शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
3
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
4
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
5
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
6
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
7
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
8
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
9
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
10
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
11
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
12
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
13
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
14
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
15
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
16
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
17
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
18
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
19
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
20
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...

सरकारी कर्मचा-यांवर हल्ला करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 17:04 IST

सरकारी अधिकारी, कर्मचा-यांना दमबाजी, मारहाण करणे त्यांच्यावर लोकप्रतिनिधींकडून हल्ला होण्याचे प्रमाण वाढले आहे. महापालिकेत गेल्या सहा महिन्यांत दोन प्रकार घडले आहेत.

ठळक मुद्देशासकीय अधिकारी, कर्मचा-यांवर हल्ला करणा-या व्यक्तीच्या विरोधातील खटला सहा महिन्यांच्या आत चालवून त्याचा निकाल दिला जाणार आहे.दोषी ठरलेल्या व्यक्तीस यापुढे पाच वर्षे शिक्षा भोगावी लागणार

पिंपरी : महापालिकेतील कर्मचारी, अधिकाऱ्यांना मारहाण करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याला आळा बसावा म्हणून राजपत्रित अधिकारी महासंघाने प्रयत्न केले होते. त्यानुसार राज्य सरकारने भारतीय दंडविधानाच्या कलमात सुधारणा केल्या आहेत. याबाबतचे आदेश सात जूनला दिले आहेत. त्यामुळे हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.  सरकारी अधिकारी, कर्मचा-यांना दमबाजी, मारहाण करणे त्यांच्यावर लोकप्रतिनिधींकडून हल्ला होण्याचे प्रमाण वाढले आहे. महापालिकेत गेल्या सहा महिन्यांत दोन प्रकार घडले आहेत. निगडीतील एका नगरसेवकांने पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्याला काळे फासले होते. भारतीय दंडविधान कलम ३३२, ३५३ अन्वये दाखल होणारे खटले यापुढे दखलपात्र, अजामीनपात्र झाले असून ते सत्र न्यायालयात चालविले जाणार आहेत. राजपत्रित अधिकारी महासंघाने भारतीय दंडविधान आणि  दंडप्रक्रिया संहितेच्या कलमांमध्ये सुधारणा होण्यासाठी सातत्याने  प्रयत्न केले होते. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. या बदलामुळे शासकीय अधिकारी, कर्मचा-यांवर हल्ला करण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. या बदलामुळे भारतीय दंडविधानाच्या कलम ३३२ खाली दोषी ठरलेल्या व्यक्तीस यापूर्वी तीन वर्षे शिक्षेची तरतूद होती. तसेच कलम ३५३ खाली दोषी ठरलेल्या व्यक्तीस दोन वर्षे शिक्षेची तरतूद होती. आता या दोन्ही कलमांखाली दोषी ठरलेल्या व्यक्तीस यापुढे पाच वर्षे शिक्षा भोगावी लागणार आहे. दंडप्रक्रिया संहितेच्या कलम ३०९ मधील बदलामुळे शासकीय अधिकारी, कर्मचा-यांवर हल्ला करणा-या व्यक्तीच्या विरोधातील खटला सहा महिन्यांच्या आत चालवून त्याचा निकाल दिला जाणार आहे.  महापालिकेचे मुख्य लेखापाल व राजपत्रित अधिकारी महासंघाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य राजेश लांडे म्हणाले, कलमामध्ये सुधारणा करण्यासाठी राजपत्रित अधिकारी महासंघ गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा करत होता. आता यामध्ये बदल केले आहेत. या बदलामुळे भारतीय दंडविधानाच्या कलम ३३२ खाली दोषी ठरलेल्या व्यक्तीस यापूर्वी तीन वर्षे शिक्षेची तरतूद होती. तसेच कलम ३५३ खाली दोषी ठरलेल्या व्यक्तीस दोन वर्षे शिक्षेची तरतूद होती. आता या दोन्ही कलमांखाली दोषी ठरलेल्या व्यक्तीस यापुढे पाच वर्षे शिक्षा भोगावी लागणार आहे. दंडप्रक्रिया संहितेच्या कलम ३०९ मधील बदलामुळे शासकीय अधिकारी, कर्मचा-यांवर हल्ला करणा-या व्यक्तीच्या विरोधातील खटला सहा महिन्यांच्या आत चालवून त्याचा निकाल दिला जाणार आहे. हल्ल्यांच्या घटनांना आळा बसणार आहे. 

टॅग्स :PuneपुणेGovernmentसरकारEmployeeकर्मचारी