शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
2
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
3
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
4
जगदीप धनखड बेपत्ता? उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून संपर्कात नाहीत; विरोधकांनी सरकारला घेरले
5
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
6
मायेची सावली! भावासाठी बहीण झाली ढाल; किडनी डोनेट करुन दिलं जीवदान, रक्षाबंधन झालं खास
7
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट
8
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
9
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
10
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य
11
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
12
Video - २ रुपयांची राखी १०० रुपयांना; दुकानदाराने सांगितला व्यवसायामागच्या 'चालूगिरी'चा खेळ
13
Monsoon Travel : कुर्ग की मुन्नार; पावसाळी पिकनिकसाठी कोणतं ठिकाण ठरेल बेस्ट?
14
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
15
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
16
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
17
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  
18
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
19
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
20
अतूट नातं! १७ वर्षांपासून 'या' अभिनेत्याला राखी बांधतेय ऐश्वर्या राय; प्रेमाने मारते 'अशी' हाक

सरकारी कर्मचा-यांवर हल्ला करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 17:04 IST

सरकारी अधिकारी, कर्मचा-यांना दमबाजी, मारहाण करणे त्यांच्यावर लोकप्रतिनिधींकडून हल्ला होण्याचे प्रमाण वाढले आहे. महापालिकेत गेल्या सहा महिन्यांत दोन प्रकार घडले आहेत.

ठळक मुद्देशासकीय अधिकारी, कर्मचा-यांवर हल्ला करणा-या व्यक्तीच्या विरोधातील खटला सहा महिन्यांच्या आत चालवून त्याचा निकाल दिला जाणार आहे.दोषी ठरलेल्या व्यक्तीस यापुढे पाच वर्षे शिक्षा भोगावी लागणार

पिंपरी : महापालिकेतील कर्मचारी, अधिकाऱ्यांना मारहाण करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याला आळा बसावा म्हणून राजपत्रित अधिकारी महासंघाने प्रयत्न केले होते. त्यानुसार राज्य सरकारने भारतीय दंडविधानाच्या कलमात सुधारणा केल्या आहेत. याबाबतचे आदेश सात जूनला दिले आहेत. त्यामुळे हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.  सरकारी अधिकारी, कर्मचा-यांना दमबाजी, मारहाण करणे त्यांच्यावर लोकप्रतिनिधींकडून हल्ला होण्याचे प्रमाण वाढले आहे. महापालिकेत गेल्या सहा महिन्यांत दोन प्रकार घडले आहेत. निगडीतील एका नगरसेवकांने पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्याला काळे फासले होते. भारतीय दंडविधान कलम ३३२, ३५३ अन्वये दाखल होणारे खटले यापुढे दखलपात्र, अजामीनपात्र झाले असून ते सत्र न्यायालयात चालविले जाणार आहेत. राजपत्रित अधिकारी महासंघाने भारतीय दंडविधान आणि  दंडप्रक्रिया संहितेच्या कलमांमध्ये सुधारणा होण्यासाठी सातत्याने  प्रयत्न केले होते. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. या बदलामुळे शासकीय अधिकारी, कर्मचा-यांवर हल्ला करण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. या बदलामुळे भारतीय दंडविधानाच्या कलम ३३२ खाली दोषी ठरलेल्या व्यक्तीस यापूर्वी तीन वर्षे शिक्षेची तरतूद होती. तसेच कलम ३५३ खाली दोषी ठरलेल्या व्यक्तीस दोन वर्षे शिक्षेची तरतूद होती. आता या दोन्ही कलमांखाली दोषी ठरलेल्या व्यक्तीस यापुढे पाच वर्षे शिक्षा भोगावी लागणार आहे. दंडप्रक्रिया संहितेच्या कलम ३०९ मधील बदलामुळे शासकीय अधिकारी, कर्मचा-यांवर हल्ला करणा-या व्यक्तीच्या विरोधातील खटला सहा महिन्यांच्या आत चालवून त्याचा निकाल दिला जाणार आहे.  महापालिकेचे मुख्य लेखापाल व राजपत्रित अधिकारी महासंघाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य राजेश लांडे म्हणाले, कलमामध्ये सुधारणा करण्यासाठी राजपत्रित अधिकारी महासंघ गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा करत होता. आता यामध्ये बदल केले आहेत. या बदलामुळे भारतीय दंडविधानाच्या कलम ३३२ खाली दोषी ठरलेल्या व्यक्तीस यापूर्वी तीन वर्षे शिक्षेची तरतूद होती. तसेच कलम ३५३ खाली दोषी ठरलेल्या व्यक्तीस दोन वर्षे शिक्षेची तरतूद होती. आता या दोन्ही कलमांखाली दोषी ठरलेल्या व्यक्तीस यापुढे पाच वर्षे शिक्षा भोगावी लागणार आहे. दंडप्रक्रिया संहितेच्या कलम ३०९ मधील बदलामुळे शासकीय अधिकारी, कर्मचा-यांवर हल्ला करणा-या व्यक्तीच्या विरोधातील खटला सहा महिन्यांच्या आत चालवून त्याचा निकाल दिला जाणार आहे. हल्ल्यांच्या घटनांना आळा बसणार आहे. 

टॅग्स :PuneपुणेGovernmentसरकारEmployeeकर्मचारी