शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

वर्षाविहारासाठी पर्यटक लाेणावळ्यात ; महामार्गावर वाहनांच्या रांगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2019 17:08 IST

वर्षाविहारासाठी पर्यटकांनी लाेणावळ्यात गर्दी केल्याने वाहनांच्या आठ ते दहा किलाेमीटर रांगा लागल्या आहेत.

लोणावळा : वर्षाविहाराचा आनंद घेण्याकरता आज लोणावळ्यात हजारोंच्या संख्येने पर्यटक दाखल झाल्याने शहरात प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर आठ ते दहा किलोमीटर अंतरापर्यंत तर भूशी धरणाकडे जाणाऱ्या मार्गावर सात किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

रविवारची सुट्टी एन्जॉय करण्याकरीता आज सकाळपासूनच लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी वाढण्यास सुरुवात झाल्याने दुपारी बारा वाजता भुशी धरण ते कुमार चौक अशी सुमारे सात किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. राष्ट्रीय महामार्गावर तर सकाळपासूनच वाहनांची गर्दी झाल्याने खंडाळा ते लोणावळा व लोणावळा ते वलवण दरम्यान वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. भुशी धरण व लायन्स पॉइंट या पर्यटन स्थळांवर आज अक्षरशः पाय ठेवण्यास देखील जागा शिल्लक राहिली नव्हती. वाहनांमधून येणाऱ्या पर्यटकांप्रमाणेच रेल्वेगाड्यांना येणाऱ्या पर्यटकांची संख्या देखील मोठी असल्याने भुशी धरण ते लोणावळा रेल्वे स्थानकादरम्यान पायी पर्यटकांच्या रांगा लागल्या होत्या. 

पर्यटनस्थळांवर व राष्ट्रीय महामार्गावर झालेली वाहतूक कोंडी सोडवण्याकरता लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक बी.आ. पाटील यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव स्वामी, पोलीस उपनिरीक्षक बजरंग सांगडे, राधिका मुंडे, मृगदीप गायकवाड यांच्यासह वाहतूक शाखेचे पोलिस कर्मचारी, वॉर्डन, पोलिस मित्र व मुख्यालयाकडून आलेले पोलिस कर्मचारी असा सुमारे सव्वाशे पोलिसांचा ताफा रस्त्यावर तैनात होता. लोणावळा शहरात आज प्रचंड वाहतुक कोंडी झाल्याने सर्वत्र वाहने व वाहतुक कोंडी असेच चित्र पहायला मिळत होते. स्थानिक नागरिकांना आज अक्षरशः घरातून बाहेर पडणे अवघड झाले होते. लोणावळा खंडाळा परिसरातील भुशी धरण, लायन्स पॉईंट, टायगर पॉईंट, गिधाड तलाव, राजमाची गार्डन, डय़ुक्स नोज सनसेट पाँईट, यासह कार्ला लेणी,  भाजे लेणी परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती.

टॅग्स :lonavalaलोणावळाTrafficवाहतूक कोंडीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडtourismपर्यटन