शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

रावेत बंधाऱ्यात दलदल; कचऱ्यातून पाणीउपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 2:46 AM

गाळ साचल्याने जलपर्णी व कचऱ्याने दलदल झाली आहे. या दुर्गंधीयुक्त पाण्यातून उपसा केला जात असूनही हेच पाणी प्रक्रियेनंतर पिंपरी-चिंचवडकरांच्या गळी उतरविले जाते.

पिंपरी : पवना नदीतून येणाऱ्या पाण्याचा प्रवाह कमी झाल्याने रावेत बंधाऱ्यातील पाणी पातळीत घट होत आहे. या बंधाऱ्यातून पाणी उपसा केला जातो. त्या ठिकाणी कोणतीही सुरक्षाव्यवस्था नसल्याने बंधाऱ्यात कचऱ्याचे साम्राज्य वाढले आहे. गाळ साचल्याने जलपर्णी व कचऱ्याने दलदल झाली आहे. या दुर्गंधीयुक्त पाण्यातून उपसा केला जात असूनही हेच पाणी प्रक्रियेनंतर पिंपरी-चिंचवडकरांच्या गळी उतरविले जाते.शहराला पवना नदीतून १०० टक्के पाणीपुरवठा केला जातो. पवना नदीवर रावेत येथे बंधारा बांधला आहे. या बंधाºयातून रोज ४७० एमएलडी पाणी उपसा करून त्यावर प्रक्रिया केली जाते. त्यानंतर पिण्याच्या पाण्याचा संपूर्ण शहराला पुरवठा केला जातो. सध्या संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने अपुरा पुरवठा होत आहे.शहरात साथीच्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. मात्र, महापालिकेच्या आरोग्य व पाणीपुरवठा विभागाकडून योग्य दक्षता घेतली जात नाही. रावेत बंधाºयाच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था नसल्याने कचरा टाकला जात आहे. तसेच, परिसरातील राडारोडा येथे टाकण्यात येतो. त्यामुळे बंधाºयात मोठ्या प्रमाणात गाळ साचला असून, जलपर्णी निर्माण झाली आहे. या दलदलीच्या व दुर्गंधीयुक्त पाण्याचा उपसा शुद्धीकरण केंद्राकडे होत आहे. त्यामुळे रोगराई आणखी पसरण्याची भीती स्थानिक नागरिकांनी ‘लोकमत’शी बोलताना केली.रावेत बंधारा येथे सुरक्षाव्यवस्था नसल्याने कोणीही सहजपणे या ठिकाणी कचरा वा राडारोडा टाकून जाते. या ठिकाणाहून पिंपरी महापालिका, जलसंपदा विभाग व एमआयडीसी यांच्याकडून उपसा केला जातो. मात्र, तिन्ही विभागांत समन्वय नसल्याने अनेक वर्षांपासून येथे गाळ साचून दलदल निर्माण झाली आहे. येथील गाळ काढण्याची आवश्यकता आहे, अशी माहिती स्थानिक कार्यकर्ते संजय फडके व विजय भोंडवे यांनी दिली.

टॅग्स :ravetरावेत