शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

वाकड-भूमकर चौकातील अरुंद रस्त्यामुळे वाहतूककोंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2019 14:25 IST

पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात मोठ्या प्रमाणात माहिती-तंत्रज्ञान आणि औद्योगिक क्षेत्रातील कंपन्या आहेत..

ठळक मुद्देउद्योगनगरीतील वाहनचालक त्रस्त : रुंदीकरणासह वाहतूक सुरळीत करण्याची मागणी हिंजवडी, तळेगाव, चाकण व पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील सुमारे ३५ लाखांहून अधिक रहिवासी हिंजवडी आयटी पार्कमध्ये आयटी कंपन्या फेज १, २ व ३ क्षेत्रात शेकडो कंपन्या कार्यरत

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात मोठ्या प्रमाणात माहिती-तंत्रज्ञान आणि औद्योगिक क्षेत्रातील कंपन्या आहेत. त्यामुळे येथे या कंपन्यांतील आयटीएन्स आणि कामगारवर्ग मोठ्या संख्येने ये जा करतो.वाकड-भूमकर चौकातील अरुंद रस्त्यामुळे वाहतूककोंडी  ही वाहने लाखोंच्या संख्येने रस्त्यावर येत असल्याने उद्योगनगरीतील रस्त्यांवर सातत्याने वाहतूककोंडी होत असल्याने आयटी अभियंते हैराण झाले आहेत. हिंजवडी, तळेगाव, चाकण व पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील सुमारे ३५ लाखांहून अधिक रहिवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. चाकण, भोसरी, तळवडे, हिंजवडी परिसरात आयटी कंपन्यांसह मोठे, मध्यम व लघुउद्योग आहेत. या क्षेत्रात लाखो कामगार काम करतात. हिंजवडी आयटी पार्कमध्ये आयटी कंपन्या फेज १, २ व ३ क्षेत्रात शेकडो कंपन्या कार्यरत आहेत. राज्य व देशभरातील २० लाख नागरिक या शहरात नोकरी व व्यवसायानिमित्त वास्तव्यास आहेत. त्या तुलनेत शहरातील वाहतूक व्यवस्था तोकडी आहे.

वाहतुकीबाबचे नियोजन करण्यात संबंधित यंत्रणा आणि प्रशासन कमी पडत असल्याचे दिसून येते. त्यामुळे त्याचा नाहक त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे. वाकड येथील भूमकर चौकातून हिंजवडीकडे जाणाऱ्या चौपदरी भुयारी मार्गाचे मुंबई-बेंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर आठ पदरी भुयारी मार्ग करून वाहतुकीची कोंडी सोडविण्याची मागणी आहे. भूमकर चौकात दररोज सकाळी साडेआठ ते अकरापर्यंत तसेच सायंकाळी पाच ते रात्री नऊपर्यंत वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक हैराण झाले आहेत..............भूमकर चौकाला पर्यायी मार्गाची आवश्यकता भूमकर चौकामध्ये डाव्या बाजूला सातारा, बेंगळुरुकडे जाणार अरुंद रस्ता आहे. तसेच उजव्या बाजूला ताथवडेकडे जाणारा रस्ता सुमारे १५ फुटी रस्तादेखील अरुंद आहे. त्याचप्रमाणे पुलाच्या बोगद्याच्या उजव्या बाजूला पिंपरी-चिंचवड शहरातून राष्ट्रीय महामार्गाला मुंबईकडे जाणारा अरुंद रस्ता आहे व डाव्या बाजूने बेंगळूरु-सातारा मार्गावरून पिंपरी-चिंचवड शहरात येणारा रस्ता अरुंद आहे. त्यामुळे वाहतूककोंडी होते. कात्रजमार्गे पिंपरी-चिंचवडमध्ये येणाºया वाहनचालकांनाही कोंडीचा सामना करावा लागतो. हिंजवडीकडून येणाºया वाहनचालकांनाही या समस्येला सामोरे जावे लागते. तासन्तास या वाहतूक कोंडीत अडकून पडत आहेत. त्यामुळे भूमकर चौकाला पर्यायी मार्गाची आवश्यकता आहे. .............अन्यथा उच्च न्यायालयात जनहित याचिका वाहतूककोंडी सोडविण्यासाठी दोन महिन्यांत संबंधित प्रशासनाने योग्य ती ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी चिंचवड प्रवासी संघातर्फे केली आहे. समस्या न सोडविल्यास उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन देण्यात आले आहे. संघाचे अध्यक्ष गुलामअली भालदार, एन.डी. भोसले, निर्मला माने, मुकेश चुडासमा, संभाजी बारणे आदींनी मागणी केली आहे............भूमकर चौकात सातत्याने वाहतूक कोंडी होते. असे असतानाही वाहतूक पोलिसांकडून ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. केवळ तात्पुरती उपाययोजना होत असल्याने समस्या कायम आहे. विविध प्रयोग करुनही कोंडी फोडण्यात पोलिसांना यश आलेले नाही. संबंधित यंत्रणांच्या उदासीनतेचा फटका आयटीयन्स तसेच अन्य वाहनचालकांना बसत आहे. तसेच कोंडीमुळे शहरातील प्रदुषणात भर पडत आहे.

टॅग्स :wakadवाकडITमाहिती तंत्रज्ञानTrafficवाहतूक कोंडी