शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
4
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
5
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
6
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
7
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
8
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
9
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
10
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
11
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
12
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
13
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
14
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
15
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
16
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
17
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
18
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
19
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
20
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल

2 Years of Modi 2.0: २०२४ ला पुन्हा नरेंद्र मोदीच पंतप्रधान असावेत का?; बघा, किती टक्के जनता म्हणते 'हो'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2021 11:15 IST

Lokmat Survey: २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत देशाने पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर भरवसा ठेऊन दुसऱ्यांचा सत्ता भाजपाच्या हाती दिली.

ठळक मुद्देविरोधकांनी आक्रमकपणे सरकारच्या धोरणांवर टीका करणं सुरू केले आहे.पश्चिम बंगालमध्ये साम-दाम-दंड भेद वापरूनही भाजपाच्या पदरी निराशा पडली आहे. मोदी सरकारच्या कारर्किर्दीला ७ वर्ष पूर्ण, वाचकांनी मांडली मते

मुंबई – २०१४ मध्ये नरेंद्र मोदी लाटेने काँग्रेसचं सरकार उद्ध्वस्त केले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यशानं भारतीय जनता पार्टी देशभरात सर्वात मोठी पार्टी बनली. एकेकाळी याच भाजपाचे लोकसभेत २ खासदार निवडून आले होते परंतु आता लोकसभेत भाजपा नंबर एक आहे. २०१४ पासून देशात मोदी सरकारच्या कामगिरीचा आढावा घेतल्यास काश्मीरमधील कलम ३७० हटवणे, नागरिकत्व सुधारणा कायदा, सर्जिकल स्ट्राईक, जीएसटी, कृषी कायदे असे धाडसीचे निर्णय घेतले.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत देशाने पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर भरवसा ठेऊन दुसऱ्यांचा सत्ता भाजपाच्या हाती दिली. सध्या देशात कोरोनाचं वातावरण आहे. यातच काही प्रमाणात विरोधकांनी आक्रमकपणे सरकारच्या धोरणांवर टीका करणं सुरू केले आहे. स्थानिक निवडणुकींमध्ये भाजपाला फटका बसत आहे. पश्चिम बंगालमध्ये साम-दाम-दंड भेद वापरूनही भाजपाच्या पदरी निराशा पडली आहे. यातच मोदी सरकारच्या कारकिर्दीला आज ७ वर्ष पूर्ण होत आहेत.

या ७ वर्षाच्या मोदी सरकारच्या कामगिरीबद्दल लोकमत समुहाने वाचकांचा ऑनलाईन सर्व्हे घेतला. या सर्व्हेनुसार मोदी सरकारच्या आतापर्यंतच्या कामगिरीबद्दल किती स्टार द्याल, येत्या काही दिवसांत लोकसभा निवडणुका झाल्या तर भाजपाला किती जागा मिळतील? २०२४ मध्ये पुन्हा नरेंद्र मोदीच पंतप्रधान असावेत असं वाटतं का? मोदी सरकार कोरोनाचं संकट योग्यरित्या हाताळत आहे का? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला लॉकडाऊनचा निर्णय योग्य होता की नाही? असे विविध प्रश्न वाचकांना विचारण्यात आले होते.

या मोदी सरकारच्या आत्तापर्यंतच्या कामगिरीला तुम्ही किती स्टार द्याल? या प्रश्नावर ३६.४२ टक्के लोकांनी १ स्टार दिला आहे. म्हणजेच ३६.४२ टक्के लोक मोदी सरकारच्या कामगिरीवर समाधानी नाहीत. १४.९३ टक्के लोकांनी २ स्टार दिलेत, १०.७८ टक्के लोकांनी ३ स्टार दिलेत. १४.३७ टक्के लोकांनी ४ स्टार दिलेत. तर २३.५० टक्के लोकांनी ५ स्टार देत मोदी सरकारच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले आहे.

सध्या लोकसभेत भाजपाचे स्वत:च्या बळावर ३०३ खासदार निवडून आले आहेत. बहुमतासाठी भाजपाला इतर कोणत्याही पक्षाची गरज भासणार नाही. त्यामुळे अकाली दल आणि शिवसेना हे पक्ष एनडीए(NDA)तून बाहेर पडल्यानंतरही मोदी सरकारला कोणताही धोका नाही. परंतु येत्या काही दिवसांत लोकसभा निवडणुका झाल्यास भाजपाला किती जागा मिळतील? असा प्रश्न वाचकांना केला होता. त्यावर अत्यंत चुरस पाहायला मिळाली. जवळपास २७.९५ टक्के लोकांनी ०-१०० यामध्ये जागा मिळतील असा दावा केला तर २७.१९ टक्के लोकांनी ३०१-४०० पर्यंत जागा मिळतील असा विश्वास व्यक्त केला. तर २५.९१ टक्के लोकांनी भाजपाला १०१-२०० या दरम्यान जागा मिळतील असं म्हटलं आहे. त्याचसोबत १८.९५ टक्के लोकांनी २०१-३०० यामध्ये भाजपाला जागा मिळतील असं सांगितले आहे.

सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे २०२४ मध्ये पुन्हा एकदा नरेंद्र मोदीच पंतप्रधान असावेत, असं वाटतं का? असा प्रश्न वाचकांना केला होता. त्यावर ५२.५९ टक्के लोकांनी नकार दिला आहे आणि ४३.६१ टक्के लोकांना नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान व्हावेत असं वाटत आहे तर ३.८१ टक्के लोकांनी तटस्थ भूमिका घेतली आहे. त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीनंतर नरेंद्र मोदीच पंतप्रधान बनणार का? हे येणारा काळच सांगू शकेल.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा