शहरं
Join us  
Trending Stories
1
'...अन्यथा मी राजकारण सोडेन', वायभासे कुटुंबियांचे सांत्वन करताना पंकजा मुंडेंना अश्रू अनावर
2
'जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद ठेचून काढा', गृहमंत्री अमित शाह यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश
3
लोकसभेत बालेकिल्ले राखले, आता विधानसभेच्या तयारीला लागा; CM शिंदेंचे शिवसैनिकांना निर्देश
4
“NDA सरकार कोसळून इंडिया आघाडीचे सरकार येईल, प्रणिती शिंदे मंत्री होतील”; काँग्रेसचा दावा
5
वायकरांच्या मुलीकडेही मोबाईल, तक्रार आमची, मध्येच तहसीलदार कुठून आले; उमेदवार शाह यांचा गौप्यस्फोट
6
निखळ सौंदर्य.. निरागस हास्य.. पिवळ्या फ्लोरल फ्रॉकमध्ये आलिया भटचा 'क्यूट' लूक (Photos)
7
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
8
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
9
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
10
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
11
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
12
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
13
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
14
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
15
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
16
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा
17
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
18
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
19
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
20
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल

‘हम दो, हमारे दो’ हेच मोदी यांचे सरकार; राहुल गांधी यांचा लोकसभेत घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2021 3:52 AM

तुम्ही आपल्या भाषणात फक्त केंद्रीय अर्थसंकल्पाबद्दलच मते मांडा, अशी सूचना लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधी यांना वारंवार केली. पण त्याकडे दुर्लक्ष करून राहुल गांधी यांनी नवे कृषी कायदे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात टीकेची झोड उठविली.

नवी दिल्ली : पूर्वी हम दो, हमारे दो असा नारा होता. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार हे ‘हम दो, हमारे दो‘चे सरकार आहे. ते कोण आहेत हे सर्वांना माहिती आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी लोकसभेत केली.तुम्ही आपल्या भाषणात फक्त केंद्रीय अर्थसंकल्पाबद्दलच मते मांडा, अशी सूचना लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधी यांना वारंवार केली. पण त्याकडे दुर्लक्ष करून राहुल गांधी यांनी नवे कृषी कायदे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात टीकेची झोड उठविली.राहुल गांधी यांच्या हम दो हमारे दो या उद्गारांवर केंद्रीय संसदीय कामकाज खात्याचे राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी आव्हान दिले की, राहुल गांधी यांनी उद्योगपती अदानी व अंबानी यांच्या संदर्भात हम दो, हमारे दो असा उल्लेख केला आहे. हे उद्योगपती व मोदी सरकारबद्दल केलेले आरोप सिद्ध होतील, असे पुरावेही राहुल गांधी यांनी सादर करावेत.राहुल गांधी म्हणाले की, नव्या कृषी कायद्यांमधील पहिला कायदा हा देशातील मंडईव्यवस्था उद्ध्वस्त करणारा आहे. शेतकऱ्यांकडून उद्योजक किंवा कंपन्या अमर्याद स्वरूपात शेतीमाल खरेदी करून त्याची हवा तितका काळ साठवणूक करू शकतील, अशी मुभा दुसऱ्या कृषी कायद्याद्वारे मिळाली आहे. शेतकऱ्यांना हक्काच्या गोष्टी कॉपोर्रेट कंपन्यांकडून मागण्यास तिसऱ्या कृषी कायद्याद्वारे प्रतिबंध करण्यात आला आहे.शेतकऱ्यांपुढे तीन पर्याय भूक, बेकारी, आत्महत्याराहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील शेतकऱ्यांपुढे भूक, बेकारी, आत्महत्या हे तीनच पर्याय शिल्लक ठेवले आहेत. नवे कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे नाहीत.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी