शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

१७४ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; मात्र राजकीय नेत्यांचे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 06:40 IST

निवडणुकीच्या रणधुमाळीत मतदारांवर आश्वासनांची खैरात केली जात असली, तरी नापिकी व कर्जाच्या बोजामुळे खचलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकलेला नाही.

औरंगाबाद/नाशिक/नागपूर : निवडणुकीच्या रणधुमाळीत मतदारांवर आश्वासनांची खैरात केली जात असली, तरी नापिकी व कर्जाच्या बोजामुळे खचलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकलेला नाही. निवडणुकीचा बिगुल वाजल्यापासून राज्यातील तब्बल १७४ शेतकºयांनी जीवनयात्रा संपविली असून, प्रचाराच्या गलबल्यात त्याकडे लक्ष द्यायलाही कोणाला वेळ मिळालेला नाही.सर्व राजकीय पक्षांचे पुढारी लोकांकडे मतांचा जोगवा मागत फिरत असताना, नापिकी, शेतमालाला मातीमोल भाव, कर्जबाजारीपणातून होत असलेल्या शेतकरी आत्महत्यांचे मात्र कोणालाच देणेघेणे नसल्याची स्थिती आहे. दुष्काळाचे भीषण चटके सोसाव्या लागणाºया मराठवाड्यात ९१ शेतकºयांनी महिनाभरात मृत्यूला कवटाळले. त्यानंतर, विदर्भात ४९ शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. खान्देशात १५ शेतकºयांनी मृत्यूला कवटाळले. बागायती पट्टा म्हणून ओळखल्या जाणाºया नाशिकमध्येही ९ शेतकºयांनी जीवन संपविले. मराठवाड्यात १ जानेवारी ते १४ एप्रिलपर्यंत २२० शेतकºयांनी आत्महत्या केली आहे. १४८ शेतकºयांना सरकारी मदत मिळाली असून, ५४ प्रकरणे अपात्र आहेत, तर १८ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. १ ते ३१ मार्चपर्यंत ६९ शेतकºयांनी आत्महत्या केली असून, मागील पंधरवड्यात सुमारे २२ शेतकºयांनी आत्महत्या केली आहे.राज्य सरकारने अटी-निकषात शेतकºयांचे सरसकट दीड लाख रुपयांचे कर्ज माफ केले, तर केंद्र सरकारनेही चालू वर्षापासून शेतकºयांना दरवर्षी सहा हजार रुपये मदत देण्याचे जाहीर केले आहे. तरीही शेतकºयांना दिलासा मिळालेला नाही. यंदा दुष्काळामुळे शेतीला मोठा फटका बसला आहे. जनावरांच्या चारा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पश्चिम वºहाडात अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यांत महिनाभरात १६ शेतकºयांनी जीवनयात्रा संपविली. जानेवारीपासून अहमदनगर जिल्ह्यातील ४० शेतकºयांनी आत्महत्या केलेल्या आहेत.>शेतकºयांचा विसरराजकारण्यांची ९८ टक्के भाषणे एकमेकांवर आरोप करणारी आहेत. या रणधुमाळीत शेतकºयांच्या प्रश्नांचा विसर पडला आहे. शेतकºयांची आत्महत्या, त्यांच्या आर्थिक प्रश्नांना बगल दिली जात आहे.- किशोर तिवारी,अध्यक्ष, वसंतराव नाईकशेती स्वावलंबन मिशन>रोजच पुलवामाराज्यात दिवसाकाठी ४३ शेतकरी आत्महत्या करीत असल्यामुळे येथे रोजच पुलवामा होतो आहे. काँग्रेसने शेतकरीविरोधात केलेले कायदे भाजपने रद्द केले नाहीत. ते दोन्ही पक्ष शेतकरी आत्महत्यांना जबाबदार आहेत. शेतकºयांचे मारेकरी हेच पक्ष आहेत, म्हणून ते तोंड लपवीत आहेत. - अमर हबीब,शेतकरी पुत्र आंदोलन

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक