शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

थेरगावला पवना नदीत दोन जण बुडाल्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2021 07:54 IST

पिंपरी : चिंचवड येथून पवना नदीतून थेरगाव येथे येणाऱ्या चार जणांपैकी दोघे बुडाल्याची शक्यता आहे. यातील दोघे बचावले असून ...

पिंपरी : चिंचवड येथून पवना नदीतून थेरगाव येथे येणाऱ्या चार जणांपैकी दोघे बुडाल्याची शक्यता आहे. यातील दोघे बचावले असून दोन जणांचा रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता. मात्र अंधार झाल्याने शोधकार्य थांबविण्यात आले.

रवी राजकुमार गायकवाड (वय १३), नरसिंग महादेव जाधव (वय २१, दोन्हीही रा. काळेवाडी), असे बचावलेल्या दोघांची नावे आहेत. तर पिंटू विठ्ठल गायकवाड (वय ३५), ओम प्रकाश जाधव (वय २५, दोन्हीही रा. काळेवाडी), असे शोध सुरू असलेल्या दोघांची नावे आहेत. 

वाकडचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) संतोष पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, रवी गायकवाड, नरसिंग जाधव, पिंटू गायकवाड आणि ओम जाधव हे चौघेही रविवारी (दि. १४) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास चिंचवड येथून पवना नदी पात्रातून थेरगाव येथील स्मशानभूमीजवळ येत होते. चौघांनाही पोहता येत असल्याने ते पोहत येत होते. त्यात रवी गायकवाड व नरसिंग जाधव हे नदी पात्रातून सुरक्षीत बाहेर आले. मात्र पिंटू गायकवाड आणि ओम जाधव हे नदी पात्रातून बाहेर आले नाहीत. त्यामुळे त्यांचा  शोध सुरू केला. तसेच याबाबत पोलीस व अग्निशामक दलाला माहिती दिली. त्यानुसार पोलीस तसेच महापालिकेच्या पिंपरी व रहाटणी केंद्रातील दोन अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाले. दोन बोटींच्या साह्याने अग्निशामक दलाच्या जवानांनी शोध घेतला. मात्र अंधार झाल्याने शोधकार्य थांबविण्यात आले. सोमवारी सकाळी शोधकार्य सुरू करण्यात येणार आहे.

थेरगाव येथे पवना नदी पात्रात गाळाचे प्रमाण जास्त असल्याचे सांगण्यात येते आहे. त्यामुळे दोघे तेथे बुडाले असल्याची शक्यता आहे, असे पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडriverनदी