शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
4
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
5
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
6
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
7
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
8
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
9
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
10
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
11
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
12
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
13
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
14
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
15
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
16
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
17
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
18
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
19
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
20
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  

सांडपाण्याने वाढली जलपर्णी; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे प्रदूषणात होतेय वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 1:13 AM

दूषित पाण्यामुळे नदीपात्रात जलपर्णीचे साम्राज्य

- विलास भेगडेतळेगाव दाभाडे : इंद्रायणी नदीपात्रात सांगवी ते इंदोरी या सुमारे १२ किमीच्या टप्प्यात नदीकाठावरील गावांचे मोठ्या प्रमाणावर सांडपाणी सोडले जात असल्याने या भागातील नदीचे पाणी प्रदूषित झाले आहे. या दूषित पाण्यामुळे नदीपात्रात जलपर्णीचे साम्राज्य पसरले आहे.नदीकाठावर सांगवी, कातवी, वारंगवाडी, आंबी, वराळे, नाणोली तर्फे चाकण, तळेगाव दाभाडे, माळवाडी, इंदोरी ही गावे वसलेली आहेत. यातील बहुतेक गावांतील सांडपाणी नैसर्गिक उतारामुळे सरळ इंद्रायणी नदीपात्रात जात आहे. यामुळे जलपर्णी वाढली असून, डासांची पैदास मोठ्या प्रमाणावर झाली आहे. पावसाळ्यात इंद्रायणी नदीत वाहून येत असलेल्या जलपर्णी, मैलायुक्त सांडपाणी,कचरा यामुळे इंद्रायणीचे पावित्र्य धोक्यात आले असून वेळीच दखल न घेतल्यास इंद्रायणीची गटारगंगा होण्यास वेळ लागणार नाही. तळेगाव स्टेशनसह अनेक गावांचे मैलायुक्त सांडपाणी नदीपात्रात जात असल्याने प्रदूषणात भरच पडली आहे. आंबीसह आंबी एमआयडीसीचे दूषित पाणी इंद्रायणी नदीपात्रात येते.आंबी आणि इंदोरी येथे जनावरे धुण्याचे प्रमाण अधिक आहे. नदीकाठावर महिला मोठ्या प्रमाणावर धुणी-भांडी करताना दिसतात. नदीपात्रात सर्रास जनावरे धुतली जात आहेत. कारखानदारीचे दूषित पाणी, काठावरील गावांचे सांडपाणी, नदीपात्रात सोडल्याने होणारे परिणाम माहिती असूनही या गंभीर बाबीची दखल ग्रामस्थ, स्थानिक स्वराज्य संस्था व शासनाकडूनही घेतली जात नाही. तळेगाव नगर परिषद हद्दीतील मोठया प्रमाणात सांडपाणी ओढ्यामार्गे इंद्रायणी नदीतच येते. शिवाय अंत्यविधीनंतरची राख, निर्माल्य, धुणीभांडी व जनावरे धुणे आदी कारणांनी इंद्रायणी प्रदूषणात भर पडते. अनेक भाविक इंदोरी पुलाजवळ अंत्यविधीनंतरची राख सोडतात. त्यामुळे या ठिकाणी पाण्याचे अधिक प्रदूषण झाले आहे.वारंगवाडी ते इंदोरी या टप्प्यातील इंद्रायणीमुळे सुमारे ८० टक्के क्षेत्र बागायती झाले असले, तरी शेतकऱ्यांना नाईलाजाने हे दूषित पाणीच भाजीपाला व बागायती क्षेत्राला द्यावे लागत आहे. नदीकाठावरील बहुतेक गावांचा नळपाणीपुरवठा इंद्रायणी नदीवरच अवलंबून आहे. अनेक ग्राम पंचायतींकडे सक्षम जलशुद्धीकरण यंत्रणा नसल्याने नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागते.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडindrayaniइंद्रायणीwater pollutionजल प्रदूषण