शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

देशातील ९५ मतदारसंघांत ७० टक्क्यांनी बजावला हक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 06:28 IST

पश्चिम बंगाल व तामिळनाडूतील हिंसाचाराच्या काही घटना वगळता १२ राज्ये व एक केंद्रशासित प्रदेशातील ९५ लोकसभा मतदारसंघांत गुरुवारी शांततेत मतदान झाले.

नवी दिल्ली : पश्चिम बंगाल व तामिळनाडूतील हिंसाचाराच्या काही घटना वगळता १२ राज्ये व एक केंद्रशासित प्रदेशातील ९५ लोकसभा मतदारसंघांत गुरुवारी शांततेत मतदान झाले. वरील दोन राज्यांत हिंसक जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार, अश्रुधूर व हवेत गोळीबार करावा लागला. या मतदारसंघांत सरासरी ६९.४0 टक्के मतदान झाले.जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरमध्ये १५ टक्के तर उधमपूरमध्ये ६२ टक्क्यांहून अधिक मतदान झाले. श्रीनगरमधील ईदगाह, खनयार, हब्बा कदल व बाटमालू या परिसरातील ९० केंद्रांवर एकाही मतदाराने मतदान केले नाही. तामिळनाडूमध्ये ७२ टक्के, आसाममध्ये ७३ टक्के, पश्चिम बंगालमध्ये ७५ टक्के, मणिपूरमध्ये ७४ टक्के तर छत्तीसगडमध्ये ७१ टक्के मतदान झाले. पण कर्नाटक, ओडिशा, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश व बिहारमध्ये मतदानाचे प्रमाण ६१ ते ६५ टक्क्यांच्या आसपासच होते.ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याच्या तक्रारी काही ठिकाणी आल्याने यंत्रे बदलून देण्यात आली. दार्जिलिंगमध्ये काहींनी ईव्हीएमची नासधूस केली. तामिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकच्या कार्यकर्त्यांनी बुथ बळकावल्याचा आरोप द्रमुकने केला. मात्र त्यात तथ्य नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.बंगालमधील एका बुथमध्ये मतदानास मज्जाव केल्याची तक्रार करीत लोकांनी रास्ता रोको केला. माकपचे उमेदवार मोहम्मद सलिम यांच्या वाहनावर तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याची तक्रार आहे. ते वाहन नंतर जाळण्यात आले. त्यामुळे मोहम्मद सलिम यांना एका मतदान केंद्रात आसरा घ्यावा लागला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकWest Bengal Lok Sabha Election 2019पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक 2019Tamil Nadu Lok Sabha Election 2019तमिळनाडू लोकसभा निवडणूक 2019Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Jammu And Kashmir Lok Sabha Election 2019जम्मू आणि काश्मीर लोकसभा निवडणूक 2019