शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

"मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात धमाका; भाजपचे ६-७ खासदार पक्ष सोडणार" 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2021 19:34 IST

भाजपमध्ये गेलेले अनेक आमदार माघारी परतणार असल्याचा तृणमूलच्या मंत्र्याचा दावा

कोलकाता: विधानसभेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आल्यानं पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण तापलं आहे. सत्तेत असलेल्या तृणमूल काँग्रेससमोर भारतीय जनता पक्षानं मोठं आव्हान उभं केलं आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे. त्यातच गेल्या काही आठवड्यांपासून तृणमूल काँग्रेसला मोठी गळती लागली आहे. पक्षाच्या अनेक आमदारांनी राजीनामे देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर आता तृणमूलनं भाजपला धक्का देण्याची तयारी सुरू केली आहे.गेल्याच महिन्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनीपश्चिम बंगालचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान तृणमूलच्या अनेक आमदारांनी कमळ हाती घेतलं. भाजपच्या या राजकारणाला तृणमूलनं त्याच पद्धतीनं उत्तर देण्याची तयारी केली आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भाजपचे ६-७ खासदार तृणमूलमध्ये येतील, असा दावा तृणमूलचे नेते आणि पश्चिम बंगालचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री ज्योतिप्रिय मलिक यांनी केला.स्वामी विवेकानंद यांच्या १५७ व्या जयंतीनिमित्त उत्तर २४ परगणा जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या एका समारंभादरम्यान मलिक यांनी केलेल्या दाव्यानं खळबळ माजली आहे. मुख्यमंत्री आणि तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांचे निकटवर्तीय मानले जाणाऱ्या शुभेंदु अधिकारी यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला. त्याबद्दल विचारलं असता, ते तिथे का गेले ते मलादेखील माहीत नाही. ते भाजपमध्ये ४-५ महिने राहतील का, असा प्रश्न मला पडला आहे. कदाचित त्यांचं काम झाल्यावर ते पक्ष सोडतील, असं मलिक म्हणाले.पुढील काही महिन्यांत भाजपमध्ये एकही व्यक्ती दिसणार नाही. लवकरच ६-७ खासदार तृणमूलमध्ये येतील. मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात त्यांचा पक्षप्रवेश होईल. यामध्ये तृणमूलमधून भाजपमध्ये गेलेल्यांचादेखील समावेश आहे. तृणमूलमध्ये घरवापसी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या नेत्यांची यादी मोठी आहे. ही मंडळी लवकरच स्वगृही परततील, असा दावा मलिक यांनी केला.

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालBJPभाजपाAll India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेसMamata Banerjeeममता बॅनर्जीAmit Shahअमित शहा