शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
5
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
6
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
7
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
8
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
9
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
10
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
11
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
12
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
13
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
14
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
15
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
16
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
17
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
18
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
19
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या

नोटाबंदीमुळे 4 कोटी लोक बेरोजगार झाले- राज ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2019 21:11 IST

नोटाबंदीमुळे 4 कोटी नोकऱ्या गेल्या, शेकडो लोकांचा रांगेत मृत्यू झाला

मुंबई- मनसे प्रमुख राज ठाकरेंनी मोदी आणि भाजपा सरकारच्या निर्णयावर टीका केली आहे. नोटाबंदीमुळे 4 कोटी नोकऱ्या गेल्या, शेकडो लोकांचा रांगेत मृत्यू झाला, पण माध्यमांवर दबाव टाकून त्यांना ह्या सगळ्या बातम्या दडपायला लावल्या.  त्यामुळे प्रसारमाध्यम आणि लोकांपर्यंत बातम्या पोहोचत नव्हत्या. संपादकांचं, चॅनेलचं स्वातंत्र्य काढून घेतलं. हे कोणाचं सरकार आहे. ही भीषण परिस्थिती सध्या आहे, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत. नोटाबंदीनंतर देशात 4 कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या, 99.3%पैसे बँकेत परत आले. म्हणजे नोटबंदी ही अपयशी ठरली. त्यावेळी मोदी म्हणाले होते की, जर 50 दिवसांत सगळं सुरळीत नाही झालं तर मला कोणत्याही चौकात उभं करा आणि मला हवी त्या शिक्षा द्या. मोदी तुम्ही चौक ठरवा आता, शिक्षा द्यायला आम्ही येतो, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत.मला कोणाच्या खासगी आयुष्यात जायचं नाही, पण नरेंद्र मोदी वर्षातून एकदा आईला भेटायला जातात, त्यावेळी मीडियाला घेऊन का जायचं? नोटाबंदीच्या वेळेला स्वतःच्या आईला रांगेत उभं केलं. भावनिक राजकारण करायचं म्हणून कुठल्या थरापर्यंत जाणार तुम्ही? ह्यातून मोदींचा दृष्टिकोन कळतो, अशी घणाघाती टीका राज ठाकरेंनी केली आहे.  काँग्रेसच्या जुन्या योजनांची नावं बदलून त्यांनी भाजपाच्या स्वतःच्या योजना म्हणून त्या घोषित केल्या. काँग्रेसला नेहरू गांधींच्या पलीकडे नावं देता येत नाहीत, भाजपला पंतप्रधान किंवा भाजपा हीच का नावं सुचतात. आपल्या देशात इतकी कर्तृत्ववान माणसं जन्माला आली, पण त्यांची नावं प्रकल्पांना का देत नाही, असा सवालही राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे. नमामि गंगेसाठी 20 हजार कोटी खर्च करू म्हणाले, गंगा साफ झाली नाही पण पैसे कुठे गेले हे कळलं नाही. जी. डी. अग्रवाल गंगा स्वच्छ व्हावी म्हणून उपोषणाला बसले होते, पण त्यांना एकदाही भेटायला पंतप्रधान गेले नाहीत. शेवटी 111 दिवस उपोषण करून ते वारले. गंगा स्वच्छतेसाठी नेमलेल्या कमिटीच्या बैठकीला आजपर्यंत मोदी एकदाही उपस्थित राहिलेले नाहीत, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत. मोदींनी सत्तेत आल्यावर आधार कार्ड योजनेचं जोरदार समर्थन केलं, पण हेच मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना म्हणाले होते की, आधार कार्डचा कोणीही गैरवापर करू शकेल, घुसखोरांचं फावेल, लोकांना मिळणारे फायदे स्वतः लुबाडतील. एवढा विरोध होता मग आधार कार्ड योजना का राबवली?, असा प्रश्नही राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे. मी काही वर्षांपूर्वी बोललो होतो की नरेंद्र मोदी निवडणुका जिंकण्यासाठी युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण करतील. तेच त्यांनी केलं.पुलवामा हल्ल्यानंतर मोदींनी युद्धसदृश्य परिस्थती निर्माण केली. सैनिकांच्या हौतात्म्याचा फायदा करून घ्यायचा प्रयत्न मोदींनी केला. जवान अत्यंत खडतर परिस्थितीत देशाच्या सीमेचं रक्षण करत असतात, पण त्यांच्यासाठी काही करायला मोदींना गेल्या 5 वर्षांत सुचलं नाही. पण त्यांच्या शौर्यावर नरेंद्र मोदी निवडणुका जिंकण्याची स्वप्न बघत आहेत. ह्याची लाज कशी वाटत नाही, असंही राज ठाकरेंनी सांगितलं. आमच्या जवानांवरती काश्मीरमध्ये हल्ले होत होते, स्थानिक लोकं त्यांच्यावर हल्ले करत होते, पण जवान काही करू शकत नाही कारण त्यांना माहीत आहे, आपल्यावर कारवाई होणार आहे. नरेंद्र मोदी नवाज शरीफांना भेटायला, केक भरवायला गेले आणि त्यानंतर लगेच पठाणकोट हल्ला झाला, उरी झालं. अमित शाहांनी एअरस्ट्राईक झाल्यावर घोषित केलं की, आम्ही 250 माणसं मारली. अमित शाह गेले होते का को पायलट म्हणून? एअर चीफ मार्शल म्हणतात की आम्हाला किती माणसं गेली ह्याचा आकडा देता येणार नाही, मग भाजपाने कुठून हा शोध लावला, असं म्हणत राज ठाकरेंनी अमित शाहांवरही निशाणा साधला.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदीNote Banनोटाबंदी