शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

संवाद शब्दांचा शब्दांशी, प्रेरणा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात झाला कार्यक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2017 16:41 IST

कॅप एज्युकेशन सोसायटीच्या निगडी येथे प्रेरणा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित केलेल्या संवाद शब्दांचा शब्दांशी या कार्यक्रम झाला.

पिंपरी - कॅप एज्युकेशन सोसायटीच्या निगडी येथे प्रेरणा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित केलेल्या संवाद शब्दांचा शब्दांशी या कार्यक्रम झाला. ‘सृष्टीतील फुले कोमेजतात, शब्द  कोमेजत नाहीत. शब्द आपली जन्मभर सोबत करतात. शब्द जितका महत्वाचा तितका तितकाच त्याचा वापरही महत्वाचा असतो. शब्दाचा वापर योग्य झाला तर ठिक अन्यथा चुकीचा वापर झाल्यास अडचणी वाढू शकतात,  असे मत शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती नाना शिवले यांनी व्यक्त केले. कॅप एज्युकेशन सोसायटीच्या निगडी येथे प्रेरणा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित केलेल्या संवाद शब्दांचा शब्दांशी या कार्यक्रमात ते बोलत होते.  याप्रसंगी शब्दांगण वसईच्या अध्यक्षा शिल्पा परुळेकर, प्राचार्या शुभांगी इथापे, उपप्राचार्या छाया लोळे, पर्यवेक्षिका निशा देशमुख, लेखिका डॉ. वसुधा वैद्य, कवि व गीतकार संजय पाटील, विलास चाचे, कथालेखिका संध्या सोंडे कवयित्री अपर्णा बन्नगरे, वैशाली भालेकर, शानुदा पंडीत आदी उपस्थित होते. शिल्पा परुळेकर म्हणाल्या, ‘‘वाचनाने मनुष्य घडतो. कमी शब्दांत व्यक्त व्हायचे असेल तर कवितेसारखे दुसरे साधन नाही.या उपक्रमातून दहा हात जरी लिहिते झाले तरी हा कार्यक्रम सफल झाला असे म्हणता येईल.’’वसुधा वैद्य यांनी कवितेचे नवरसाचे महत्व सांगत रसग्रहण कसे करावे याविषयी मार्गदर्शन केले. कवितेत दडलेल्या भावाशी एकरूप झाले तरच कवितेचा रसास्वाद घेता येतो. संध्या सोंडे म्हणाल्या, साहित्यामध्ये समाजमनाचे प्रतिबिंब दडलेले असते. कथा, कविता, नाटक वाचल्याने सामाजिक जाणीवा विकसित होतात.’’ विलास चाचे व अपर्णा बन्नगरे यांनी साहित्यातील शब्दांचे खेळ घेत,अनेक प्रश्न विचारुन मुलांना बोलते करत पाठ्यपुस्तकातील व अवांतर वाचनाची उजळणी घेतली. अचूक उत्तरे सांगतील त्यांना बक्षीसे दिली. कवि संजय पाटील यांनी लोकगीते सादर करीत कविता सुरात वाचली. ती अधिक चांगली लक्षात राहते, असे सांगितले. वैशाली भालेकर, शानुदा पंडीत, साधना सपाटे, हेरंब पायगुडे यांनीही रचना सादर केल्या. मुलांनी कथा, कविता, गाणी यांचा भरपूर आनंद घेतला. प्राचार्या इथापे म्हणाल्या,‘‘मुलांच्या मनात साहित्याची गोडी निर्माण होण्यासाठी हा उपक्रम होता.’’संजय कु-हाडे यांनी  सूत्रसंचालन, साधना सपाटे यांनी आभार मानले. माधव भुस्कुटे, किरण बेंद्रे, राजेंद्र खेडकर,अमित पंडित यांनी विशेष परीश्रम घेतले.