शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

चार तासांनी पोहोचले कर्मचारी; वीजतार तुटून पडल्यानंतरही महावितरणकडून चालढकल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 03:07 IST

नागरिकांनी या घटनेची माहिती महावितरण कंपनीला देऊनही या घटनेची गांभीर्याने दखल घेतली गेली नसल्याने जीवितहानी घडल्यावरच महावितरण कंपनीचे अधिकारी जागे होणार आहेत का, असा संतप्त सवाल दिघीकरांनी केला आहे.

दिघी : आदर्शनगरमधील छत्रपती संभाजीमहाराज चौक व आजूबाजूच्या परिसरातील विद्युत खांबावरून दिला गेलेला विद्युतपुरवठा वारंवार खंडित होत आहे. शिवाय अचानक तारा तुटून पडल्याच्या घटना सारख्या घडत असल्याची ताजी घटना हिंदू कॉलनीमध्ये सोमवारी सकाळी घडली. नागरिकांनी या घटनेची माहिती महावितरण कंपनीला देऊनही या घटनेची गांभीर्याने दखल घेतली गेली नसल्याने जीवितहानी घडल्यावरच महावितरण कंपनीचे अधिकारी जागे होणार आहेत का, असा संतप्त सवाल दिघीकरांनी केला आहे.सकाळी सात वाजता अचानक स्पार्किं ग होऊन वीजप्रवाह सुरू असलेली तार तुटून खाली पडली. नशीब बलवत्तर सुदैवाने कुठलीही जीवितहानी वा कुणाला इजा झाली नाही. तार तुटून खाली पडताच अर्थिंगमुळे तारेमधील वीजपुरवठा खंडित झाला. परिसरातील वीजपुरवठा खंडित होऊनसुद्धा नागरिकांनी काळजी घेत नागरिकांना सजग केले. या वेळी स्थानिक नागरिकांनी वीजवितरण कंपनीच्या तक्रार निवारण कक्षाच्या नंबरवर फोन करून घटनेची माहिती दिली. मात्र कर्मचाऱ्यांनी दुसºया नंबरवर फोन करून तक्रार देण्यास सांगितले. दुसºया नंबरवर तक्रार देऊनही तीन चार तास उलटूनही या घटनेची गांभीर्याने दखल घेण्याची महावितरण कंपनीच्या संबंधित अधिकारी आणि कर्मचाºयांनी तसदी घेतली गेली नाही. त्यामुळे संतप्त नागरिकांनी महावितरण कंपनीच्या गहाळ कारभारावर आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.खबरदारी : थोडक्यात बचावली मुलेज्ञानेश्वर पार्कमध्ये सुद्धा स्पार्किंग होऊन वीजप्रवाह सुरू असलेली वायर जमिनीलगत आली होती. अचानक घडलेल्या या घटनेने परिसरात खेळणाºया लहान मुलांना विजेचा धक्का बसण्यापासून थोडक्यात बचावला. या वेळी परिसरातील दीपक कुलकर्णी यांनी वेळीच खबरदारी घेत तुटलेल्या वायरींना वर बांधून ठेवले. ही माहिती अधिकाºयांना देण्यात आली. या घटनेतसुद्धा कर्मचारी यांनी वीजपुरवठा खंडित झाला नाही व तशी कुणाची तक्रार नसल्याने काम न करता व या घटनेचे कारण न शोधता काढता पाय घेतला.घटनांमध्ये होतेय सातत्याने वाढवीज तारा तुटून पडल्याच्या घटना आदर्शनगर परिसरात वारंवार घडत असल्याचे समोर आले आहे. मागील दोन महिन्यांपूर्वी दिघीतील सह्याद्री कॉलनीमध्ये तारा तुटल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला होता. त्या वेळेससुद्धा महावितरण कंपनीची दिरंगाई प्रकर्षाने पुढे आली होती. परिसरातील छत्रपती संभाजीमहाराज चौकातील बाजारपेठ, आदर्शनगर परिसर, ज्ञानेश्वर पार्क, गजाननमहाराज नगर अशा अनेक भागांतील भूमिगत केबलची कामे प्रलंबित आहेत. या ठिकाणी एकाच विद्युत खांबावर असलेले वायरींचे जाळे झाल्याने वीजपुरवठा खंडित होणे, तारा तुटून पडल्याच्या घटना घडत आहेत. यावर उपाययोजना करून भूमिगत केबलची कामे होणे आवश्यक आहे.

टॅग्स :electricityवीजmahavitaranमहावितरण