शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

वाकड-भूमकर चौकातील अरुंद रस्त्यामुळे वाहतूककोंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2019 14:25 IST

पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात मोठ्या प्रमाणात माहिती-तंत्रज्ञान आणि औद्योगिक क्षेत्रातील कंपन्या आहेत..

ठळक मुद्देउद्योगनगरीतील वाहनचालक त्रस्त : रुंदीकरणासह वाहतूक सुरळीत करण्याची मागणी हिंजवडी, तळेगाव, चाकण व पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील सुमारे ३५ लाखांहून अधिक रहिवासी हिंजवडी आयटी पार्कमध्ये आयटी कंपन्या फेज १, २ व ३ क्षेत्रात शेकडो कंपन्या कार्यरत

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात मोठ्या प्रमाणात माहिती-तंत्रज्ञान आणि औद्योगिक क्षेत्रातील कंपन्या आहेत. त्यामुळे येथे या कंपन्यांतील आयटीएन्स आणि कामगारवर्ग मोठ्या संख्येने ये जा करतो.वाकड-भूमकर चौकातील अरुंद रस्त्यामुळे वाहतूककोंडी  ही वाहने लाखोंच्या संख्येने रस्त्यावर येत असल्याने उद्योगनगरीतील रस्त्यांवर सातत्याने वाहतूककोंडी होत असल्याने आयटी अभियंते हैराण झाले आहेत. हिंजवडी, तळेगाव, चाकण व पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील सुमारे ३५ लाखांहून अधिक रहिवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. चाकण, भोसरी, तळवडे, हिंजवडी परिसरात आयटी कंपन्यांसह मोठे, मध्यम व लघुउद्योग आहेत. या क्षेत्रात लाखो कामगार काम करतात. हिंजवडी आयटी पार्कमध्ये आयटी कंपन्या फेज १, २ व ३ क्षेत्रात शेकडो कंपन्या कार्यरत आहेत. राज्य व देशभरातील २० लाख नागरिक या शहरात नोकरी व व्यवसायानिमित्त वास्तव्यास आहेत. त्या तुलनेत शहरातील वाहतूक व्यवस्था तोकडी आहे.

वाहतुकीबाबचे नियोजन करण्यात संबंधित यंत्रणा आणि प्रशासन कमी पडत असल्याचे दिसून येते. त्यामुळे त्याचा नाहक त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे. वाकड येथील भूमकर चौकातून हिंजवडीकडे जाणाऱ्या चौपदरी भुयारी मार्गाचे मुंबई-बेंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर आठ पदरी भुयारी मार्ग करून वाहतुकीची कोंडी सोडविण्याची मागणी आहे. भूमकर चौकात दररोज सकाळी साडेआठ ते अकरापर्यंत तसेच सायंकाळी पाच ते रात्री नऊपर्यंत वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक हैराण झाले आहेत..............भूमकर चौकाला पर्यायी मार्गाची आवश्यकता भूमकर चौकामध्ये डाव्या बाजूला सातारा, बेंगळुरुकडे जाणार अरुंद रस्ता आहे. तसेच उजव्या बाजूला ताथवडेकडे जाणारा रस्ता सुमारे १५ फुटी रस्तादेखील अरुंद आहे. त्याचप्रमाणे पुलाच्या बोगद्याच्या उजव्या बाजूला पिंपरी-चिंचवड शहरातून राष्ट्रीय महामार्गाला मुंबईकडे जाणारा अरुंद रस्ता आहे व डाव्या बाजूने बेंगळूरु-सातारा मार्गावरून पिंपरी-चिंचवड शहरात येणारा रस्ता अरुंद आहे. त्यामुळे वाहतूककोंडी होते. कात्रजमार्गे पिंपरी-चिंचवडमध्ये येणाºया वाहनचालकांनाही कोंडीचा सामना करावा लागतो. हिंजवडीकडून येणाºया वाहनचालकांनाही या समस्येला सामोरे जावे लागते. तासन्तास या वाहतूक कोंडीत अडकून पडत आहेत. त्यामुळे भूमकर चौकाला पर्यायी मार्गाची आवश्यकता आहे. .............अन्यथा उच्च न्यायालयात जनहित याचिका वाहतूककोंडी सोडविण्यासाठी दोन महिन्यांत संबंधित प्रशासनाने योग्य ती ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी चिंचवड प्रवासी संघातर्फे केली आहे. समस्या न सोडविल्यास उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन देण्यात आले आहे. संघाचे अध्यक्ष गुलामअली भालदार, एन.डी. भोसले, निर्मला माने, मुकेश चुडासमा, संभाजी बारणे आदींनी मागणी केली आहे............भूमकर चौकात सातत्याने वाहतूक कोंडी होते. असे असतानाही वाहतूक पोलिसांकडून ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. केवळ तात्पुरती उपाययोजना होत असल्याने समस्या कायम आहे. विविध प्रयोग करुनही कोंडी फोडण्यात पोलिसांना यश आलेले नाही. संबंधित यंत्रणांच्या उदासीनतेचा फटका आयटीयन्स तसेच अन्य वाहनचालकांना बसत आहे. तसेच कोंडीमुळे शहरातील प्रदुषणात भर पडत आहे.

टॅग्स :wakadवाकडITमाहिती तंत्रज्ञानTrafficवाहतूक कोंडी