शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात पिंपरीत आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2019 19:23 IST

नागरिकत्व सुधारणा कायदा लोकशाहीला काळिमा तसेच संविधानाच्या उद्देशिकेला हरताळ फासणारा..

ठळक मुद्देकेंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी..

पिंपरी : नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात पिंपरीत शांततेत आंदोलन करण्यात आले. हा कायदा लोकशाहीला काळिमा तसेच संविधानाच्या उद्देशिकेला हरताळ फासणारा आहे. त्यामुळे हा कायदा त्वरित रद्द करण्यात यावा, अशी मागणी यावेळी आंदोलकांकडून करण्यात आली. हिंदू मुस्लिम एक है, मोदी- शहा फेक है यासह केंद्र सरकार विरोधात या वेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कुल जमाअती तंजीम, पिंपरी-चिंचवड या संघटनेतर्फे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आंदोलन झाले. मौलाना अलीम अन्सारी, अब्दुल गफ्फार, नय्यर नुरी, फै ज अहमज फै जी, मुफ्ती आबिद रजा, कारी इकबाल, मौलाना उमर गाझी, तन्वीर रिजवी, मौलाना मुब्बशीर, मौलाना मुक्तदिर कादरी, जनाब अकील मुजावर, हाजी गुलजार, युसूफ कुरेशी, गुलाम रसुल, नागरी हक्क सुरक्षा समितीचे अध्यक्ष मानव कांबळे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, शिवसेनेचे महापालिकेतील गटनेते राहुल कलाटे, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, बाबा कांबळे, धम्मराज साळवे, संतोष शिंदे, अंजना गायकवाड, सुरेश रोकडे, सर्वजीत बनसोडे, देवेंद्र तायडे आदी या वेळी उपस्थित होते. सुमारे पाच हजार मुस्लिम समाजबांधव या आंदोलनात सहभागी झाले होते. मानव कांबळे, मारुती भापकर, तसेच मुस्लिम बांधवांनी या वेळी मनोगत व्यक्त करताना केंद्र सरकारवर टीका केली. मुस्लिम समाजाला त्रास देण्याच्या उद्देशाने नागरिकत्व सुधारणा कायदा तयार करण्यात आला आहे. समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय या तत्वांवर भारतीय लोकशाहीचा डोलारा आधारलेला आहे. या मूळ तत्वानांच सुरुंग लावण्याचे काम या माध्यमातून करण्यात येत आहे. भारत हा धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य तत्वानुसार व्यक्तिला केंद्रबिंदू मानून राज्य करणारा देश आहे. असे असतानाही देशात एनआरसी कायदा लागू करण्याचा केंद्रीय गृहमंत्र्यांकडून आग्रह आहे. त्यामुळे मुस्लिम व इतर बहुजन समाज भयभीत झाला आहे. प्रचंड विरोध असतानाही आसाम येथे एनआरसी कायदा लागू केला आहे. यामुळे अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत मुस्लिम समाजच नव्हे तर संविधानाला मानणाºया सर्व समाजातील लोकांमध्ये याबाबत नाराजी आहे. आंदोलनाच्या माध्यमातून ही नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे नागरिकत्व सुधारणा कायदा त्वरित मागे घ्यावा, अशी मागणी मान्यवरांनी मनोगतातून व्यक्त केली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकGovernmentसरकार