शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

लाखोंच्या फटाक्यांचा धूर; लग्न, वाढदिवसानिमित्त केली जाते आतषबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 2:57 AM

सध्या लग्नसराईचा धूमधडाका जोरात सुरू आहे. शहरातील सर्वच मंगल कार्यालयांत तारखा शिल्लक नाहीत. लग्न म्हटले की बँडसह पारंपरिक वाजंत्री वगैरे असतेच. याला जोडून सध्या फटाक्यांची आतषबाजी करण्याकडे कल वाढला आहे.

रहाटणी : सध्या लग्नसराईचा धूमधडाका जोरात सुरू आहे. शहरातील सर्वच मंगल कार्यालयांत तारखा शिल्लक नाहीत. लग्न म्हटले की बँडसह पारंपरिक वाजंत्री वगैरे असतेच. याला जोडून सध्या फटाक्यांची आतषबाजी करण्याकडे कल वाढला आहे. बहुतांश लग्नसोहळे सायंकाळी होत असल्याने या प्रकारांत वाढ होत आहे. आनंद व्यक्त करण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात आतषबाजी करण्यात येत आहे. यातून ध्वनी आणि वायुप्रदूषण होत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यावर तातडीने उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.फटाक्यांच्या धुरामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक,गरोदर महिला यांना अनेक प्रकारच्या आजाराचा सामना करावा लागत आहे; तसेच मंगल कार्यालय परिसरातील नागरिकांचे तर वायू व ध्वनिप्रदूषणामुळे आरोग्य धोक्यात आले आहे.पिंपरी-चिंचवड शहरातील बहुतांश मंगल कार्यालये दाट नागरी वस्तीत आहेत. लग्न म्हटले की आतषबाजी असे समीकरण सर्वत्र पाहायला मिळत आहे. आतषबाजीचे सर्वत्र जणू फॅड असल्यासारखी परिस्थिती आहे. मात्र या आतषबाजीसाठी फटाके किती वाजवावेत याचे भान कोणालाही राहिलेले नाही. फटाक्यांच्या कानठळ्या बसवणाऱ्या आवाजामुळे हृदय रुग्णांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास होतो.लग्नाच्या वरातीत आणि मंगलाष्टके पूर्ण होताच फटाक्यांची आतिषबाजी केली जाते. हजारो फटाक्यांच्या माळा व आकाशात झेपावणारे फटाके वाजविले जातात. त्यामुळे ध्वनिप्रदूषण मोठ्या प्रमाणात होते. यासह वायुप्रदूषणही होत आहे. ध्वनिप्रदूषण व वायुप्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढल्याने मंगल कार्यालय परिसरातील नागरिकांना अनेक आजारांचा सामना करावा लागत आहे. एकीकडे लग्नाचा आनंद साजरा करण्यासाठी फटाक्यांवर रुपये लाखोंची उधळपट्टी केली जात आहे. या आनंदाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. फटाक्यांच्या धुरामुळे लहान मुलांमध्ये दम्यासारख्या आजाराचे प्रमाण वाढल्याचे डॉक्टर सांगत आहेत. दम्याचा आजार असलेल्या जेष्ठांचे जगणे कठीण झाले आहे.प्रदूषण रोखण्याचा देखावाएका बाजूला शासन ध्वनिप्रदूषण, वायुप्रदूषण, जलप्रदूषण रोखण्यासाठी अनेक उपाययोजना करीत असल्याचा देखावा करीत असल्याचे दिसून येत आहे. यावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणाच कुचकामी ठरली असल्याने सर्वसामान्य नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेकांना श्वसनाचा आजार जडला आहे. वायुप्रदूषणमुक्तीचा नारा देणाºयाच अनेक राजकीय व्यक्ती आणि कुटुंबीयांच्या लग्नसोहळ्यातून फटाके वाजविण्यात येतात.‘भाऊ’, ‘दादां’चा वाढदिवसशहरातील प्रत्येक घरात राजकीय पक्षांनी प्रवेश मिळविला आहे. घराघरांपर्यंत पोचलेल्या या राजकीय पक्षांमुळे शहरातील गल्ली-बोळातही ‘भाऊ’, ‘दादा’ तयार झाले आहेत. अशा ‘भाऊ’ आणि ‘दादां’ना स्वत:चा वाढदिवस दिमाखात साजरा करण्याची हौस असते. या हौसेपोटी मध्यरात्री फटाके वाजविण्यात येतात. मोठी आतषबाजी करण्यात येते. त्यामुळे गल्ली बोळातील या ‘भाऊ’ आणि ‘दादां’च्या वाढदिवसाच्या आतषबाजीचा शहरवासीयांना नाहक त्रास सहन करावा लागतो.विद्यार्थ्यांना नाहक त्राससध्या परीक्षांचा कालावधी आहे. त्यामुळे विद्यार्थी अभ्यासात व्यस्त असतात. अशा विद्यार्थ्यांना फटाक्यांच्या आवाजाचा त्रास सहन करावा लागत आहे. मंगल कार्यालय परिसरातील विद्यार्थ्यांना याचा मोठा त्रास होत आहे. त्यामुळे यावर उपाययोजना होणे आवश्यक आहे.मंगल कार्यालयांवर कारवाईची गरजफटाके वाजविणे आणि आतषबाजी याबाबत नियमावली आवश्यक आहे. मंगल कार्यालय आणि परिसरात फटाके वाजविणे आणि आतषबाजीला निर्बंध आवश्यक आहेत. अतिप्रमाणात फटाके वाजविण्यात येणाºया मंगल कार्यालय मालक आणि चालकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड