शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

कचरा डेपोला आग लागल्यामुळे रुपीनगर परिसरात धुराचे लोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2019 19:40 IST

तळवडे येथील रुपीनगरच्या पश्चिम दिशेला असलेल्या मोकळ्या मैदानात देहुरोड कॅन्टाॅन्मेंट बोर्डाचा कचरा डेपो आहे. आग लागल्यामुळे या कचरा डेपोतुन निघणारे धुराचे लोट रुपीनगर परिसरात येत असल्याचे नागरिकांनी पाहिले.

(पिंपरी चिंचवड) : तळवडे येथील रुपीनगरच्या पश्चिम दिशेला असलेल्या मोकळ्या मैदानात देहुरोड कॅन्टाॅन्मेंट बोर्डाचा कचरा डेपो आहे. आग लागल्यामुळे या कचरा डेपोतुन निघणारे धुराचे लोट रुपीनगर परिसरात येत असल्याचे नागरिकांनी पाहिले.धुरामुळे परिसरातील हवा प्रदुषित झाल्यामुळे नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.

     देहुरोड परिसरातील कचरा रुपीनगर येथे पश्चिम दिशेला असलेल्या कचरा डेपोमध्ये मोकळ्या मैदानात टाकला जातो. या कचऱ्याला शुक्रवारी (दि.३१) रोजी सकाळी लागली असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. अाग विझवण्यासाठी तातडीने अग्निशामक विभागाचा बंब व कर्मचारी दाखल होतील अशी नागरिकांची अपेक्षा असताना, दुपारी १२ वा. सुमारास देहुरोड कॅन्टोमेंट बोर्डाचे आरोग्य विभागाचे कर्मचारी एक जेसीबी मशिन व दोन पाण्याच्या टँकर सह दाखल झाले होते, कर्मचारी टँकरमधील पाणी प्रेरशरच्या सहाय्याने पेटलेल्या कचऱ्यावर मारून आग विझवण्याचे प्रयत्न करत असुन कचऱ्याची आग लवकर विझण्याची शक्यता फारच कमी आहे.

   आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत मात्र कचऱ्याच्या आगितुन निघणारे धुराचे लोट पूर्वेकडे वाहणाऱ्या वाऱ्यासोबत रुपीनगर परिसरात पसरत आहेत. रुपीनगर परिसरात घराचा दरवाजा उघडा ठेवला तर घरात धुर येतो संपूर्ण घर धुराने भरल्यामुळे गुदमरल्यासारखे होते, डोळ्यांची जळजळ होत असल्याने नागरिकांना घरात बसवत नाही, लहान मुले, वृद्ध तसे महिला दिवसभर घरी असल्यामुळे याचा मोठा त्रास सहन करावा लगत आहे.

      रुपीनगर येथील नागरिक, लोकप्रतिनिधी यांचा देहुरोड परिसरातील कचरा माळरानावर टाकण्यास विरोध आहे, या परिसरात कोणतीही प्रक्रिया न करता कचरा टाकला जातो. कचऱ्यामध्ये शिळे अन्नपदार्थ, भाजी मंडईतील कचरा, घरगुती कचरा, प्लास्टिक कागद आणि इतर टाकाऊ पदार्थांचा समावेश असतो, या कचऱ्यातून निघणारी दुर्गंधी वाऱ्याबरोबर रुपीनगर परिसरात पसरत असल्याने रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच बऱ्याच वेळा कचऱ्याला आग लागल्यामुळे धुराचा त्रासही रहिवाशांना होत असल्याने आरोग्य धोक्यात आले आहे. या समस्येपासून सुटका व्हावी यासाठी लोकप्रतिनिधी, नागरिक यांनी कॅन्टाॅन्मेंट बोर्डाला निवेदने दिली आहेत, मात्र देहुरोड कँन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाच्या वतीने कोणत्याही प्रतिसाद दिला जात नसल्याची तक्रार नागरिक करत आहेत.

टॅग्स :fireआगpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड