शहरं
Join us  
Trending Stories
1
शनिवारची रात्र, गोव्यात क्लबमध्ये सिलिंडर स्फोट; २५ मृतांमध्ये चार पर्यटक, उर्वरित नाईट क्लबचा स्टाफ...
2
विरोधी पक्षनेता नसेल तर उपमुख्यमंत्रिपदही रद्द करा; उद्धव ठाकरे : सरकार विरोधी पक्षाला घाबरते का?
3
गोव्यातील क्लबमध्ये भीषण आग, २३ जणांचा मृत्यू; सिलिंडर स्फोट झाल्याची शक्यता, CM कडून चौकशीचे आदेश
4
दिल्लीत PM नरेंद्र मोदी अन् राज ठाकरे एकत्र; मुलगा अमित अन् नातू किआननं मोदींसोबत काढला फोटो
5
Indigo आज १५०० उड्डाणे घेणार, १३५ ठिकाणांना जोडणार; एअरलाइन्सनं जारी केले निवेदन
6
आजचे राशीभविष्य, ०७ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभाची संधी पण नकारात्मक विचार दूर करणे हितावह राहील
7
‘स्थानिक’ निवडणुकीची रणधुमाळी; ‘हिवाळी’ अधिवेशन ठरणार वादळी; उद्यापासून नागपुरात प्रारंभ; विरोधकांचा चहापानावर बहिष्कार
8
धक्कादायक... मेळघाटात व्यसनामुळे वाढतोय कॅन्सर; युवा ते प्रौढ व्यक्तींमध्ये रक्ताल्पता : संशोधन चमू काढणार निष्कर्ष
9
क्रेडिट कार्डांच्या विळख्यात..! क्रेडिट कार्डवर राेख रक्कम उचलली तर काय हाेते?
10
हा हा हा... आमच्यासारखे तुम्हाला भांडता येते का...?
11
विमान तिकीट दरवाढीला केंद्राचा चाप, चौथ्या दिवशीही इंडिगोचा घोळ कायम
12
घोडबंदर मार्गावर आज ‘अवजड’ प्रवेशबंदी; मोठा पोलिस फौजफाटा तैनात, पण कोंडी टळणार का?
13
इंडिगोवर रेल्वेचा दिलासा : ३७ ट्रेनला ११६ अतिरिक्त डबे, मध्य आणि पश्चिम रेल्वे चालवणार ४९ विशेष फेऱ्या
14
डॉ. आंबेडकरांनी भारताच्या विविधतेला एकत्र बांधणारे संविधान दिले : राज्यपाल
15
राणीच्या बागेत झेब्रा, जिराफ, जॅग्वार, चिंपांझीसाठी लगबग..! ‘एक्झॉटिक झोन’साठी प्रक्रिया सुरू; १७ प्रदर्शिनी, सुविधा निर्माण करणार
16
SIR प्रक्रियेत मोठा घोटाळा समोर, चुकीची माहिती दिल्याचे उघड; नूरजहां, आमिर, दानिश विरोधात FIR
17
"तुमच्या मर्यादेत राहा..." ODI मालिका जिंकताच गंभीरनं काढला मनातला राग! तो नेमकं कुणाला अन् काय म्हणाला?
18
एकनाथ शिंदेंनी मुलाचे भरसभेत केले तोंडभरून कौतुक; म्हणाले, “श्रीकांत हे व्हिजन असलेले खासदार”
19
'यशस्वी' सेंच्युरी... 'रो-को'ची फिफ्टी! टीम इंडियानं दाबात जिंकली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका
20
“कोणतीही तडजोड अमान्य, अशी कारवाई करू की...”; Indigo प्रकरणी केंद्र सरकारची कठोर भूमिका
Daily Top 2Weekly Top 5

हा विकृतपणा अन् नीचपणाचा कळस,अशा प्रवृत्ती ठेचल्याच पाहिजेत;उदय सामंत यांची संतप्त भावना

By नारायण बडगुजर | Updated: May 22, 2025 17:02 IST

- वैष्णवी हगवणे प्रकरणातील संशयितांना काही तासांतच अटक करणार

पिंपरी :वैष्णवी हगवणे प्रकरणातील फरार असलेल्या दोन संशयितांना पोलिस काही तासांत अटक करतील. अशा नीच प्रवृत्ती ठेचल्या पाहिजेत. त्यासाठी त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी संतप्त भावना राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली. मी, पोलिस आणि शासन देखील कस्पटे कुटुंबियांसोबत आहेत, असे म्हणत त्यांनी वैष्णवीच्या आईवडील आणि नातेवाईकांचे सांत्वन केले.राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी शशांक हगवणे (वय २३) यांनी मुळशी तालुक्यातील भुकूम येथे १६ मे रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी वैष्णवीचे वडील आनंद उर्फ अनिल कस्पटे यांनी १७ मे रोजी बावधन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पथके तयार करून वैष्णवीचा पती, सासू आणि नणंद यांना अटक केली. मात्र, सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे अद्याप मोकाट आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.

दरम्यान, मंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी (दि. २२ मे) दुपारी पिंपरी-चिंचवड शहरातील वाकड येथे वैष्णवीच्या आईवडीलांच्या घरी भेट दिली. त्यावेळी तिच्या आईवडिलांचे सांत्वन करून त्यांना धीर दिला. पोलिस उपायुक्त विशाल गायकवाड यांच्याशीही मंत्री सामंत यांनी चर्चा करून प्रकरणाबाबत माहिती घेतली.

उदय सामंत म्हणाले, वैष्णवीबाबत घडलेली घटना हा निचपणाचा कहर आहे. याप्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत तीन जणांना अटक केली आहे. दोन संशयित फरार आहेत. त्यांच्या शोधसाठी पोलिसांनी सहा पथके तयार केली आहेत. त्यामुळे त्या दोघांनाही २६ तासांमध्ये त्यांना अटक करण्यात पोलिसांना यश येईल, असा विश्वास आहे. वैष्णवीबाबत संशयितांनी जो निर्घूणपणा दाखविला आहे त्याला कडक शिक्षा झाली पाहिजे. अशा पद्धतीचे कृत्य यापुढे कोणी करू नये, अशा पद्धतीची शिक्षा झाली पाहिजे. अशा घटनांचा परिणाम समाजावर होत असतो. या प्रकरणातील पाच संशयितांव्यतिरिक्त आणखी कोणाचा यात समावेश आहे का, आणखी काही कंगोरे या प्रकरणाला आहेत, याबाबतही तपास करावा, अशी सूचना पोलिसांना केली आहे. पोलिसांच्या तपासाबाबत कस्पटे कुटुंबियांनी समाधान व्यक्त केले आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये याची दखल पोलिसांनी घेतली पाहिजे. त्याच पद्धतीने पोलिसही काम करत आहेत.  

‘‘नीचपणाचा कळस...’’

पैसे, गाडी, मोबाइल मिळाला नाही म्हणून घरात छळ करणारे आणि बाहेर दुनियाचे कैवारी म्हणून फिरत असतात हा नीचपणाचा कळस आहे. कोणत्याही पक्षाचा कोणताही कार्यकर्ता असला तरी त्याला असे कृत्य करण्याचे सर्टिफिकेट दिलेले नाही. कोणत्याही राजकीय व्यक्तीने, नेत्याने असे करू नये, असे उदय सामंत म्हणाले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेCrime Newsगुन्हेगारीVaishnavi Hagawane Death Caseवैष्णवी हगवणे