शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
3
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
4
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
5
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
6
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
7
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
8
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
9
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
10
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
11
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
12
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
13
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
14
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
15
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
16
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
17
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
18
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
19
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
20
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 

Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ऐतिहासिक निर्णय घेणार?; विरोधकांना पुन्हा धक्का देणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2021 07:54 IST

मोदी सरकार पुन्हा एकदा विरोधकांना धक्का देणार का? यंदा ५ ऑगस्टला मोठा ऐतिहासिक निर्णय घेण्याची सुरू केलेली परंपरा मोडणार? हे पाहणं गरजेचे आहे.

ठळक मुद्दे५ ऑगस्ट हा दिवस आहे ज्यादिवशी मोदी सरकार भाजपाच्या अजेंडा पूर्णत्वास नेतेही तीच तारीख आहे ज्यादिवशी मोदी सरकारनं संसदेत जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याचा निर्णय घेतला५ ऑगस्ट ही तीच तारीख आहे ज्यादिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराच्या स्वप्नाचा पाया रचला.

नवी दिल्ली – आज ५ ऑगस्ट. मागील २ वर्षापासून ५ ऑगस्टच्या दिवशी मोदी सरकार ऐतिहासिक निर्णय घेत आहे. २०१९ मध्ये नरेंद्र मोदींनी दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाचा कार्यभार हाती घेतला. त्यानंतर अवघ्या काही महिन्यातच नरेंद्र मोदी यांनी जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम ३७० हटवण्याचा निर्णय घेतला. मागील वर्षी ५ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अयोध्या येथे राम मंदिराचं भूमिपूजन केले. त्यामुळे यंदा ५ ऑगस्टला काय होणार अशी चर्चा सध्या सुरू आहे.

मोदी सरकार पुन्हा एकदा विरोधकांना धक्का देणार का? यंदा ५ ऑगस्टला मोठा ऐतिहासिक निर्णय घेण्याची सुरू केलेली परंपरा मोडणार? हे पाहणं गरजेचे आहे. मोदी सरकारसाठी ५ ऑगस्ट हा खास दिवस आहे. ५ ऑगस्ट हा दिवस आहे ज्यादिवशी मोदी सरकार भाजपाच्या अजेंडा पूर्णत्वास नेते. ८ ऑगस्ट २०१९ ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित केले होते. तेव्हा मोदी म्हणाले होते की, एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. अटलजी आणि कोट्यवधी भारतीयांचे स्वप्न पूर्ण झालं आहे. जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये नव्या युगाला सुरुवात झाली आहे. ही तीच तारीख आहे ज्यादिवशी मोदी सरकारनं संसदेत जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याचा निर्णय घेतला होता.

५ ऑगस्ट ही तीच तारीख आहे ज्यादिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराच्या स्वप्नाचा पाया रचला. २०२० मध्ये याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अयोध्येत जाऊन श्री राम मंदिराचं भूमिपूजन केले. यंदाच्या ५ ऑगस्ट रोजी मोदी सरकार काय करणार? या प्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विधानामुळे उत्सुकता वाढली आहे. अमित शहांच्या उपस्थितीत योगी आदित्यनाथ ज्याप्रकारे भाजपा ५ ऑगस्टचं महत्त्व सांगत होते. त्यामुळे यंदा नेमकं काय होणार? अशी चर्चा सुरु झाली.

काय म्हणाले योगी आदित्यनाथ?

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले की, ५ ऑगस्ट हा पवित्र दिवस आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. ५ ऑगस्टला सर्जिकल स्ट्राईक झालं होतं. जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवलं होतं. याच दिवशी प्रभू राम मंदिराच्या भव्यदिव्य बांधकामाचं भूमिपूजन करण्यात आले. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात ५ ऑगस्ट खूप महत्त्वाची मानली जाते. भाजपा जन्मापासून आजपर्यंत, अटलबिहारी वाजपेयींपासून नरेंद्र मोदीपर्यंत सर्वांचे ३ मोठी स्वप्न आहेत. जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवणं, अयोध्येत राम मंदिर बांधणे आणि तिसरं समान नागरिक कायदा. या ३ पैकी २ पूर्ण झाली आहेत. त्यासाठी ५ ऑगस्ट दिवस निवडण्यात आला आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा