शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

2 Years of Modi 2.0: २०२४ ला पुन्हा नरेंद्र मोदीच पंतप्रधान असावेत का?; बघा, किती टक्के जनता म्हणते 'हो'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2021 11:15 IST

Lokmat Survey: २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत देशाने पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर भरवसा ठेऊन दुसऱ्यांचा सत्ता भाजपाच्या हाती दिली.

ठळक मुद्देविरोधकांनी आक्रमकपणे सरकारच्या धोरणांवर टीका करणं सुरू केले आहे.पश्चिम बंगालमध्ये साम-दाम-दंड भेद वापरूनही भाजपाच्या पदरी निराशा पडली आहे. मोदी सरकारच्या कारर्किर्दीला ७ वर्ष पूर्ण, वाचकांनी मांडली मते

मुंबई – २०१४ मध्ये नरेंद्र मोदी लाटेने काँग्रेसचं सरकार उद्ध्वस्त केले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यशानं भारतीय जनता पार्टी देशभरात सर्वात मोठी पार्टी बनली. एकेकाळी याच भाजपाचे लोकसभेत २ खासदार निवडून आले होते परंतु आता लोकसभेत भाजपा नंबर एक आहे. २०१४ पासून देशात मोदी सरकारच्या कामगिरीचा आढावा घेतल्यास काश्मीरमधील कलम ३७० हटवणे, नागरिकत्व सुधारणा कायदा, सर्जिकल स्ट्राईक, जीएसटी, कृषी कायदे असे धाडसीचे निर्णय घेतले.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत देशाने पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर भरवसा ठेऊन दुसऱ्यांचा सत्ता भाजपाच्या हाती दिली. सध्या देशात कोरोनाचं वातावरण आहे. यातच काही प्रमाणात विरोधकांनी आक्रमकपणे सरकारच्या धोरणांवर टीका करणं सुरू केले आहे. स्थानिक निवडणुकींमध्ये भाजपाला फटका बसत आहे. पश्चिम बंगालमध्ये साम-दाम-दंड भेद वापरूनही भाजपाच्या पदरी निराशा पडली आहे. यातच मोदी सरकारच्या कारकिर्दीला आज ७ वर्ष पूर्ण होत आहेत.

या ७ वर्षाच्या मोदी सरकारच्या कामगिरीबद्दल लोकमत समुहाने वाचकांचा ऑनलाईन सर्व्हे घेतला. या सर्व्हेनुसार मोदी सरकारच्या आतापर्यंतच्या कामगिरीबद्दल किती स्टार द्याल, येत्या काही दिवसांत लोकसभा निवडणुका झाल्या तर भाजपाला किती जागा मिळतील? २०२४ मध्ये पुन्हा नरेंद्र मोदीच पंतप्रधान असावेत असं वाटतं का? मोदी सरकार कोरोनाचं संकट योग्यरित्या हाताळत आहे का? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला लॉकडाऊनचा निर्णय योग्य होता की नाही? असे विविध प्रश्न वाचकांना विचारण्यात आले होते.

या मोदी सरकारच्या आत्तापर्यंतच्या कामगिरीला तुम्ही किती स्टार द्याल? या प्रश्नावर ३६.४२ टक्के लोकांनी १ स्टार दिला आहे. म्हणजेच ३६.४२ टक्के लोक मोदी सरकारच्या कामगिरीवर समाधानी नाहीत. १४.९३ टक्के लोकांनी २ स्टार दिलेत, १०.७८ टक्के लोकांनी ३ स्टार दिलेत. १४.३७ टक्के लोकांनी ४ स्टार दिलेत. तर २३.५० टक्के लोकांनी ५ स्टार देत मोदी सरकारच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले आहे.

सध्या लोकसभेत भाजपाचे स्वत:च्या बळावर ३०३ खासदार निवडून आले आहेत. बहुमतासाठी भाजपाला इतर कोणत्याही पक्षाची गरज भासणार नाही. त्यामुळे अकाली दल आणि शिवसेना हे पक्ष एनडीए(NDA)तून बाहेर पडल्यानंतरही मोदी सरकारला कोणताही धोका नाही. परंतु येत्या काही दिवसांत लोकसभा निवडणुका झाल्यास भाजपाला किती जागा मिळतील? असा प्रश्न वाचकांना केला होता. त्यावर अत्यंत चुरस पाहायला मिळाली. जवळपास २७.९५ टक्के लोकांनी ०-१०० यामध्ये जागा मिळतील असा दावा केला तर २७.१९ टक्के लोकांनी ३०१-४०० पर्यंत जागा मिळतील असा विश्वास व्यक्त केला. तर २५.९१ टक्के लोकांनी भाजपाला १०१-२०० या दरम्यान जागा मिळतील असं म्हटलं आहे. त्याचसोबत १८.९५ टक्के लोकांनी २०१-३०० यामध्ये भाजपाला जागा मिळतील असं सांगितले आहे.

सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे २०२४ मध्ये पुन्हा एकदा नरेंद्र मोदीच पंतप्रधान असावेत, असं वाटतं का? असा प्रश्न वाचकांना केला होता. त्यावर ५२.५९ टक्के लोकांनी नकार दिला आहे आणि ४३.६१ टक्के लोकांना नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान व्हावेत असं वाटत आहे तर ३.८१ टक्के लोकांनी तटस्थ भूमिका घेतली आहे. त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीनंतर नरेंद्र मोदीच पंतप्रधान बनणार का? हे येणारा काळच सांगू शकेल.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा