शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
2
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
3
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
4
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
5
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
6
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
7
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
8
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
9
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
10
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
11
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
12
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
13
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
14
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
15
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
16
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
17
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
18
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
19
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
20
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!

पहलगामच्या बैसरण घाटीचा रस्ता बिकट अन् किचकट, एकही सुरक्षारक्षक नाही, आकुर्डीतील पर्यटकाचा अनुभव

By विश्वास मोरे | Updated: April 23, 2025 19:54 IST

पहलगामच्या या भागात एकही सुरक्षा दलाचा एकही जण पाहायला मिळाला नाही, फक्त मुख्य रस्त्यावर सुरक्षादलाचे सैनिक होते

पिंपरी : मी आणि पत्नी १५ एप्रिलला काश्मीर फिरण्यासाठी आलो आहे. लेह लडाखला जाताना रस्त्यात पेहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला आहे, असे कळताच पुढचे फिरण्याचे नियोजन रद्द केले आहे. आम्ही परत श्रीनगरला आलो. पेहलगाम बैसरण घाटी पर्यटनस्थळ असतानाही येथे एकही सुरक्षारक्षक दिसून आला नाही, हा रस्ता खूप बिकट आणि किचकट असल्यामुळे दहशतवाद्यांनी हे ठिकाण निवडले असावे, असे सांगत होते आकुर्डीतील नागरिक बशीर सुतार. 

बैसरण घाटी येथे एक दिवस अगोदरच बशीर सुतार कुटुंब गेले होते. सुतार म्हणाले, 'काल पहलगाममध्ये हल्ला झाला आहे, असे कळाले. त्यामुळे रात्रीच श्रीनगरला आलो. जिथे हल्ला झाला त्या ठिकाणी एक दिवस आधीच फिरून आलो होतो. त्याठिकाणी रस्ता खूप अरुंद आहे. तिथे घोड्याशिवाय जाता येत नाही. कमीत कमी एक ते दीड तास लागतो. या ठिकाणास मिनी स्वित्झर्लंड असेही म्हणतात. येथे बजरंगी भाईजानमधील मुन्नीचजे घर दाखवले आहे, ते येथे आहे. त्यामुळे इथे पर्यटक येत असतात. परंतु, येथे एकही सुरक्षा दलाचा एकही जण पाहायला मिळाला नाही. फक्त मुख्य रस्त्यावर सुरक्षादलाचे सैनिक होते. घाटीचा हा रस्ता खूप बिकट आणि किचकट असल्यामुळे दहशतवाद्यांनी हे ठिकाण निवडले असावे. आम्ही उर्वरित कार्यक्रम रद्द केला आहे. आमचे दिनांक २८ एप्रिलला श्रीनगर ते मुंबई तिकीट होतं, ते रद्द करून २४ एप्रिलचे तिकीट पुन्हा आरक्षित केलं आहे.

 दहशतवादी हल्ल्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये रोजगार ठप्प झाला आहे. घोड्यावाले, हॉटेल, रस्त्यावर छोटी-छोटी दुकाने आहेत. बोटीमध्येमध्ये फिरवणारे जे लोक असतात, आता त्यांचाही रोजगार गेला आहे. आज श्रीनगरला रस्त्यावर एकही गाडी दिसली नाही. पर्यटकांची गर्दी असणारे शहरात भकास वातावरण दिसून आले. सर्व काही ठप्प झाले आहे. यासाठी सरकारने कठोर पाऊले उचलली पाहिजेत. वातावरण पूर्ववत व्हायला हवे. आज जेव्हा देशाचे गृहमंत्री या ठिकाणी आले तेव्हा त्यांच्यासाठी सर्व सुरक्षा दले तिथे हजर होती. मात्र, काल पर्यटकांच्या सुरक्षेसाठी काहीच व्यवस्था नव्हती, याचे खूप दुःख वाटते. पर्यटकांचा जीव इतका स्वस्त झाला आहे का? घडलेली घटना दुर्दैवी आहे.'

टॅग्स :PuneपुणेPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरtourismपर्यटनSocialसामाजिकTerrorismदहशतवाद