शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
5
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
6
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
7
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
8
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
9
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
10
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
11
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
12
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
13
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
14
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
15
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
16
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
17
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
18
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
19
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
20
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप

आरटीई प्रवेशप्रक्रियेच्या विलंबाने पालकांमध्ये चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2019 01:50 IST

शिक्षण विभाग : मागील वर्षी जानेवारी महिन्यामध्ये सुरू झाली होती प्रक्रिया

प्रकाश गायकर

पिंपरी : ‘राईट टू एज्युकेशन’ (आरटीई) अर्थात शिक्षण हक्क कायद्यांतर्गत येत्या शैैक्षणिक वर्षासाठीच्या २५ टक्के जागांसाठी प्रवेश प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेची पहिली फेरी जानेवारी महिन्यामध्ये सुरू होणे अपेक्षित होते. मात्र अद्यापही ही प्रक्रिया सुरू झाली नसल्याने आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांच्या पालकांची चिंता वाढली आहे.

२००९ च्या सुधारित कायद्यानुसार ‘आरटीई’ अंतर्गत शैैक्षणिक वर्ष २०१९ मधील प्रवेश प्रक्रिया अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. गेल्या वर्षी हीच प्रक्रिया जानेवारी महिन्यामध्ये सुरू झाली होती. मात्र तरीही प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण झाली नव्हती. त्यामुळे बहुतांश विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले होते. यावर्षी फेब्रुवारीचे दोन आठवडे झाले असूनही प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आलेली नाही. दरवर्षी शाळांच्या नोंदणीपासून ते शेवटच्या फेरीपर्यंत आरटीईचे वेळापत्रक कोलमडते. त्यामुळे पालकांना विनाकारण त्रास सहन करावा लागतो. तसेच अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहतात.

आरटीई प्रवेशाला उशीर झाल्यामुळे पालकांमधून या प्रवेशाला प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे प्रवेशाच्या जागा रिक्त राहतात. दरवर्षी प्रवेशाच्या जागा शिल्लक राहूनही या प्रवेश प्रक्रियेला विलंब केला जातो. तसेच खासगी शाळांमध्ये प्रवेश सुरू झाल्याने पालकांची चिंता वाढली आहे. यावर्षीची प्रवेश प्रक्रिया २६ फेब्रुवारीपासून सुरू होणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे. खासगी शाळांमध्ये प्रवेश सुरू झाले असताना, तसेच गेल्या वर्षी जानेवारी महिन्यामध्ये सुरू झालेली प्रवेश प्रक्रिया यावर्षी दोन महिने उशिरा कशासाठी, असा प्रश्न पालकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.शाळानोंदणीत वेळ व्यर्थदर वर्षी शाळांची नोंदणी करण्यामध्ये वेळ वाया घालवला जातो. ज्या शाळांची नोंदणी केली जाते, त्याच शाळांची पुन्हा पुन्हा नोंदणी करण्यात वेळ खर्च केला जातो. त्यामुळे ज्या शाळा नव्याने आरटीई प्रक्रियेत समाविष्ट होतील त्यांचीच नोंदणी करणे आवश्यक आहे. मागील वर्षी अनेक शाळांनी परताव्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. तसेच परताव्याअभावी शाळानोंदणीसाठी नकार दिला होता. त्या वेळी शासनाने परस्पर त्या शाळांची नोंदणी केली होती. या वर्षीही अशाच प्रकारे नोंदणी करून प्रवेश प्रक्रिया जलद गतीने करण्याची मागणी पालकांनी केली आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSchoolशाळा