शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

"...अन् प्रतिदिन राजसिंहासनावर शोभून दिसे छत्रपती शिवराय"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2023 19:12 IST

गेल्या ३५० वर्षांच्या इतिहासात शिवराज्याभिषेक सोहळ्याविषयी देश व परदेशातील इतिहासकारांनी व संशोधकांनी अमूल्य लेखन केले आहे...

- हणमंत पाटील

पिंपरी : “पूर्वेकडील पर्वतांपासून ते पश्चिमेकडील समुद्रापर्यंत, तसेच दक्षिणेकडील रामेश्वराच्या सेतूपासून ते हिमालयापर्यंत असलेल्या अनेक राजांना छत्रपती शिवरायांनी जिंकून घेतले. जिंकलेल्या भूभागाचा शेतसारा म्हणून सर्व राजांना आपल्यासाठी कर देण्यास भाग पाडले. विद्वतजनांनी घालून दिलेल्या श्रोतधर्माचा अवलंब करून छत्रपतींनी रायगडावर स्वतःचा राज्याभिषेक करविला. 'छत्र-चामरे आदी राज चिन्हांसह ते प्रतिदिन राज सिंहासनावर शोभून दिसू लागले', असे राज्याभिषेक सोहळ्याचे वर्णन त्यावेळी युवराज म्हणून उपस्थित असलेल्या दस्तुरखुद्द छत्रपती संभाजी महाराज यांनी त्यांच्या ‘बुधभूषण’ या ग्रंथात केले आहे.

गेल्या ३५० वर्षांच्या इतिहासात शिवराज्याभिषेक सोहळ्याविषयी देश व परदेशातील इतिहासकारांनी व संशोधकांनी अमूल्य लेखन केले आहे. आजही तरुण इतिहास अभ्यासकांकडून त्यावर संशोधन व लेखन होत आहे. अशाच नव्या पिढीतील पुण्यातील सह्याद्री प्रतिष्ठानचे अनिल पवार यांनी वर्षभर सर्व विचारधारेच्या इतिहास संशोधकांनी शिवराज्याभिषेक सोहळ्याविषयी लिहिलेल्या ग्रंथाचा धांडोळा घेतला. इतिहास व संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांच्या मुख्य संपादकत्वाखाली 'शिव राज्याभिषेक : मध्ययुगीन भारताच्या इतिहासातील सर्वोच्च घटना' हा सुमारे ५५० पानांचा ग्रंथ साकारला जात आहे. इतिहास अभ्यासक डॉ. गणेश राऊत व चेतन कोळी यांनी संपादन साहाय्य केले आहे. या ग्रंथाचे लवकरच पुण्यात प्रकाशन होणार आहे.

समकालीन व सद्य:कालीन लेखकांची गुंफून...

वि. का. राजवाडे, कृष्णराव केळुसकर, गो. स. सरदेसाई, जदुनाथ सरकार, वा. सी. बेंद्रे, य. न. केळकर, सेतु माधवराव पगडी, ग. ह. खरे अशा थोर इतिहासकारांनी शिवराज्याभिषेकाविषयी विविधांगी केलेली मांडणी व विखुरलेले लेखन एका सूत्रात गुंफले आहे. शिवाय सद्य:कालीन डॉ. आ. ह. साळुंखे, डॉ. जयसिंगराव पवार, श्री. ग. भा. मेहेंदळे, डॉ. रमेश जाधव, डॉ. प्रकाश पवार आदी तज्ज्ञ लेखकांचे लेख या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक या घटनेकडे मराठ्यांच्या उज्ज्वल इतिहासाचे प्रातिनिधीक प्रतीक म्हणून पाहता येते. या घटनेवर अनेक मान्यवर इतिहासकारांनी वेगवेगळ्या दृष्टिकोनातून भाष्य केले. ही भाष्ये कधी एकमेकांना पूरक, तर कधी छेद देणारी ठरतात. महाराष्ट्राच्या भविष्यकालीन वाटचालीसाठी त्यांचा सूक्ष्म अभ्यासाची मुहूर्तमेढ म्हणजे हा समग्र ग्रंथ म्हणण्यास हरकत नसावी.

-डॉ. सदानंद मोरे, ‘शिवराज्याभिषेक’ ग्रंथाचे मुख्य संपादक.

टॅग्स :PuneपुणेShivrajyabhishekशिवराज्याभिषेकRaigadरायगडShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज