शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

समाविष्ट गावांतील बिल्डरांच्या हितासाठी घाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 01:28 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेत नवीन आठ गावे घेण्यास ग्रामपंचायतींनी विरोध दर्शविला आहे. महापालिकेने ही गावे कार्यक्षेत्रात घ्यावीत, असा ठराव केला असला, तरी संबंधित गावे उत्सुक नसल्याचा सूर आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत नवीन आठ गावे घेण्यास ग्रामपंचायतींनी विरोध दर्शविला आहे. महापालिकेने ही गावे कार्यक्षेत्रात घ्यावीत, असा ठराव केला असला, तरी संबंधित गावे उत्सुक नसल्याचा सूर आहे. राष्टÑवादीचा विरोध डावलून भाजपाने हा विषय मंूजर केला आहे. बांधकाम व्यावसायिकांच्या हितासाठी गावे महापालिकेत घेण्याचा डाव असल्याची टीका होत आहे.पिंपरी महापालिकेने पुण्याच्या विभागीय आयुक्तांना पत्र पाठवून ही गावे महापालिका हद्दीत समाविष्ट करण्याविषयी सरकारकडे उचित अहवाल सादर करण्याची विनंती केली होती़ आठ गावे समावेशाचा विषय मागील आठवड्यातील सर्वसाधारण सभेसमोर आला होता. त्यावर भाजपातील नगरसेवकांनी समाविष्ट गावांच्या समावेशाबाबत सकारात्मक मते व्यक्त केली, तर राष्टÑवादी काँग्रेस व शिवसेनेतून संमिश्र मते व्यक्त झाली. त्यानंतर विरोधकांचा विरोध डावलून हिंजवडी, माण, मारुंजी, नेरे, जांबे, सांगवडे, गहुंजे आणि तीर्थक्षेत्र देहूगाव, विठ्ठलनगर ही आठ गावे पिंपरी-चिंचवड महापालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यास आता संबंधित ग्रामपंचायतींनी विरोध सुरू केला आहे. समाविष्ट गावांतून महापालिकेच्या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. अगोदर महापालिकेत घेतलेल्या गावांचा विकास करा, मगच इतर गावे महापालिकेत घ्या, अशी सूचनाही ग्रामीण भागातील सरपंचांनी महापालिकेला केली होती.चाकण, आळंदी का नको?पिंपरी-चिंचवड महापालिकेत १९९७ मध्ये समाविष्ट झालेल्या १८ गावांचा विकास झाला नाही. रस्ते, वीज, पाणी, आरोग्य या मूलभूत सुविधाही पुरविलेल्या नाहीत. मूलभूत प्रश्न गंभीर आहेत. महापालिकेवर अगोदरच १८ समाविष्ट गावांचा भार असताना आणखी भार कशाला घेता, असा सूर विरोधकांनी आळविला. मात्र, विरोधी पक्षाचे मत लक्षात न घेता सत्ताधारी भाजपाने हा विषय मंजूर केला. यापूर्वीही आळंदीसह खेड आणि मावळमधील गावे महापालिकेत घेण्यास विरोध दर्शविला होता. ग्रामस्थांनी विरोध केल्यामुळे तो प्रस्ताव बारगळला होता.सत्ताधारी भाजपाने गावे समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या सीमेलगतच चाकण, आळंदी, चिंबळी, निघोजे अशी गावे आहेत. ती घेण्यास सत्ताधारी अनुत्सुक असल्याचे दिसून येत आहे. चाकण, आळंदी महापालिकेत का नको, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे शहरातील राजकारण्यांचे ज्या गावांतील बिल्डरशी संगनमत आहे, त्याचा गावांचा समावेश महापालिकेत करण्याचा घाट घातल्याची चर्चा आहे.>जमिनीला सोन्याचा भावहिंजवडीत आयटी पार्क असून, गहुंजेत आंतरराष्टÑीय क्रिकेटचे मैदान आहे. महापालिकेत ही गावे आली तर शहराच्या लौकिकात भर पडणार आहे. हे जरी खरे असले, तरी माण, मारूंजी, सांगावडे, जांबे, नेरे या परिसरातील जमिनी मोठ्या प्रमाणावर सर्वच पक्षांतील राजकीय नेत्यांनी विकत घेतलेल्या आहेत. काही वर्षांपूर्वी कवडीमोलाने घेतलेल्या जमिनीला आता सोन्याचा भाव आला आहे. महापालिकेत घेऊन या जमिनीचा भाव आणखी वाढविण्याचा सत्ताधाºयांचा मनसुबा आहे.>आर्थिक गणितासाठी घाईमारुंजी, सांगावडे, जांबे, नेरे या परिसरात मोठ्या प्रमाणावर बांधकाम प्रकल्प सुरू आहेत. या प्रकल्पांसाठी चांगले रस्ते नाहीत. विविध सुविधानाहीत. बांधकाम व्यावसायिकांच्या हितासाठी गावे महापालिकेत घेण्याचा घाट घातला जात आहे. यामागे राजकारण्यांचे आर्थिक गणितासाठी घाई केली जात असल्याची टीका होत आहे. गावे समाविष्ट करण्यास बांधकाम व्यावसायिकांचा पाठिंबा आहे. तर गावाचे गावपण जाऊ नये, यासाठी ग्रामस्थ प्रयत्नशील आहेत. महापालिकेत गावे समाविष्ट करू नयेत, अशीही मागणी जोर धरू लागली आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड