शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
2
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
3
ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
4
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
5
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
6
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
7
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
8
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
9
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
10
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
11
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
12
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
13
लॅपटॉप जास्त वेळ मांडीवर अन् फोन खिशात ठेवाल तर वडील होण्याचे स्वप्न राहील अधुरे; नपुंसक होण्याचा धोका
14
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
15
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
16
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित
17
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
18
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
19
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
20
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'

स्कूल बसकडून नियम धाब्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 03:29 IST

शहरात नियमांचे उल्लंघन करीत स्कूलबस राजरोसपणे धावत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना धोका निर्माण होऊ शकतो. एखादा अपघात झाल्यानंतर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) कारवाई होणार का? असा सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे. तसेच आरटीओ कार्यालयाकडून नियमित बसची तपासणी करण्याची मागणी होत आहे.

पिंपरी - शहरात नियमांचे उल्लंघन करीत स्कूलबस राजरोसपणे धावत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना धोका निर्माण होऊ शकतो. एखादा अपघात झाल्यानंतर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) कारवाई होणार का? असा सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे. तसेच आरटीओ कार्यालयाकडून नियमित बसची तपासणी करण्याची मागणी होत आहे.पुण्याप्रमाणेच पिंपरी-चिंचवड शहरात प्राथमिक व पूर्वप्राथमिक शाळांचे व शिक्षण संस्थांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे स्कूल बसच्या माध्यमातून उत्पन्न मिळविण्याचा नवा मार्ग संस्था चालकांना मिळाला आहे. तसेच, स्कूल बस चालविण्याचा व्यावसाय वाढला आहे. मात्र, या सर्व प्रकारात आरटीओने ठरविलेले नियमांचे सर्रास उल्लंघन होताना दिसत आहे. मात्र, त्यावर नियमित नियंत्रण ठेवणे व स्कूल बसची तपासणी करण्याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे.शहरातील स्कूलबसची तपासणी झालेली नाही, अशी तक्रार पालकांमधून होत आहे. ज्या स्कूलबसनी तपासणी करून घेतली. त्यामध्ये काही स्कूल बसनी केवळ आरटीओच्या तपासणीपुरते नियमांचे पालन केले. ज्या वेळी विद्यार्थ्यांची ने-आण करण्यास सुरुवात केली. त्या वेळेस मात्र या स्कूल बसकडून पुन्हा नियमांची पायमल्ली झाली, असा आक्षेप पालकांनी घेतला आहे. विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी संस्था चालकांकडून विद्यार्थ्यांना स्कूलबसची सोय केली आहे. यासाठी अतिरिक्त शुल्क घेऊनही विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.शाळा व्यवस्थापन समिती कागदावरस्कूलबसमध्ये स्पीड गव्हर्नरसह अग्निशामक यंत्रणा बसविणे आवश्यक आहे़ मात्र शाळा व्यवस्थापन समिती ही नावापुरती व कागदोपत्री स्थापन होते. एखाद्या वेळेस बसला अचानक आग लागली आणि उपाययोजनेची यंत्रणा नसल्यास मोठा अनर्थ होऊ शकतो, अशी भीती पालकांमधून व्यक्त होत आहे. अनेकवेळा बसमधून विद्यार्थ्यांना अक्षरश: दाटीवाटीने बसमध्ये बसविण्यात येते. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी बसला जाळी लावावी लागते़ परंतु ब-याच बसेसला जाळ्या नाहीत.चºहोलीच्या घटनेनंतरही नाही दखल४चºहोली येथील एका शाळेतील विद्यार्थी रंगपंचमी खेळताना बसमधून खाली पडला. त्यामध्ये अपघात होऊन त्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. या बसमध्ये वाहक नव्हता. ही गंभीर घटना घडल्यानंतरही प्रशासनाला जाग आलेली नाही. विद्यार्थ्यांना बसमध्ये चढताना आणि उतरताना अपघात होऊ नये म्हणून वाहक नेमण्याची गरज असते. मात्र, शाळा व्यवस्थापन पैसे वाचविण्यासाठी वाहक नेमत नाहीत. त्याचप्रमाणे बसमध्ये प्रथमोचार पेटीची आवश्यकता आहे.आपल्या पाल्याच्या शाळेच्या बसमध्ये आवश्यक सोयीसुविधा आहेत का याची दखल पालकांनी घेतली पाहिजे. नसेल तर शाळा व्यवस्थापनाकडे पालकांनी विचारणा केली पाहिजे. त्यांनी योग्य दखल न घेतल्यास परिवहन विभागाकडे तक्रार करावी. त्याची तातडीने दखल घेऊन आरटीओकडून संबंधित संस्था चालक व स्कूलबस मालकांवर कारवाई करण्यात येईल. - आंनद पाटील,उप प्रादेशिक परिवहन अधिकारी

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSchoolशाळा