शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
3
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
4
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
5
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
6
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
7
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
8
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
9
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
10
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
11
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
12
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
13
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
14
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
15
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
16
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
17
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
18
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
19
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
20
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात पिंपरीत आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2019 19:23 IST

नागरिकत्व सुधारणा कायदा लोकशाहीला काळिमा तसेच संविधानाच्या उद्देशिकेला हरताळ फासणारा..

ठळक मुद्देकेंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी..

पिंपरी : नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात पिंपरीत शांततेत आंदोलन करण्यात आले. हा कायदा लोकशाहीला काळिमा तसेच संविधानाच्या उद्देशिकेला हरताळ फासणारा आहे. त्यामुळे हा कायदा त्वरित रद्द करण्यात यावा, अशी मागणी यावेळी आंदोलकांकडून करण्यात आली. हिंदू मुस्लिम एक है, मोदी- शहा फेक है यासह केंद्र सरकार विरोधात या वेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कुल जमाअती तंजीम, पिंपरी-चिंचवड या संघटनेतर्फे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आंदोलन झाले. मौलाना अलीम अन्सारी, अब्दुल गफ्फार, नय्यर नुरी, फै ज अहमज फै जी, मुफ्ती आबिद रजा, कारी इकबाल, मौलाना उमर गाझी, तन्वीर रिजवी, मौलाना मुब्बशीर, मौलाना मुक्तदिर कादरी, जनाब अकील मुजावर, हाजी गुलजार, युसूफ कुरेशी, गुलाम रसुल, नागरी हक्क सुरक्षा समितीचे अध्यक्ष मानव कांबळे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, शिवसेनेचे महापालिकेतील गटनेते राहुल कलाटे, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, बाबा कांबळे, धम्मराज साळवे, संतोष शिंदे, अंजना गायकवाड, सुरेश रोकडे, सर्वजीत बनसोडे, देवेंद्र तायडे आदी या वेळी उपस्थित होते. सुमारे पाच हजार मुस्लिम समाजबांधव या आंदोलनात सहभागी झाले होते. मानव कांबळे, मारुती भापकर, तसेच मुस्लिम बांधवांनी या वेळी मनोगत व्यक्त करताना केंद्र सरकारवर टीका केली. मुस्लिम समाजाला त्रास देण्याच्या उद्देशाने नागरिकत्व सुधारणा कायदा तयार करण्यात आला आहे. समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय या तत्वांवर भारतीय लोकशाहीचा डोलारा आधारलेला आहे. या मूळ तत्वानांच सुरुंग लावण्याचे काम या माध्यमातून करण्यात येत आहे. भारत हा धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य तत्वानुसार व्यक्तिला केंद्रबिंदू मानून राज्य करणारा देश आहे. असे असतानाही देशात एनआरसी कायदा लागू करण्याचा केंद्रीय गृहमंत्र्यांकडून आग्रह आहे. त्यामुळे मुस्लिम व इतर बहुजन समाज भयभीत झाला आहे. प्रचंड विरोध असतानाही आसाम येथे एनआरसी कायदा लागू केला आहे. यामुळे अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत मुस्लिम समाजच नव्हे तर संविधानाला मानणाºया सर्व समाजातील लोकांमध्ये याबाबत नाराजी आहे. आंदोलनाच्या माध्यमातून ही नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे नागरिकत्व सुधारणा कायदा त्वरित मागे घ्यावा, अशी मागणी मान्यवरांनी मनोगतातून व्यक्त केली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकGovernmentसरकार