शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

देशातील ९५ मतदारसंघांत ७० टक्क्यांनी बजावला हक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 06:28 IST

पश्चिम बंगाल व तामिळनाडूतील हिंसाचाराच्या काही घटना वगळता १२ राज्ये व एक केंद्रशासित प्रदेशातील ९५ लोकसभा मतदारसंघांत गुरुवारी शांततेत मतदान झाले.

नवी दिल्ली : पश्चिम बंगाल व तामिळनाडूतील हिंसाचाराच्या काही घटना वगळता १२ राज्ये व एक केंद्रशासित प्रदेशातील ९५ लोकसभा मतदारसंघांत गुरुवारी शांततेत मतदान झाले. वरील दोन राज्यांत हिंसक जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार, अश्रुधूर व हवेत गोळीबार करावा लागला. या मतदारसंघांत सरासरी ६९.४0 टक्के मतदान झाले.जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरमध्ये १५ टक्के तर उधमपूरमध्ये ६२ टक्क्यांहून अधिक मतदान झाले. श्रीनगरमधील ईदगाह, खनयार, हब्बा कदल व बाटमालू या परिसरातील ९० केंद्रांवर एकाही मतदाराने मतदान केले नाही. तामिळनाडूमध्ये ७२ टक्के, आसाममध्ये ७३ टक्के, पश्चिम बंगालमध्ये ७५ टक्के, मणिपूरमध्ये ७४ टक्के तर छत्तीसगडमध्ये ७१ टक्के मतदान झाले. पण कर्नाटक, ओडिशा, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश व बिहारमध्ये मतदानाचे प्रमाण ६१ ते ६५ टक्क्यांच्या आसपासच होते.ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याच्या तक्रारी काही ठिकाणी आल्याने यंत्रे बदलून देण्यात आली. दार्जिलिंगमध्ये काहींनी ईव्हीएमची नासधूस केली. तामिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकच्या कार्यकर्त्यांनी बुथ बळकावल्याचा आरोप द्रमुकने केला. मात्र त्यात तथ्य नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.बंगालमधील एका बुथमध्ये मतदानास मज्जाव केल्याची तक्रार करीत लोकांनी रास्ता रोको केला. माकपचे उमेदवार मोहम्मद सलिम यांच्या वाहनावर तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याची तक्रार आहे. ते वाहन नंतर जाळण्यात आले. त्यामुळे मोहम्मद सलिम यांना एका मतदान केंद्रात आसरा घ्यावा लागला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकWest Bengal Lok Sabha Election 2019पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक 2019Tamil Nadu Lok Sabha Election 2019तमिळनाडू लोकसभा निवडणूक 2019Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Jammu And Kashmir Lok Sabha Election 2019जम्मू आणि काश्मीर लोकसभा निवडणूक 2019