शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
2
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
3
कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला
4
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार हवा, पण अर्धी अमेरिकाच नाखूश! सर्वेक्षणात झाला धक्कादायक खुलासा 
5
IND vs PAK: 'इतका राग होता तर खेळलाच कशाला?' हस्तांदोलन न करण्यावर शशी थरूर संतापले!
6
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
7
वाढीव मदतीचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर मांडू; मंत्री मकरंद पाटील यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
8
भाजपाच्या अध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर, कशी असेल पुढची वाटचाल? फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
9
भगवा कुर्ता, कपाळी भस्म; संजय दत्तने घेतलं महाकालेश्वरचं दर्शन, भक्तीत तल्लीन झाला अभिनेता
10
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
11
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला
12
Pune Crime: विजयने ११व्या मजल्यावरून मारली उडी, ससून रुग्णालयातील धक्कादायक घटना
13
अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा
14
महाराष्ट्रातल्या मनगटात इतका दम आहे म्हणून.., प्रणित मोरेची खिल्ली उडवणाऱ्यांवर भडकला डीपी
15
"मला स्वातंत्र्य हवंय"; बॉयफ्रेंडच्या मदतीने बायकोने काढला नवऱ्याचा काटा, लोकेशन सांगितलं अन्...
16
TATA Motors ला ₹२,३८,६१,६६,००,००० चं मोठं नुकसान! JLR वर सायबर हल्ला; उत्पादन थांबलं, शेअर्समध्ये मोठी घसरण
17
हृदयद्रावक! नवरात्रीत मोठी दुर्घटना; देवीच्या मंडपात अचानक पसरला करंट; २ मुलांचा मृत्यू
18
मूलबाळ नसलेल्या हिंदू महिलेच्या मृत्यूनंतर तिची संपत्ती कुणाला मिळणार?; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
19
३०० पानांमध्ये लिहिलेत बाबाचे काळे कारनामे; इंस्टिट्यूटमध्ये होता टॉर्चर चेंबर! दिल्लीत खळबळ
20
GST मध्ये आणखी कपातीचे पंतप्रधान मोदींचे संकेत; म्हणाले, "आम्ही इकडेच थांबवणार नाही..."

Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ऐतिहासिक निर्णय घेणार?; विरोधकांना पुन्हा धक्का देणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2021 07:54 IST

मोदी सरकार पुन्हा एकदा विरोधकांना धक्का देणार का? यंदा ५ ऑगस्टला मोठा ऐतिहासिक निर्णय घेण्याची सुरू केलेली परंपरा मोडणार? हे पाहणं गरजेचे आहे.

ठळक मुद्दे५ ऑगस्ट हा दिवस आहे ज्यादिवशी मोदी सरकार भाजपाच्या अजेंडा पूर्णत्वास नेतेही तीच तारीख आहे ज्यादिवशी मोदी सरकारनं संसदेत जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याचा निर्णय घेतला५ ऑगस्ट ही तीच तारीख आहे ज्यादिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराच्या स्वप्नाचा पाया रचला.

नवी दिल्ली – आज ५ ऑगस्ट. मागील २ वर्षापासून ५ ऑगस्टच्या दिवशी मोदी सरकार ऐतिहासिक निर्णय घेत आहे. २०१९ मध्ये नरेंद्र मोदींनी दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाचा कार्यभार हाती घेतला. त्यानंतर अवघ्या काही महिन्यातच नरेंद्र मोदी यांनी जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम ३७० हटवण्याचा निर्णय घेतला. मागील वर्षी ५ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अयोध्या येथे राम मंदिराचं भूमिपूजन केले. त्यामुळे यंदा ५ ऑगस्टला काय होणार अशी चर्चा सध्या सुरू आहे.

मोदी सरकार पुन्हा एकदा विरोधकांना धक्का देणार का? यंदा ५ ऑगस्टला मोठा ऐतिहासिक निर्णय घेण्याची सुरू केलेली परंपरा मोडणार? हे पाहणं गरजेचे आहे. मोदी सरकारसाठी ५ ऑगस्ट हा खास दिवस आहे. ५ ऑगस्ट हा दिवस आहे ज्यादिवशी मोदी सरकार भाजपाच्या अजेंडा पूर्णत्वास नेते. ८ ऑगस्ट २०१९ ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित केले होते. तेव्हा मोदी म्हणाले होते की, एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. अटलजी आणि कोट्यवधी भारतीयांचे स्वप्न पूर्ण झालं आहे. जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये नव्या युगाला सुरुवात झाली आहे. ही तीच तारीख आहे ज्यादिवशी मोदी सरकारनं संसदेत जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याचा निर्णय घेतला होता.

५ ऑगस्ट ही तीच तारीख आहे ज्यादिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराच्या स्वप्नाचा पाया रचला. २०२० मध्ये याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अयोध्येत जाऊन श्री राम मंदिराचं भूमिपूजन केले. यंदाच्या ५ ऑगस्ट रोजी मोदी सरकार काय करणार? या प्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विधानामुळे उत्सुकता वाढली आहे. अमित शहांच्या उपस्थितीत योगी आदित्यनाथ ज्याप्रकारे भाजपा ५ ऑगस्टचं महत्त्व सांगत होते. त्यामुळे यंदा नेमकं काय होणार? अशी चर्चा सुरु झाली.

काय म्हणाले योगी आदित्यनाथ?

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले की, ५ ऑगस्ट हा पवित्र दिवस आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. ५ ऑगस्टला सर्जिकल स्ट्राईक झालं होतं. जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवलं होतं. याच दिवशी प्रभू राम मंदिराच्या भव्यदिव्य बांधकामाचं भूमिपूजन करण्यात आले. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात ५ ऑगस्ट खूप महत्त्वाची मानली जाते. भाजपा जन्मापासून आजपर्यंत, अटलबिहारी वाजपेयींपासून नरेंद्र मोदीपर्यंत सर्वांचे ३ मोठी स्वप्न आहेत. जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवणं, अयोध्येत राम मंदिर बांधणे आणि तिसरं समान नागरिक कायदा. या ३ पैकी २ पूर्ण झाली आहेत. त्यासाठी ५ ऑगस्ट दिवस निवडण्यात आला आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा