शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
3
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
4
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
5
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
6
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
7
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
8
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
9
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
10
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
11
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
12
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
13
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
14
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
15
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
16
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
17
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
18
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
19
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
20
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!

हा विकृतपणा अन् नीचपणाचा कळस,अशा प्रवृत्ती ठेचल्याच पाहिजेत;उदय सामंत यांची संतप्त भावना

By नारायण बडगुजर | Updated: May 22, 2025 17:02 IST

- वैष्णवी हगवणे प्रकरणातील संशयितांना काही तासांतच अटक करणार

पिंपरी :वैष्णवी हगवणे प्रकरणातील फरार असलेल्या दोन संशयितांना पोलिस काही तासांत अटक करतील. अशा नीच प्रवृत्ती ठेचल्या पाहिजेत. त्यासाठी त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी संतप्त भावना राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली. मी, पोलिस आणि शासन देखील कस्पटे कुटुंबियांसोबत आहेत, असे म्हणत त्यांनी वैष्णवीच्या आईवडील आणि नातेवाईकांचे सांत्वन केले.राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी शशांक हगवणे (वय २३) यांनी मुळशी तालुक्यातील भुकूम येथे १६ मे रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी वैष्णवीचे वडील आनंद उर्फ अनिल कस्पटे यांनी १७ मे रोजी बावधन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पथके तयार करून वैष्णवीचा पती, सासू आणि नणंद यांना अटक केली. मात्र, सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे अद्याप मोकाट आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.

दरम्यान, मंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी (दि. २२ मे) दुपारी पिंपरी-चिंचवड शहरातील वाकड येथे वैष्णवीच्या आईवडीलांच्या घरी भेट दिली. त्यावेळी तिच्या आईवडिलांचे सांत्वन करून त्यांना धीर दिला. पोलिस उपायुक्त विशाल गायकवाड यांच्याशीही मंत्री सामंत यांनी चर्चा करून प्रकरणाबाबत माहिती घेतली.

उदय सामंत म्हणाले, वैष्णवीबाबत घडलेली घटना हा निचपणाचा कहर आहे. याप्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत तीन जणांना अटक केली आहे. दोन संशयित फरार आहेत. त्यांच्या शोधसाठी पोलिसांनी सहा पथके तयार केली आहेत. त्यामुळे त्या दोघांनाही २६ तासांमध्ये त्यांना अटक करण्यात पोलिसांना यश येईल, असा विश्वास आहे. वैष्णवीबाबत संशयितांनी जो निर्घूणपणा दाखविला आहे त्याला कडक शिक्षा झाली पाहिजे. अशा पद्धतीचे कृत्य यापुढे कोणी करू नये, अशा पद्धतीची शिक्षा झाली पाहिजे. अशा घटनांचा परिणाम समाजावर होत असतो. या प्रकरणातील पाच संशयितांव्यतिरिक्त आणखी कोणाचा यात समावेश आहे का, आणखी काही कंगोरे या प्रकरणाला आहेत, याबाबतही तपास करावा, अशी सूचना पोलिसांना केली आहे. पोलिसांच्या तपासाबाबत कस्पटे कुटुंबियांनी समाधान व्यक्त केले आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये याची दखल पोलिसांनी घेतली पाहिजे. त्याच पद्धतीने पोलिसही काम करत आहेत.  

‘‘नीचपणाचा कळस...’’

पैसे, गाडी, मोबाइल मिळाला नाही म्हणून घरात छळ करणारे आणि बाहेर दुनियाचे कैवारी म्हणून फिरत असतात हा नीचपणाचा कळस आहे. कोणत्याही पक्षाचा कोणताही कार्यकर्ता असला तरी त्याला असे कृत्य करण्याचे सर्टिफिकेट दिलेले नाही. कोणत्याही राजकीय व्यक्तीने, नेत्याने असे करू नये, असे उदय सामंत म्हणाले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेCrime Newsगुन्हेगारीVaishnavi Hagawane Death Caseवैष्णवी हगवणे