शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

...तेव्हा भारतीय जवान देवदूत म्हणून धावून आले; अमरनाथ यात्रेत थरकाप उडालेल्या भाविकांचा अनुभव

By नारायण बडगुजर | Updated: July 31, 2022 13:08 IST

जवानांमुळेच अमरनाथ यात्रा सफल होऊ शकते, हे त्यावेळी समजले

पिंपरी : अमरनाथ येथे शिवलिंगाचे दर्शन घेतल्यानंतर काही क्षणातच आकाश अंधारून आले. भरदुपारी काळोख झाला. त्यावेळी अमरनाथ गुफेपासून पंचतरणीपर्यंतचे चार किलोमीटर अंतर भरपावसात चालत जाताना सर्वांचाच थरकाप झाला होता. हा काळोख म्हणजे जणू काळच आहे, असे वाटून मनात भीतीचे काहूर उठले होते. तेव्हा सैन्य दलाचे जवान मदतीला धावून आले. आमच्यासाठी खऱ्या अर्थाने ते देवदूतच ठरले. त्यांच्यामुळेच अमरनाथ यात्रा सफल होऊ शकते, हे त्यावेळी समजले, असा अनुभव धनकवडीचे राहुल महाराज तळेकर शास्त्री यांनी कथन केला.

पुणे व पिंपरी-चिंचवडसह परिसरातील ५५ भाविकांचा एक गट अमरनाथ यात्रेसाठी गेला आहे. यात धनकवडी येथील राहुलमहाराज तळेकर हे आहेत. तळेकर व इतर भाविक जण २७ जुलैला दुपारी बाराच्या सुमारास अमरनाथ गुहेजवळ पोहचले. त्यातील काही जणांना लगेचच दर्शन घेता आले. मात्र १९ जणांना दर्शनासाठी अडीच तासाचा वेळ गेला. दरम्यान, दुपारी अडीचच्या सुमारास वातावरणात मोठा बदल झाला. ढगांची गर्दी झाल्याने अंधारून आले. त्यामुळे सैन्य दलाच्या जवानांनी भाविकांना सूचना केली. त्यानुसार भाविकांनी तेथून बालटालच्या दिशेने निघण्यासाठी लगबग केली. दरम्यान, जोरदार पाऊस सुरू झाला. तसेच भरदुपारी मोठा काळोख झाला. त्यामुळे सर्वच भाविक घाबरले. गुफेपासून पंचतरणी येथे १९ भाविक पोहचले असता पायी मार्गावर दरड कोसळली. त्यामुळे पंचतरणीपासून बालटालच्या दिशेने येणारा मार्ग तसेच हेलिकाॅप्टर सेवाही बंद करण्यात आली. जवानांनी दोन ते अडीच हजार भाविकांना पंचतरणी येथे थांबवले.

काळोख आणि पाऊस कमी होत नव्हता. त्यामुळे बुधवारी भाविकांना पंचतरणी येथे मुक्काम करावा लागला. वातावरणात बदल होईल या अपेक्षेने पुणे, पिंपरीतील भाविकांसह शेकडो भाविक गुरुवारी (दि. २८) पहाटे साडेपाचपासून हेलिपॅडवर पोहचले. मात्र, दिवसभर वातावरण खराबच राहिले. त्यामुळे भाविकांना हेलिपॅडवर दिवसभर एकाच ठिकाणी बसून रहावे लागले. पावसामुळे लंगर घेण्यासही त्यांना जाणे शक्य झाले नाही. सोबत असलेली बिस्किटे आणि पाणी यावर दिवस काढावा लागला. हेलिकाॅप्टर सेवा सुरू होणार नसल्याने दुपारी तीननंतर भाविक हेलिपॅडवरून पंचतरणी येथे पालाकडे पोहचले.

पंचतरणी येथे गुरुवारी मुक्काम करावा लागला. मुक्कामादरम्यान जवानांनी सर्व भाविकांशी संवाद साधला. मनोधैर्य उंचावले. खचून जाऊ नका, सगळे सुरळीत होईल. तुम्ही सगळेजण सुरक्षित पोहोचाल, असे जवानांकडून सातत्याने सांगण्यात येत होते, त्यामुळे भाविकांना बळ मिळाले. शुक्रवारी सकाळीही पावसाने हजेरी लावली. मात्र, वातावरण निवळले. त्यामुळे सकाळी नऊपासून हेलिकाॅप्टर सेवा सुरू झाली आणि सर्व भाविक सुरक्षितपणे बालटाल येथे दाखल झाले.

जवानांनी पाणी, अन्न दिले

गुफेपासून पंचतरणीपर्यंत चालत जाणाऱ्या भाविकांना जवानांनी त्यांच्याकडील बिस्कीट, खाद्यपदार्थ तसेच पाणी दिले. त्यामुळे दोन आजींना मोठा दिलासा मिळाला. तसेच एका ज्येष्ठ नागरिकालाही धाप लागून त्रास जाणवत होता. त्यालाही जवानांनी मदत केली. त्यामुळे तो भाविकही पालापर्यंत पोहोचू शकला.

''ढगफुटी झाली, दरड कोसळली, नदीला महापूर आला तर काय होईल, अशा अनेक प्रश्नांनी मनात भीती घातली होती. बालटाल येथून परतीच्या प्रवासातही कंगण या गावाजवळ पावसामुळे दरड कोसळली. त्यामुळे आमची बस एक तास थांबविली. तेव्हा आम्ही सर्व भाविक घाबरलो होतो. भारतीय जवानांनी दरड बाजूला केल्यानंतर प्रवास सुरू झाला. जवानांमुळेच ही यात्रा सफल झाली. त्यांच्यामुळेच भाविक सुरक्षित राहतात. त्यामुळे ते देवदूतच आहेत. - राहुल महाराज तळेकर शास्त्री, धनकवडी, पुणे'' 

टॅग्स :PuneपुणेAmarnath Yatraअमरनाथ यात्राSoldierसैनिकIndian Armyभारतीय जवान