशा व वृद्धी यांना प्रत्येकी ९० टक्के प्राधान्य दिले. 

nबाॅर्न डिजिटल ही संस्था मिलेनिअल्स (१९८१ ते १९९६ दरम्यान जन्मलेले) तसेच जनरेशन झेड (१९९७ नंतर जन्मलेले) यांच्यासाठी वापरली जाते. ही पिढी संपूर्ण डिजिटल जगात विकसित झाली असून, जगातील श्रमशक्तीत तिचा वाटा मोठा आहे. 

टॅग्स :Employeeकर्मचारीjobनोकरी