शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

भांडणाची तक्रार देण्यासाठी गेलेल्या रिक्षाचालकाचा म्हाळुंगेत खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2019 19:52 IST

ओळखीच्या व्यक्तिशी झालेल्या भांडणाची तक्रार देऊन येतो, असे सांगून घरातून गेलेल्या रिक्षाचालकाचा खून झाला. दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह म्हाळुंगे येथील शितळादेवी नगर परिसरात मिळून आला.

हिंजवडी : ओळखीच्या व्यक्तिशी झालेल्या भांडणाची तक्रार देऊन येतो, असे सांगून घरातून गेलेल्या रिक्षाचालकाचा खून झाला. दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह म्हाळुंगे येथील शितळादेवी नगर परिसरात मिळून आला. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुमार तानाजी कसबे (वय २८, रा. म्हाळुंगे) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी त्यांची पत्नी राणी कुमार कसबे (वय २५, रा. म्हाळुंगे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार राकेश महेंद्र सोस्टे (वय ४४, रा. बाणेर) व त्यांच्या साथीदांरा विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. 

कुमार कसबे रिक्षाचालक होते. त्यांची व राकेश सोस्टे याची ओळख होती. शनिवारी (दि. २०) रात्री नऊच्या सुमारास कुमार कसबे दुचाकीवरून कामानिमित्त बाहेर गेले होते. ते दुसऱ्या दिवशी दुपारी घरी परतले. याबाबत पत्नी राणीनी विचारले असता, बाणेर येथे राकेश बरोबर माझे भांडण झाले आहे. त्याने व त्याच्या साथीदारांनी मला मारहाण करून रात्रभर डांबून ठेवले होते. माझ्या डोक्यात मुंग्या येत आहेत, मी त्याच्या नावाची तक्रार द्यायला जाणार आहे, असे कुमार यांनी पत्नी राणी यांना सांगितले. पत्नी राणी यांच्याकडून चिकन आणण्यासाठी ५०० रुपये घेऊन रविवारी (दि. २१) साडेचार वाजता ते घरातून गेले. ते रात्रभर घरी परतले नाही, मात्र त्यांचा मृतदेह दुसऱ्या  दिवशी सोमवारी (दि. २२) म्हाळुंगे येथील शितळादेवी नगर परिसरात मिळून आला. हिंजवडी पोलीस तपास करत आहे.

टॅग्स :MurderखूनCrime Newsगुन्हेगारीauto rickshawऑटो रिक्षा