शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

"भाजपाच्या काळात खनिजकर्म महामंडळामध्ये ४३ हजार कोटींचा घोटाळा"; सीबीआय, ईडी चौकशीची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2021 19:06 IST

NCP's serious allegations against BJP: भाजपाच्या काळात खनिजकर्म महामंडळामध्ये तब्बल ४३ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रशांत पवार यांनी केला आहे.

ठळक मुद्देभाजपाच्या सत्ताकाळात खनिजकर्म महामंडळातील कोल वॉशरिजमध्ये ४३ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप हिंद एनर्जी आणि अरिंहंत या दोन कंपन्यांना काम दिले गेले, त्यांनी १५ लाख टन कोळसा नेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रशांत पवार यांनी केला आरोप

मुंबई - राज्यात सध्या सीबीआय आणि ईडीच्या चौकशीवरून सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधातील भाजपामध्येराजकारण रंगलेले आहे. सत्ताधारी पक्षातील अनेक नेते हे सीबीआय आणि ईडी ह्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. दरम्यान, आता महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनेभाजपावर घोटाळ्याच मोठा आरोप केला आहे. भाजपाच्या काळात खनिजकर्म महामंडळामध्ये तब्बल ४३ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रशांत पवार यांनी केला आहे. (43,000 crore scam in Minerals Corporation during BJP rule; NCP demand's  CBI, ED inquiry)

भाजपाच्या सत्ताकाळात खनिजकर्म महामंडळातील कोल वॉशरिजमध्ये ४३ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करत प्रशांत पवार यांनी या प्रकरणाची सीबीआय आणि ईडी चौकशी करण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले की, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खनिजकर्म महामंडळाच्या टेंडर प्रक्रियेत झालेल्या गैरव्यवहाराबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. त्यासाठी मी  त्यांचे अभिनंदन करतो. हा घोटाळा मी डिसेंबर २०२० मध्ये मी जय जवानच्या मंचावर समोर आणलं होतं. नानाभाऊंनी घोटाळा समोर आणला नाही. मात्र यातील कंपन्यांमा वेगळ्या पद्धतीने क्वालिफाय केलं का याबाबत त्यांनी शंका घेतली. हिंद एनर्जी आणि अरिंहंत या दोन कंपन्यांना काम दिले गेले, त्यांनी १५ लाख टन कोळसा नेला. या क्वालिजमध्ये ४३ हजार कोटींचा घोटाळा झाला आहे. भाजपाच्या काळात हे कोल ब्ल़ॉक मिळाले होते, असा आरोप पवार यांनी केला.

ते पुढे म्हणाले की, दोन कंपन्यांना १५ लाख टन कोळसा कोल  गेला आहे. त्यातील हिंद एनर्जीचा इतिहास काढला तर ईडीही आश्चर्यचकीत होईल. हे मोठे प्रकरण आहे. याच्यावर ईडी चौकशी लावली पाहिजे. हे प्रकरण समोर आणलं तर किती लोक तुरुंगात जातील हे कुणालाच कळणार नाही, असा दावाही त्यांनी केला. 

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा