शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

"भाजपाच्या काळात खनिजकर्म महामंडळामध्ये ४३ हजार कोटींचा घोटाळा"; सीबीआय, ईडी चौकशीची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2021 19:06 IST

NCP's serious allegations against BJP: भाजपाच्या काळात खनिजकर्म महामंडळामध्ये तब्बल ४३ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रशांत पवार यांनी केला आहे.

ठळक मुद्देभाजपाच्या सत्ताकाळात खनिजकर्म महामंडळातील कोल वॉशरिजमध्ये ४३ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप हिंद एनर्जी आणि अरिंहंत या दोन कंपन्यांना काम दिले गेले, त्यांनी १५ लाख टन कोळसा नेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रशांत पवार यांनी केला आरोप

मुंबई - राज्यात सध्या सीबीआय आणि ईडीच्या चौकशीवरून सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधातील भाजपामध्येराजकारण रंगलेले आहे. सत्ताधारी पक्षातील अनेक नेते हे सीबीआय आणि ईडी ह्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. दरम्यान, आता महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनेभाजपावर घोटाळ्याच मोठा आरोप केला आहे. भाजपाच्या काळात खनिजकर्म महामंडळामध्ये तब्बल ४३ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रशांत पवार यांनी केला आहे. (43,000 crore scam in Minerals Corporation during BJP rule; NCP demand's  CBI, ED inquiry)

भाजपाच्या सत्ताकाळात खनिजकर्म महामंडळातील कोल वॉशरिजमध्ये ४३ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करत प्रशांत पवार यांनी या प्रकरणाची सीबीआय आणि ईडी चौकशी करण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले की, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खनिजकर्म महामंडळाच्या टेंडर प्रक्रियेत झालेल्या गैरव्यवहाराबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. त्यासाठी मी  त्यांचे अभिनंदन करतो. हा घोटाळा मी डिसेंबर २०२० मध्ये मी जय जवानच्या मंचावर समोर आणलं होतं. नानाभाऊंनी घोटाळा समोर आणला नाही. मात्र यातील कंपन्यांमा वेगळ्या पद्धतीने क्वालिफाय केलं का याबाबत त्यांनी शंका घेतली. हिंद एनर्जी आणि अरिंहंत या दोन कंपन्यांना काम दिले गेले, त्यांनी १५ लाख टन कोळसा नेला. या क्वालिजमध्ये ४३ हजार कोटींचा घोटाळा झाला आहे. भाजपाच्या काळात हे कोल ब्ल़ॉक मिळाले होते, असा आरोप पवार यांनी केला.

ते पुढे म्हणाले की, दोन कंपन्यांना १५ लाख टन कोळसा कोल  गेला आहे. त्यातील हिंद एनर्जीचा इतिहास काढला तर ईडीही आश्चर्यचकीत होईल. हे मोठे प्रकरण आहे. याच्यावर ईडी चौकशी लावली पाहिजे. हे प्रकरण समोर आणलं तर किती लोक तुरुंगात जातील हे कुणालाच कळणार नाही, असा दावाही त्यांनी केला. 

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा