शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

आयुष्यभराची कमाई घरासाठी लावली, घरे पाडल्यानंतर आम्ही जायचे कुठे? नागरिकांचा टाहो

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 15:43 IST

चिखलीतील इंद्रायणी नदीकाठच्या नागरिकांचा टाहो, महापालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर, फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी; दुसऱ्या दाव्याच्या संदर्भात निर्णय; पण भरडले जातोय आम्ही!

पिंपरी : ‘आयुष्यभराची कमाई घर उभारण्यासाठी लावली, आता निळ्या पूररेषेत आहे, असे सांगून त्यावर कारवाई केली जात आहे. आम्ही कोणाला फसवले नाही. आमची फसवणूक झाली आहे. आता, आम्ही जायचे कुठे?’ असा संतप्त सवाल चिखली येथील इंद्रायणी नदीकाठच्या नागरिकांनी केला आहे.

चिखलातील इंद्रायणी नदीकाठच्या घरांवर कारवाई होणार आहे. त्या ठिकाणी असलेल्या नागरिकांनी महापालिका प्रशासनाबद्दल आणि भ्रष्ट व्यवस्थेबद्दल संताप व्यक्त केला. ही कारवाई अन्यायकारक आहे. साहित्य काढण्यासाठी वेळही दिला नाही. शुक्रवारी वीज, पाणी तोडण्यासाठी महापालिका अधिकारी गेले असताना नागरिकांनी माध्यमांसमोर टीका केली. 

पावसात साहित्य हलविण्याची तारांबळ

शनिवारी कारवाई होणार असल्याने पावसातही येथील घरातील साहित्य हलविण्यासाठी धावपळ सुरू होती. नागरिकांनी संताप व्यक्त केला. येथील प्रत्येक माणूस श्रीमंत नाही. गोरगरिबांची फसवणूक झाली आहे, ज्यांनी फसवणूक केली. त्यांच्यावर कारवाई होण्याची गरज आहे. आज आमचे घराचे पाणी तोडले, हा अन्याय आहे, आम्ही चुकीचे होतो तर पाच वर्षे प्रशासन झोपले होते का? नदीपात्रातील बांधकामांच्या जागा कुणी विकल्या. तेथे बंगल्यांचे डिझाइन करणारे कोण, त्यांना वीज, पाणी, ड्रेनेजची सुविधा देणारा अधिकारी कोण? याचा शोध घेऊन कारवाई केली पाहिजे, असा संताप महिलांनी व्यक्त केला.

 मी चार वर्षांपूर्वी या ठिकाणी जागा घेतली. त्यावेळी येथे रहिवासी झोन आहे, असे सांगितले होते. त्यानंतर सर्व वीज, पाणी अशा परवानगी घेतल्या. महापालिकेच्या वतीने कर भरून घेतला. आता आमच्या घरांवर कारवाई होत आहे. आमच्या परिसरामध्ये कोणीही भराव टाकून बांधकाम केले नाही. याबद्दल न्यायालय आणि राष्ट्रीय हरित लवादाची दिशाभूल केली. आमच्यावर अन्याय केला जात आहे. - महेश पाटील, नागरिक गोरगरीब नागरिकांनी या ठिकाणी घरे उभारली आहेत. आता त्या ठिकाणची घर पाडण्याचे आदेश दिले जात आहेत. आम्हाला कोणत्याही प्रकारचा वेळ मिळू न देता महापालिका प्रशासनाच्या वतीने अन्यायकारक कारवाई सुरू आहे. आम्हाला फसवणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे.  - गणेश खुळे, नागरिक 

२०१८ पासून येथील प्रश्न चर्चेत आला आहे. आमच्या भागातील नागरिकांनी कुठेही चुकीचे काम केले नव्हते. दुसऱ्या दाव्याच्या संदर्भात निर्णय झाला आहे. आमच्या जवळच असणाऱ्या एका बांधकाम व्यावसायिकाच्या संदर्भात न्यायालयाने निर्णय दिला आणि कारवाई आमच्यावरही होत आहे. या भागात आम्ही कोणीही भराव टाकलेला नाही. आमच्या जागा चुकीच्या होत्या, तर मग नोंदणी कशी झाली? आमची फसवणूक झाली आहे. - जयवंत कुदळे, नागरिक 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMuncipal Corporationनगर पालिकाReal Estateबांधकाम उद्योग