शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

वृक्ष संवर्धनाची शपथ घेत साजरा केले रक्षाबंधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2018 14:47 IST

झाडांभाेवतीचे लाेखंडी जाळ्या काढून झाडांना राखी बांधत अनाेख्या पद्धतीने रावेत येथे रक्षाबंधन साजरे करण्यात अाले.

रावेत : रक्षाबंधन निमित्त पर्यावरणाच्या रक्षणासाठी अंघोळीची गोळी ,  रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी , संवाद युवा प्रतिष्ठान, केदारेश्वर प्रतिष्ठान , शेखर चिंचवडे युथ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने  झाडाभोवती असणाऱ्या लोखंडी जाळ्या काढून रक्षाबंधनानिमित्त वृक्षसंवर्धन करण्याची शपथ घेवून वृक्षांना राखी बांधली. झाडांना राखी बांधत रक्षाबंधन सण वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला.

      प्रत्येक भाऊ आपल्या बहिणीची रक्षा करण्याकरिता सदैव कटीबद्ध असतो. त्याचप्रमाणे झाडाला राखी बांधून त्याची रक्षा व संगोपन करण्याची शपथ यावेळी  घेण्यात आली. शहरात वृक्षारोपण करताना झाडांच्या सुरक्षतेसाठी लावण्यात आलेल्या लोखंडी जाळ्या वर्षोनुवर्षे झाडाभोवती तशाच राहिल्याने झाडांची वाढ खुंटत होती परिपूर्ण वाढ झालेल्या झाडाभोवतालची लोखंडी जाळ्या काढून झाडांना राखी बांधून आगळा वेगळा रक्षा बंधन वाल्हेकरवाडी येथे साजरा करण्यात आला.  या सामाजिक संस्थाने अनोखं रक्षाबंधन साजरे करून झाडांना लोखंडी जाळ्याच्या जोखडीतून मुक्त करण्यात आले. वाल्हेकरवाडी येथील गावठाण परिसरातील मोठ्या झाडाभोवताली असणाऱ्या लोखंडी जाळ्या झाडाच्या वाढीला रोखून ठेवत होत्या ही बाब पर्यावरण प्रेमींच्या लक्षात आल्या नंतर त्यांनी झाडाभोवती असणाऱ्या लोखंडी जाळ्या काढल्या त्यामुळे झाडांनी मोकळा श्वास घेतला.प्रदीप वाल्हेकर, सुभाष वाल्हेकर, युवराज वाल्हेकर, सचिन काळभोर,पंडित वाल्हेकर, कोंडीबा शिवले , अभिषेक वाल्हेकर, गणेश बोरा , सुयोग वाल्हेकर, गौतम बागुल,राहुल धनवे, प्रदीप पटेल,प्राजक्ता रुद्रवर, स्वाती  वाल्हेकर, राजीव भावसार,अन्वर मुलाणी,रवींद्र कुंवर,माऊली जगताप,संतोष वाघ,किशोर तांगडे पाटील आदी रोटरी सदस्य अंघोळीच्या गोळीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

    रक्षाबंधनानिमित्त ज्या झाडाला राखी बांधली त्याचे आयुष्यभर संवर्धन करावे. तसेच अन्यत्रही असलेल्या झाडांचे संवर्धन करावे, सध्या पर्यावरणाचा  ऱ्हास मोठ्या प्रमाणात होत आहे. झाडांच्या कत्तली होत आहे. त्यामुळे झाडांची लागवड करून रक्षण करणे नितांत गरजेचे आहे. वृक्षारोपण करताना रस्‍त्‍याच्‍या दुतर्फा असलेल्‍या वृक्षांच्‍या खोडाच्‍या सभोवताली लोखंडी जाळ्या बसविल्याने वृक्षाच्‍या खोडाला व मुळांना हवा (ऑक्सिजन) व पाणीपुरवठा होण्‍यास अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे या वृक्षांच्‍या खोडाच्‍या सभोवताली असणाऱ्या जाळ्या काढून टाकण्यात आल्या.

    यावेळी वृक्षांच्‍या खोडाच्‍या सभोवताली असणाऱ्या जाळ्या काढल्याने   वृक्ष आता मोकळा श्वास तर घेणार आहेतच शिवाय त्यांचे आयुर्मान वाढण्यासही मदत होणार असल्याचे मत अंघोळीची गोळी पिंपरी चिंचवड चे अध्यक्ष सचिन काळभोर यांनी व्यक्त केले आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेRaksha Bandhanरक्षाबंधनnewsबातम्याravetरावेत