शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

१७४ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; मात्र राजकीय नेत्यांचे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 06:40 IST

निवडणुकीच्या रणधुमाळीत मतदारांवर आश्वासनांची खैरात केली जात असली, तरी नापिकी व कर्जाच्या बोजामुळे खचलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकलेला नाही.

औरंगाबाद/नाशिक/नागपूर : निवडणुकीच्या रणधुमाळीत मतदारांवर आश्वासनांची खैरात केली जात असली, तरी नापिकी व कर्जाच्या बोजामुळे खचलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकलेला नाही. निवडणुकीचा बिगुल वाजल्यापासून राज्यातील तब्बल १७४ शेतकºयांनी जीवनयात्रा संपविली असून, प्रचाराच्या गलबल्यात त्याकडे लक्ष द्यायलाही कोणाला वेळ मिळालेला नाही.सर्व राजकीय पक्षांचे पुढारी लोकांकडे मतांचा जोगवा मागत फिरत असताना, नापिकी, शेतमालाला मातीमोल भाव, कर्जबाजारीपणातून होत असलेल्या शेतकरी आत्महत्यांचे मात्र कोणालाच देणेघेणे नसल्याची स्थिती आहे. दुष्काळाचे भीषण चटके सोसाव्या लागणाºया मराठवाड्यात ९१ शेतकºयांनी महिनाभरात मृत्यूला कवटाळले. त्यानंतर, विदर्भात ४९ शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. खान्देशात १५ शेतकºयांनी मृत्यूला कवटाळले. बागायती पट्टा म्हणून ओळखल्या जाणाºया नाशिकमध्येही ९ शेतकºयांनी जीवन संपविले. मराठवाड्यात १ जानेवारी ते १४ एप्रिलपर्यंत २२० शेतकºयांनी आत्महत्या केली आहे. १४८ शेतकºयांना सरकारी मदत मिळाली असून, ५४ प्रकरणे अपात्र आहेत, तर १८ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. १ ते ३१ मार्चपर्यंत ६९ शेतकºयांनी आत्महत्या केली असून, मागील पंधरवड्यात सुमारे २२ शेतकºयांनी आत्महत्या केली आहे.राज्य सरकारने अटी-निकषात शेतकºयांचे सरसकट दीड लाख रुपयांचे कर्ज माफ केले, तर केंद्र सरकारनेही चालू वर्षापासून शेतकºयांना दरवर्षी सहा हजार रुपये मदत देण्याचे जाहीर केले आहे. तरीही शेतकºयांना दिलासा मिळालेला नाही. यंदा दुष्काळामुळे शेतीला मोठा फटका बसला आहे. जनावरांच्या चारा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पश्चिम वºहाडात अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यांत महिनाभरात १६ शेतकºयांनी जीवनयात्रा संपविली. जानेवारीपासून अहमदनगर जिल्ह्यातील ४० शेतकºयांनी आत्महत्या केलेल्या आहेत.>शेतकºयांचा विसरराजकारण्यांची ९८ टक्के भाषणे एकमेकांवर आरोप करणारी आहेत. या रणधुमाळीत शेतकºयांच्या प्रश्नांचा विसर पडला आहे. शेतकºयांची आत्महत्या, त्यांच्या आर्थिक प्रश्नांना बगल दिली जात आहे.- किशोर तिवारी,अध्यक्ष, वसंतराव नाईकशेती स्वावलंबन मिशन>रोजच पुलवामाराज्यात दिवसाकाठी ४३ शेतकरी आत्महत्या करीत असल्यामुळे येथे रोजच पुलवामा होतो आहे. काँग्रेसने शेतकरीविरोधात केलेले कायदे भाजपने रद्द केले नाहीत. ते दोन्ही पक्ष शेतकरी आत्महत्यांना जबाबदार आहेत. शेतकºयांचे मारेकरी हेच पक्ष आहेत, म्हणून ते तोंड लपवीत आहेत. - अमर हबीब,शेतकरी पुत्र आंदोलन

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक