शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

स्कूल बसकडून नियम धाब्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 03:29 IST

शहरात नियमांचे उल्लंघन करीत स्कूलबस राजरोसपणे धावत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना धोका निर्माण होऊ शकतो. एखादा अपघात झाल्यानंतर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) कारवाई होणार का? असा सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे. तसेच आरटीओ कार्यालयाकडून नियमित बसची तपासणी करण्याची मागणी होत आहे.

पिंपरी - शहरात नियमांचे उल्लंघन करीत स्कूलबस राजरोसपणे धावत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना धोका निर्माण होऊ शकतो. एखादा अपघात झाल्यानंतर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) कारवाई होणार का? असा सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे. तसेच आरटीओ कार्यालयाकडून नियमित बसची तपासणी करण्याची मागणी होत आहे.पुण्याप्रमाणेच पिंपरी-चिंचवड शहरात प्राथमिक व पूर्वप्राथमिक शाळांचे व शिक्षण संस्थांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे स्कूल बसच्या माध्यमातून उत्पन्न मिळविण्याचा नवा मार्ग संस्था चालकांना मिळाला आहे. तसेच, स्कूल बस चालविण्याचा व्यावसाय वाढला आहे. मात्र, या सर्व प्रकारात आरटीओने ठरविलेले नियमांचे सर्रास उल्लंघन होताना दिसत आहे. मात्र, त्यावर नियमित नियंत्रण ठेवणे व स्कूल बसची तपासणी करण्याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे.शहरातील स्कूलबसची तपासणी झालेली नाही, अशी तक्रार पालकांमधून होत आहे. ज्या स्कूलबसनी तपासणी करून घेतली. त्यामध्ये काही स्कूल बसनी केवळ आरटीओच्या तपासणीपुरते नियमांचे पालन केले. ज्या वेळी विद्यार्थ्यांची ने-आण करण्यास सुरुवात केली. त्या वेळेस मात्र या स्कूल बसकडून पुन्हा नियमांची पायमल्ली झाली, असा आक्षेप पालकांनी घेतला आहे. विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी संस्था चालकांकडून विद्यार्थ्यांना स्कूलबसची सोय केली आहे. यासाठी अतिरिक्त शुल्क घेऊनही विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.शाळा व्यवस्थापन समिती कागदावरस्कूलबसमध्ये स्पीड गव्हर्नरसह अग्निशामक यंत्रणा बसविणे आवश्यक आहे़ मात्र शाळा व्यवस्थापन समिती ही नावापुरती व कागदोपत्री स्थापन होते. एखाद्या वेळेस बसला अचानक आग लागली आणि उपाययोजनेची यंत्रणा नसल्यास मोठा अनर्थ होऊ शकतो, अशी भीती पालकांमधून व्यक्त होत आहे. अनेकवेळा बसमधून विद्यार्थ्यांना अक्षरश: दाटीवाटीने बसमध्ये बसविण्यात येते. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी बसला जाळी लावावी लागते़ परंतु ब-याच बसेसला जाळ्या नाहीत.चºहोलीच्या घटनेनंतरही नाही दखल४चºहोली येथील एका शाळेतील विद्यार्थी रंगपंचमी खेळताना बसमधून खाली पडला. त्यामध्ये अपघात होऊन त्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. या बसमध्ये वाहक नव्हता. ही गंभीर घटना घडल्यानंतरही प्रशासनाला जाग आलेली नाही. विद्यार्थ्यांना बसमध्ये चढताना आणि उतरताना अपघात होऊ नये म्हणून वाहक नेमण्याची गरज असते. मात्र, शाळा व्यवस्थापन पैसे वाचविण्यासाठी वाहक नेमत नाहीत. त्याचप्रमाणे बसमध्ये प्रथमोचार पेटीची आवश्यकता आहे.आपल्या पाल्याच्या शाळेच्या बसमध्ये आवश्यक सोयीसुविधा आहेत का याची दखल पालकांनी घेतली पाहिजे. नसेल तर शाळा व्यवस्थापनाकडे पालकांनी विचारणा केली पाहिजे. त्यांनी योग्य दखल न घेतल्यास परिवहन विभागाकडे तक्रार करावी. त्याची तातडीने दखल घेऊन आरटीओकडून संबंधित संस्था चालक व स्कूलबस मालकांवर कारवाई करण्यात येईल. - आंनद पाटील,उप प्रादेशिक परिवहन अधिकारी

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSchoolशाळा