...तर लघुउद्योगांना चालना
By Admin | Updated: March 4, 2016 00:19 IST2016-03-04T00:19:28+5:302016-03-04T00:19:28+5:30
‘‘सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांकडून मोठे उद्योजक एकूण २० टक्के उत्पादनाची खरेदी करीत नसल्याने हे उद्योग बंद पडतात किंवा स्थलांतरित होत आहेत

...तर लघुउद्योगांना चालना
चिंचवड : ‘‘सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांकडून मोठे उद्योजक एकूण २० टक्के उत्पादनाची खरेदी करीत नसल्याने हे उद्योग बंद पडतात किंवा स्थलांतरित होत आहेत. मोठ्या उद्योगांनी २० टक्क्यांपेक्षा अधिक उत्पादीत मालाची खरेदी केल्यास अनेक लघुउद्योगांना चालना मिळेल, असे केंद्र सरकारच्या सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विभागाचे संचालक आर. बी. गुप्ते यांनी केले.
‘मेक इन इंडिया’ व ‘मेक इन महाराष्ट्र’अंतर्गत सीएमएसतर्फे मध्यम व लघु उद्योजकांसाठी आयोजित ‘व्हायब्रंट एसएमई २०१६’चे उद्घाटन गुरुवारी त्यांच्या हस्ते चिंचवड येथील आॅटो क्लस्टर येथे झाले. शहरातील उद्योग, संघटनांनी एकत्रित येऊन या उपक्रमाचे आयोजन केले आहे. या वेळी उपसंचालक अभय दफ्तरदार, महापालिकेचे आयुक्त राजीव जाधव, पिंपरी-चिंचवड चेंबर्स आॅफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष अॅड. अप्पासाहेब शिंदे, सीएमएसचे संचालक अनिल मित्तल,अभय खिंवसरा, नितेश मकवाना, आशा पाचपांडे, मोतीलाल सांकला, राजीव दशपुते उपस्थित होते. पिंपरी-चिंचवड चेंबर आॅफ इंडस्ट्रीजच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
गुप्ते म्हणाले, ‘‘मायक्रो, स्मॉल, मीडिअम आंत्रपु्रनर्स अॅक्ट (एमएसएमई) कायद्यानुसार मोठ्या उद्योजकांनी त्यांच्या एकूण खरेदीच्या २० टक्के खरेदी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांकडून करण्याचा कायदा पाळला जात नाही. उद्योगक्षेत्रांशी संबंधित सर्व संस्थांचा एकत्रित समन्वय साधून उद्योजकांना पूरक वातावरण निर्माण करण्याचे धोरण मेक इन इंडियामधून आखले जात आहे. औद्योगिक प्रदर्शनांमुळे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजक, व्यवस्थापन, तसेच सरकारी अधिकाऱ्यांमध्ये समन्वय साधून व्यवसायाला गती मिळेल.’’(प्रतिनिधी)