शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

दीपोत्सवासाठी सोडले गणेश तलावात पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2018 02:02 IST

पाणीपुरवठा विभागाचा अजब कारभार : प्रशासन घालतेय कर्मचाऱ्यांना पाठीशी

पिंपरी : महापालिकेत पाणीपुरवठा विभागाचा मनमानी कारभार सुरू आहे. शहरात पाणीटंचाई सुरू असताना दीपोत्सवासाठी प्राधिकरणातील गणेश तलावात पाणी सोडले होते. दीपोत्सवानंतर पाणी बंद करण्यात आले आहे. पाणी सोडण्याचे महापालिका प्रशासनाने समर्थन केले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्राधिकरणातील आकुर्डी रेल्वे स्थानकाजवळ गणेश तलाव उद्यान आहे. तलाव आणि उद्यान असे भाग केले आहेत. तलाव परिसरात प्राधिकरणातील एका नगसेवकांच्या वतीने दीपोत्सवाचे आयोजन केले होते. त्यासाठी पाडव्याच्या दिवशी पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे पाऊस नसतानाही गणेश तलावातील धबधबा सुरू होता. त्यामुळे सुमारे तीन फूट खाली गेलेला तलाव भरला आहे. असा प्रकार गणेशोत्सव विसर्जन काळातही झाला होता. विसर्जनाच्या कालखंडातही पाणी सोडले होते. हे पाणी जलशुद्धीकरण केंद्रातून सोडले जाते.

जलउपसा केंद्रातून शुद्धीकरण टाक्यांमध्ये आणून सोडले जाते. तेथून प्रक्रिया करून हे पाणी जलवाहिनीद्वारे शहरातील विविध भागांत सोडले जाते. सध्या नदीतून पाणी उपसण्यात अनियमितता आहे. तसेच खंडित वीजपुरवठ्याचेही कारण देऊन पाणीपुरवठा विभाग शहरात पाणीटंचाई करीत आहे. केवळ आश्वासनांचा पाऊस पाणीपुरवठा विभागाकडून पाडला जात आहे. पाणीपुरवठा विभागाच्या कारभाराकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

पाणीपुरवठ्यात कोणतीही चूक झाली, नागरिकांना त्रास सहन करावा लागला, तर दोषींवर कारवाई करू, असा सज्जड दम आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी भरला होता. मात्र, पाणीपुरवठा विस्कळीतच झालेला आहे. गणेश तलावामधील पाणीपुरवठ्या संदर्भात एका अधिकाºयाला विचारले असता, मला याबाबत माहिती नाही. माहिती घेतो असे उत्तर दिले.वास्तव निराळेच, आयुक्तांची दिशाभूलयाबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या निदर्शनास ही बाब लक्षात आणून दिली असताना त्यांनी समर्थन केले. ‘‘ही नियमित प्रक्रिया आहे. जलशुद्धीकरण केंद्रातील स्वच्छतेनंतर अनावश्यक पाणी आठवड्याला सोडले जाते,’’ असे आयुक्तांनी सांगितले. गणेश विसर्जन आणि नगरसेवकांकडून आयोजित केलेला दीपोत्सव अशा दोनदाच पाणी सोडल्याचे आढळून आले. असे या गणेश तलावावर दररोज नागरिक चालायला जातात, त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्यावरून अधिकारी हे आयुक्तांची दिशाभूल करीत आहेत, हे दिसून येते.

टॅग्स :Waterपाणीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड