शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

Chinchwad By Election: "सुट्टी मिळाली की फिरायला जाऊ नका, मतदानाला प्राध्यान्य द्या", रावसाहेब दानवेंचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2023 10:24 IST

मतदानाला सुट्टी दिल्याने नोकरदार वर्ग फिरायला जाण्याला पसंत करतात हे चुकीचे

पिंपरी: शहरी भागात मतदानाची टक्केवारी कमी असते. मतदानासाठी सुट्टी दिली जाते. माझ्या मते ही सुट्टी द्यायला नाही पाहिजे.  सुट्टी म्हंटले, इकडे तर लोणावळा, खंडाळा आणि माथेरान जवळच आहे, सुट्टी मिळाली की लोक मतदान करण्याऐवजी फिरायला जातात, नागरिकांनी मतदानाला प्राधान्य द्यावे, असे मत  केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी थेरगाव येथे व्यक्त केले.

थेरगाव येथे भाजपच्या वतीने सोसायटी धारकांचा मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी दानवे बोलत होते. व्यासपीठावर खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, उमा खापरे, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष माजी अध्यक्ष अमित गोरखे, माजी उपमहापौर झामाताई बारणे, अभिषेक बारणे, निलेश बारणे, विश्वजीत बारणे आदी उपस्थित होते.

दानवे म्हणाले, ''मतदानाची टक्केवारी शहरात कमी होतीय. आम्हीं गावी लोक भरून आणतो. लोकांना मतदान केंद्रापर्यंत आणून टक्केवारी वाढवतो. शहरी परिसरात आपल्या भागामध्ये आयटी हब आला प्रगती झाली मात्र मतदानाबाबत काही प्रमाणात अनास्था दिसून येते. मतदानाला सुट्टी दिली जाते त्यामुळे नोकरदार वर्ग फिरायला जाण्याला पसंत करतात. चुकीचे आहे. प्रत्येकाने मतदान करायला हवे. माझ्या मते मतदानाच्या दिवशी सुट्टी नाहीं पाहिजे. प्रत्येक मताला महत्त्व आहे कारण एका मतावरून पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार पडले होते.''

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, नियोजाअभावी  मावळातील पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पात हजार कोटी वाया घालण्याचे पाप राष्ट्रवादी काँगेस ने केले आहे. एखादा प्रकल्प राबवताना शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेणे गरजेचे असते. शेतकऱ्यांच्या भावना जाणून न घेताच प्रकल्प राबविण्याचा प्रयत्न केल्याने विरोध झाला. हा प्रश्न संवाद आणि चर्चेतून सोडविता आला असता. मात्र, जलवाहिनी प्रकल्प दामटून नेण्याचा प्रयत्न तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी केला.''

टॅग्स :PuneपुणेElectionनिवडणूकBJPभाजपाVotingमतदानMahavikas Aghadiमहाविकास आघाडीPoliticsराजकारण