शहरं
Join us  
Trending Stories
1
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
2
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
3
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
4
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
5
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
6
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
7
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
8
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
9
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
10
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
11
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
12
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
13
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
14
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
16
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
17
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
18
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
19
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
20
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप

सतीश शेट्टी खून प्रकरण : सीबीआय यंत्रणाही तपासकामात अपयशी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2019 2:13 AM

माहिती अधिकार क्षेत्रातील कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्येला ९ वर्षांचा कालावधी उलटूनही मारेकऱ्यांचा तपास लावण्यात केंद्रीय गुन्हे अन्वेषण यंत्रणेस अपयश आले, अशी खंत सतीश शेट्टी यांच्या नवव्या स्मृती दिनानिमित्ताने एकत्रित आलेल्या माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

तळेगाव दाभाडे : माहिती अधिकार क्षेत्रातील कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्येला ९ वर्षांचा कालावधी उलटूनही मारेकऱ्यांचा तपास लावण्यात केंद्रीय गुन्हे अन्वेषण यंत्रणेस अपयश आले, अशी खंत सतीश शेट्टी यांच्या नवव्या स्मृती दिनानिमित्ताने एकत्रित आलेल्या माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. एवढेच नव्हे तर पुन्हा याप्रकरणी तपास व्हावा, अशी मागणी करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.तळेगाव येथे स्मृती दिनानिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमप्रसंगी नगरसेवक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते अरुण माने, भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाचे जिल्हाध्यक्ष राधेश्याम जगताप, विजय महाजन, जमीर नालबंद, राजेंद्र जव्हेरी, किशोर कवडे यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी सतीश शेट्टी यांच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा देण्यात आला.तळेगावात १३ जानेवारी २०१० मध्ये धारदार शस्त्राने वार करून दिवसाढवळ्या शेट्टी यांचा खून करण्यात आला. पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गालगतच्या ओझर्डे व पिंपोळीतील शेतकºयांच्या शेकडो एकर जमिनी बेकायदा मार्गाने बळकावल्याची माहिती मिळाल्याने शेट्टी यांनी याबाबत आवाज उठविला होता. माहिती अधिकारातून मिळालेल्या कगदपत्रांच्या आधारे त्यांनी पाठपुरावा केला. आठशे एकर जमिनीचे भूसंपादन रद्द करावे लागले होते. त्यानंतर शेट्टी यांना धमक्या आल्या होत्या. त्यांनी २००९ मध्ये पोलीस संरक्षणाची मागणी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडे केली होती़ मात्र, संरक्षण मिळण्याआधीच तळेगावात त्यांची हत्या करण्यात आली. शेट्टी यांनी माहिती अधिकारांतर्गत सरकारी जमिनीचा घोटाळाही उघडकीस आणला होता. या खूनप्रकरणी पोलीस यंत्रणेकडून योग्य प्रकारे तपास होत नसल्याची तक्रार सतीश शेट्टी यांचे बंधू संदीप शेट्टी यांनी केली होती. उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला होता. सीबीआयने २०१४ मध्ये वडगाव न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर केला. शेट्टी यांच्या मारेकºयांचा शोध घेण्यात तपास यंत्रणांना अपयश आले. सीबीआयकडे तपास देऊनही नऊ वर्षांच्या कालावधीनंतर काहीच निष्पन्न झाले नाही. याबद्दल आरटीआय कार्यकर्त्यांनी खंत व्यक्त केली आहे.>शेवटच्या श्वासापर्यंत न्यायासाठी लढणारसतीश शेट्टी हत्या प्रकरणातील सीबीआयने दिलेल्या क्लोजर रिपोर्ट विरोधात उच्य न्यायालयात दाद मागितली आहे. पुढील आठवड्यात या प्रकरणावर न्यायालयात सुनावणी होईल. तपास यंत्रणांनी हात टेकले असले तरी बंधू सतीश शेट्टी यांच्या मारेकºयांचा शोध घेण्यासाठी तसेच त्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ नये, यासाठी आमचा लढा सुरूच राहणार आहे. तपासयंत्रणेने चुकीच्या पद्धतीने काम केले आहे. आर्थिक सौदेबाजीचा खेळ झाल्याचा संशय आहे. सीबीआयने तपास थांबवला तरी न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास कायम आहे. जिवात जीव असेपर्यंत न्याय मिळविण्याचा प्रयत्न करणार आहे, असे संदीप शेट्टी यांनी सांगितले.