शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

१७४ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; मात्र राजकीय नेत्यांचे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 06:40 IST

निवडणुकीच्या रणधुमाळीत मतदारांवर आश्वासनांची खैरात केली जात असली, तरी नापिकी व कर्जाच्या बोजामुळे खचलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकलेला नाही.

औरंगाबाद/नाशिक/नागपूर : निवडणुकीच्या रणधुमाळीत मतदारांवर आश्वासनांची खैरात केली जात असली, तरी नापिकी व कर्जाच्या बोजामुळे खचलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकलेला नाही. निवडणुकीचा बिगुल वाजल्यापासून राज्यातील तब्बल १७४ शेतकºयांनी जीवनयात्रा संपविली असून, प्रचाराच्या गलबल्यात त्याकडे लक्ष द्यायलाही कोणाला वेळ मिळालेला नाही.सर्व राजकीय पक्षांचे पुढारी लोकांकडे मतांचा जोगवा मागत फिरत असताना, नापिकी, शेतमालाला मातीमोल भाव, कर्जबाजारीपणातून होत असलेल्या शेतकरी आत्महत्यांचे मात्र कोणालाच देणेघेणे नसल्याची स्थिती आहे. दुष्काळाचे भीषण चटके सोसाव्या लागणाºया मराठवाड्यात ९१ शेतकºयांनी महिनाभरात मृत्यूला कवटाळले. त्यानंतर, विदर्भात ४९ शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. खान्देशात १५ शेतकºयांनी मृत्यूला कवटाळले. बागायती पट्टा म्हणून ओळखल्या जाणाºया नाशिकमध्येही ९ शेतकºयांनी जीवन संपविले. मराठवाड्यात १ जानेवारी ते १४ एप्रिलपर्यंत २२० शेतकºयांनी आत्महत्या केली आहे. १४८ शेतकºयांना सरकारी मदत मिळाली असून, ५४ प्रकरणे अपात्र आहेत, तर १८ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. १ ते ३१ मार्चपर्यंत ६९ शेतकºयांनी आत्महत्या केली असून, मागील पंधरवड्यात सुमारे २२ शेतकºयांनी आत्महत्या केली आहे.राज्य सरकारने अटी-निकषात शेतकºयांचे सरसकट दीड लाख रुपयांचे कर्ज माफ केले, तर केंद्र सरकारनेही चालू वर्षापासून शेतकºयांना दरवर्षी सहा हजार रुपये मदत देण्याचे जाहीर केले आहे. तरीही शेतकºयांना दिलासा मिळालेला नाही. यंदा दुष्काळामुळे शेतीला मोठा फटका बसला आहे. जनावरांच्या चारा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पश्चिम वºहाडात अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यांत महिनाभरात १६ शेतकºयांनी जीवनयात्रा संपविली. जानेवारीपासून अहमदनगर जिल्ह्यातील ४० शेतकºयांनी आत्महत्या केलेल्या आहेत.>शेतकºयांचा विसरराजकारण्यांची ९८ टक्के भाषणे एकमेकांवर आरोप करणारी आहेत. या रणधुमाळीत शेतकºयांच्या प्रश्नांचा विसर पडला आहे. शेतकºयांची आत्महत्या, त्यांच्या आर्थिक प्रश्नांना बगल दिली जात आहे.- किशोर तिवारी,अध्यक्ष, वसंतराव नाईकशेती स्वावलंबन मिशन>रोजच पुलवामाराज्यात दिवसाकाठी ४३ शेतकरी आत्महत्या करीत असल्यामुळे येथे रोजच पुलवामा होतो आहे. काँग्रेसने शेतकरीविरोधात केलेले कायदे भाजपने रद्द केले नाहीत. ते दोन्ही पक्ष शेतकरी आत्महत्यांना जबाबदार आहेत. शेतकºयांचे मारेकरी हेच पक्ष आहेत, म्हणून ते तोंड लपवीत आहेत. - अमर हबीब,शेतकरी पुत्र आंदोलन

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक