शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

इंद्रायणी पुलावरील सुरक्षा रामभरोसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 2:31 AM

आंदर मावळातील सुमारे ४० गावांना जोडणाऱ्या टाकवे-कान्हे जवळील इंद्रायणी नदी पुलावरील पुलाचे सुरक्षारक्षक खांब तुटले असल्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात असून, तातडीने सुरक्षारक्षक खांबांची दुरुस्ती करणे गरजेचे आहे.

कामशेत : आंदर मावळातील सुमारे ४० गावांना जोडणाऱ्या टाकवे-कान्हे जवळील इंद्रायणी नदी पुलावरील पुलाचे सुरक्षारक्षक खांब तुटले असल्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात असून, तातडीने सुरक्षारक्षक खांबांची दुरुस्ती करणे गरजेचे आहे.मागील काही दिवसांपूर्वी या पुलावरून टाकवे औद्योगिक वसाहतीतील एका खासगी कंपनीची बस या सुरक्षारक्षक खांबांना धडकून मोठा अपघात झाला होता. या पुलावरून प्रवास करणे धोकादायक झाले असून, येथे मोठा अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न स्थानिक नागरिक विचारत आहेत. इंद्रायणी नदीच्या या पुलावर वाहनचालकांची गैरसोय होत असल्यामुळे सेवा फाउंडेशन या सामाजिक संस्थेकडून रात्रीच्या वेळी वाहनचालकांना सुरक्षारक्षक सीमा निश्चित करावी, याकरिता रेडियम पट्टी लावण्यात आली आहे.आंदर मावळमधील नागरिकांना हा पूल एकमेव दळणवळणाचे साधन आहे. काही वर्षांपासून आंदर मावळ परिसराचे दिवसेंदिवस विस्तारीकरण होत आहे. या भागात औद्योगिक वसाहती बरोबरच गृहप्रकल्पासाठी या भागात अनेक व्यावसायिक उद्योजक गुंतवणूक करत आहेत.कान्हे व आंदर मावळला जोडणाºया या पुलाची रुंदी कमी असल्याने औद्योगिक वसाहतीतील मालवाहतूक वाहनांना मोठी अडचण होत आहे. तर मोठ्या गाड्या पुलावरून जात असताना एक साईटवरील वाहतुकीचा वेग चालकांना कमी करावा लागतो. यामुळे कित्येकदा पुलावर वाहतुकीचा खोळंबा झाल्याचे चित्र दिसत आहे. नवीन पुलाच्या प्रतीक्षेत असलेल्या आंदर मावळ नागरिकांसाठी इंद्रायणी पुलाच्या सुरक्षेसाठी तरी योग्य उपाययोजना प्रशासनाने कराव्यात, हीच सध्यातरी एकमेव अपेक्षा परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाindrayaniइंद्रायणीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड