शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

असुविधांची लागण थांबणार कधी? रुग्णांच्या नातेवाइकांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 04:16 IST

महापालिकेकडून नागरिकांच्या सोईसाठी शहरात आठ मोठी रुग्णालये सुरू केली आहेत. मात्र, या रुग्णालयातील असुविधांमुळे रुग्णांना वायसीएमशिवाय पर्यायच उरत नाही. दिवसेंदिवस रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे वायसीएममधील यंत्रणेवर ताण येत आहे.

पिंपरी : महापालिकेकडून नागरिकांच्या सोईसाठी शहरात आठ मोठी रुग्णालये सुरू केली आहेत. मात्र, या रुग्णालयातील असुविधांमुळे रुग्णांना वायसीएमशिवाय पर्यायच उरत नाही. दिवसेंदिवस रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे वायसीएममधील यंत्रणेवर ताण येत आहे. याचाच प्रतिकूल परिणाम रुग्णांच्या उपचारावर होत आहे. रुग्णालय परिसरातील स्वच्छतेकडेही कर्मचा-यांचे दुर्लक्ष आहे.महापालिकेच्या अर्थसंकल्पात वर्षाकाठी सुमारे ३० कोटींहून अधिक रुपयांची तरतूद यशवंतराव रुग्णालयासाठी केली जाते. मात्र, या रुपयांचा उपयोग रुग्णांना योग्य सेवा देण्यासाठी व्हावा, अशी शहरवासीयांची अपेक्षा असते. मात्र, अनावश्यक उपकरणांची सातत्याने होणारी खरेदी तसेच अत्यावश्यक साधन-सुविधांसाठी होणारी दिरंगाई यामुळे येथे येणाºया रुग्णांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.एक्स-रे मशीन वारंवार नादुरुस्त असल्याने रुग्णांच्या लांबच लांब रांगा पहायला मिळतात. शिवाय एक्स-रेसाठी आवश्यक असणाºया फ्रेमही अपुºया असतात. त्यामुळे अनेकवेळा रिपोर्ट मिळण्यास दिरंगाई होते. परिणामी पुढील उपचारास विलंब होतो. अपंग आणि चालता न येणाºया रुग्णांसाठी आवश्यक असणाºया व्हिलचेअरची संख्या कमी असल्याने रुग्णांना ताटकळत बसावे लागत आहे. खाटांची संख्या अपुरी पडत आहे. त्यामुळे अनेकवेळा अतिदक्षता विभागासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात रुग्णाला पाठविण्यात येते.रुग्णालयातील स्वच्छतागृहांची स्थिती दयनीय आहे. स्वच्छतेअभावी येथील दुर्गंधी असाह्य होते. शिवाय इमारतीच्या डगमध्ये कचºयाचे साम्राज्य पहायला मिळत आहे.रुग्णालयातून औषधांची दुकानदारीरुग्णाला लिहून दिलेली औैषधे विशिष्ट दुकानातून घेण्याचा आग्रह काही डॉक्टरांकडून केला जातो. तसेच काही महागडी औैषधे रुग्णालयातूनच मिळणे आवश्यक आहे. मात्र ती बाहेरील मेडिकल स्टोअरमधून आणायला सांगितली जातात. वायसीएममध्ये येणाºया बहुतांश रुग्णांची आर्थिक परिस्थिती बेताची असते. त्यामुळे अशा रुग्णांना महागडी औैषधे बाहेरून घेणे परवडत नाही. यावरून रुग्णांच्या नातेवाइकांकडून प्रशासनाकडे तक्रारीही केल्या आहेत. तरीही रुग्णालय प्रशासन अशा औैषधांची खरेदी का करत नाही व ठराविक मेडिकलमधून औैषध खरदीचा हट्ट कशासाठी, असा सवाल उपस्थित होत आहे.डॉक्टरांवर राजकीय दबावडॉक्टरांवर वारंवार होणाºया हल्ल्याविरोधात येथील निवासी डॉक्टरांनी काही महिन्यांपूर्वी संप पुकारला होता. महापौैरांच्या आश्वासनानंतर संप मागे घेतला खरा; परंतु अद्यापही परिस्थिती ‘जैैसे थे’च आहे. तातडीक विभागात एका रुग्णासोबत आठ ते दहा लोक येतात. अशावेळी नातेवाइकांकडून उपचारासाठी दबाव आणला जातो. शिवाय एखाद्या गंभीर रुग्णावर उपचार होणे येथे शक्य नसल्याचे डॉक्टर सांगतात. तेव्हा रुग्णांच्या नातेवाईकांकडून राजकीय पुढाºयांमार्फत उपचार करण्यासाठी दबाव आणला जातो. अशातच संबंधित रुग्ण दगावला तर त्याचे खापर निवासी डॉक्टरांवर फोडले जाते.