शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
कोल्हापुरकरांचा नादच खुळा! वनताराचे पथक दुसऱ्यांदा दाखल, महास्वामींची भेट घेणार
3
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
4
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
5
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
6
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
7
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
8
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
9
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
10
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
11
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
12
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
13
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
14
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?
15
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
16
अभिमानास्पद! मित्रांनी वडिलांची उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवतेय फुटबॉलचं मैदान
17
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
18
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
19
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
20
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...

मामुर्डी पुलावरील भुयारी मार्गाचे काम रखडलेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 02:48 IST

देहूरोड-कात्रज बाह्यवळण महामार्ग; फेब्रुवारीपासून सुरूवात करूनही अद्याप अपूर्णच

किवळे : देहूरोड-कात्रज बाह्यवळण महामार्गावरील शितळानगर (मामुर्डी) येथील भुयारी मार्गावरील पुलाचे रखडलेले काम फेब्रुवारी महिन्यात सुरू झाले होते. त्यानंतर मे महिन्यात ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर सुरू झालेले काम या एक महिन्यापासून पुन्हा रखडल्याची तक्रार नागरिकांनी व वाहनचालकांनी केली आहे. कामामुळे देहूरोड ते मामुर्डीदरम्यानचा भुयारी मार्गातील रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद असल्याने विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पुलाचे काम पूर्ण होण्यास आणखी किती महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.देहूरोड-कात्रज बाह्यवळण महामार्गावरील शितळानगर (मामुर्डी) येथील कॅन्टोंमेन्ट बोर्डाच्या जुन्या जकात नाक्याजवळ महामार्गावरील अरुंद पुलावरील छेद रस्त्यावर प्रचंड वर्दळ असल्याने सातत्याने अपघात होत होते. या ठिकाणी अनेकांना प्राण गमवावे लागलेले आहेत़ तर अनेक जण कायमचे जायबंदी झाले आहेत. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या वतीने गेल्या साडेसहा वर्षांपूर्वी महामार्गाचे सहापदरीकरण करण्यास सुरुवात झाल्यांनतर मामुर्डी येथील भुयारी मार्गावरील पुलाचे रुंदीकरण करणे अपेक्षित होते. मात्र विविध कारणे पुढे करीत कामात चालढकल करण्यात येत होती. याठिकाणी बोर्ड सदस्या सारिका नाईकनवरे यांनी उड्डाणपूल उभारण्याची, मागणी केली होती. गत वर्षी फुले-शाहू-आंबेडकर विचार मंचच्या वतीने अध्यक्ष धर्मपाल तंतरपाळे यांच्या नेतृत्वाखाली दोनदा रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते.तसेच भाजपा सोशल मीडियाचे अध्यक्ष सूर्यकांत सुर्वे यांनी प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस यांच्याकडे रखडलेले काम सुरू करण्याबाबत भेट घेऊन मागणी केली होती. त्यामुळे पुलाचे रुंदीकरण लवकर होणे गरजेचे असल्याबाबत लोकमतने गतवर्षी पंधरा डिसेंबरच्या अंकात ‘रुंदीकरण रखडल्याने वाढले अपघातांचे प्रमाण’ या शीर्षकाने छायाचित्रासह सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. त्या वेळी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या जलवाहिन्यांचा अडथळा येत असल्याने पुलाचे आरेखनात बदल केल्याने पुलाचे काम रखडल्याचे तसेच जलवाहिनी स्थलांतर न करता लवकरच सदर पुलाचे रुंदीकरणाचे काम सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार या वर्षी फेब्रुवारी महिन्यात भुयारी मार्गावरील पुलाच्या रुंदीकरणाचे काम वेगात सुरू केले मात्र गेल्या महिन्यापासून पुलाचे काम पुन्हा बंद झाले असून, त्यामुळे विविध समस्यांना सामोरे जावे लागत असल्याची तक्रार स्थानिक नागरिक तसेच वाहनचालकांनी केली आहे.२०१६ मध्ये सुरूवातसुरुवातीला नोव्हेंबर २०१६ मध्ये भुयारी पुलाच्या रुंदीकरण कामाला सुरुवातही करण्यात आली होती. मात्र जानेवारी (२०१७) महिन्यांपासून पुन्हा काम रखडले होते. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले होते. वाहनचालकांची मोठी गैरसोय होत होती. तसेच विकासनगर येथील महामार्गावरील छेद रस्ता बंद केल्याने सर्व वाहनचालक उलट दिशेने वळण घेण्यासाठी याच पुलावर येत असल्याने मोठी वर्दळ वाढली आहे.थेट महामार्गावर न्यावी लागतात वाहनेपुलाचे काम अर्धवट झालेले असून, भुयारी मार्गातून देहूरोड ते मामुर्डीकडे येणाऱ्या जाणाºया वाहनांना गेले सहा महिन्यांपासून थेट महामार्गावर वाहने न्यावी लागत असून, या ठिकाणी वाहतूक नियंत्रक दिवे बसविले असले तरी वाहतूक पोलीस अगर कॅन्टोन्मेंट बोर्डाचे वाहतूक वॉर्डन नसल्याने मुख्य महामार्गावरून ये-जा करणारी वाहने अत्यंत वेगात येत असून, पादचाºयांना व दुचाकी तसेच चारचाकी वाहनांना धोकादायक पद्धतीने रस्ता ओलांडावा लागत आहे. त्यामुळे काम वेगात पूर्ण करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड