शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

७० टक्के तरुणांना हवा केवळ चार दिवसांचा आठवडा, तर पूर्णवेळ कार्यालयाबाबत ७६ टक्के कर्मचारी म्हणतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2021 10:13 IST

Four days a week : भारतातील बहुतांश तरुण कर्मचाऱ्यांना ४ दिवसांचा कामकाजी आठवडा हवा आहे. यासंबंधी करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात १० पैकी ७ तरुण कर्मचाऱ्यांनी ४ दिवसांच्या कामकाजी आठवड्याच्या बाजूने कौल दिला आहे.

नवी दिल्ली : भारतातील बहुतांश तरुण कर्मचाऱ्यांना ४ दिवसांचा कामकाजी आठवडा हवा आहे. यासंबंधी करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात १० पैकी ७ तरुण कर्मचाऱ्यांनी ४ दिवसांच्या कामकाजी आठवड्याच्या बाजूने कौल दिला आहे.‘सायट्रिक्स सिस्टिम्स’ने केलेल्या ‘बॉर्न डिजिटल इफेक्ट’ सर्वेक्षणात ही माहिती समोर आली आहे. सर्वेक्षणानुसार, भारतातील तरुण पिढी करिअरच्या बाबतीत सर्वाधिक ९४ टक्के प्राधान्य स्थैर्य आणि सुरक्षेला देते. पात्रता वृद्धी तसेच प्रशिक्षण अथवा कौशल्य वृद्धीला ९३ टक्के, तर उच्च दर्जाचे कार्यस्थळ यास ९२ टक्के प्राधान्य मिळाले आहे.  सर्वेक्षणाच्या अहवालानुसार ७६ टक्के कर्मचारी साथपश्चात काळात पूर्णवेळ कार्यालयात बसून काम करू इच्छित नाहीत. घरी बसून अथवा हायब्रिड कार्यपद्धतीला ते पसंती देत आहेत. ‘सायट्रिक्स’च्या शासकीय उपाध्यक्ष आणि मुख्य व्यक्ती अधिकारी डोना किमेल यांनी सांगितले की, ही तरुण पिढी आधीच्या पिढ्यांपासून पूर्णत: वेगळी आहे. कंपन्यांना यशस्वी व्हायचे असेल, तर या तरुणांची मूल्ये, करिअरविषयी महत्त्वाकांक्षा आणि कार्यशैली या बाबी समजून घ्याव्या लागतील. त्यांच्या विकासासाठी गुंतवणूक करावी लागेल. भारतातील ७६ टक्के बॉर्न डिजिटल कर्मचाऱ्यांना वाटते की, साथीनंतर कंपन्यांनी ५ ऐवजी ४ दिवसांचाच कामकाजी आठवडा करायला हवा. साथीमुळे बदललेल्या परिस्थितीत आठवड्यातील कामाचे दिवस कमी व्हायला हवेत, असे त्यांना वाटते. कंपनी निवडण्याच्या बाबतीत तीन घटकांची निवड करण्यास सांगितले, तेव्हा या तंत्रज्ञांनी स्वायत्तता व  विश्वसनीय वातारण,  नवता आणि शिकण्याची दिशा व वृद्धी यांना प्रत्येकी ९० टक्के प्राधान्य दिले. 

nबाॅर्न डिजिटल ही संस्था मिलेनिअल्स (१९८१ ते १९९६ दरम्यान जन्मलेले) तसेच जनरेशन झेड (१९९७ नंतर जन्मलेले) यांच्यासाठी वापरली जाते. ही पिढी संपूर्ण डिजिटल जगात विकसित झाली असून, जगातील श्रमशक्तीत तिचा वाटा मोठा आहे. 

टॅग्स :Employeeकर्मचारीjobनोकरी