शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

Chinchwad By Election: "सुट्टी मिळाली की फिरायला जाऊ नका, मतदानाला प्राध्यान्य द्या", रावसाहेब दानवेंचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2023 10:24 IST

मतदानाला सुट्टी दिल्याने नोकरदार वर्ग फिरायला जाण्याला पसंत करतात हे चुकीचे

पिंपरी: शहरी भागात मतदानाची टक्केवारी कमी असते. मतदानासाठी सुट्टी दिली जाते. माझ्या मते ही सुट्टी द्यायला नाही पाहिजे.  सुट्टी म्हंटले, इकडे तर लोणावळा, खंडाळा आणि माथेरान जवळच आहे, सुट्टी मिळाली की लोक मतदान करण्याऐवजी फिरायला जातात, नागरिकांनी मतदानाला प्राधान्य द्यावे, असे मत  केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी थेरगाव येथे व्यक्त केले.

थेरगाव येथे भाजपच्या वतीने सोसायटी धारकांचा मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी दानवे बोलत होते. व्यासपीठावर खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, उमा खापरे, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष माजी अध्यक्ष अमित गोरखे, माजी उपमहापौर झामाताई बारणे, अभिषेक बारणे, निलेश बारणे, विश्वजीत बारणे आदी उपस्थित होते.

दानवे म्हणाले, ''मतदानाची टक्केवारी शहरात कमी होतीय. आम्हीं गावी लोक भरून आणतो. लोकांना मतदान केंद्रापर्यंत आणून टक्केवारी वाढवतो. शहरी परिसरात आपल्या भागामध्ये आयटी हब आला प्रगती झाली मात्र मतदानाबाबत काही प्रमाणात अनास्था दिसून येते. मतदानाला सुट्टी दिली जाते त्यामुळे नोकरदार वर्ग फिरायला जाण्याला पसंत करतात. चुकीचे आहे. प्रत्येकाने मतदान करायला हवे. माझ्या मते मतदानाच्या दिवशी सुट्टी नाहीं पाहिजे. प्रत्येक मताला महत्त्व आहे कारण एका मतावरून पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार पडले होते.''

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, नियोजाअभावी  मावळातील पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पात हजार कोटी वाया घालण्याचे पाप राष्ट्रवादी काँगेस ने केले आहे. एखादा प्रकल्प राबवताना शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेणे गरजेचे असते. शेतकऱ्यांच्या भावना जाणून न घेताच प्रकल्प राबविण्याचा प्रयत्न केल्याने विरोध झाला. हा प्रश्न संवाद आणि चर्चेतून सोडविता आला असता. मात्र, जलवाहिनी प्रकल्प दामटून नेण्याचा प्रयत्न तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी केला.''

टॅग्स :PuneपुणेElectionनिवडणूकBJPभाजपाVotingमतदानMahavikas Aghadiमहाविकास आघाडीPoliticsराजकारण