शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

वृक्ष संवर्धनाची शपथ घेत साजरा केले रक्षाबंधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2018 14:47 IST

झाडांभाेवतीचे लाेखंडी जाळ्या काढून झाडांना राखी बांधत अनाेख्या पद्धतीने रावेत येथे रक्षाबंधन साजरे करण्यात अाले.

रावेत : रक्षाबंधन निमित्त पर्यावरणाच्या रक्षणासाठी अंघोळीची गोळी ,  रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी , संवाद युवा प्रतिष्ठान, केदारेश्वर प्रतिष्ठान , शेखर चिंचवडे युथ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने  झाडाभोवती असणाऱ्या लोखंडी जाळ्या काढून रक्षाबंधनानिमित्त वृक्षसंवर्धन करण्याची शपथ घेवून वृक्षांना राखी बांधली. झाडांना राखी बांधत रक्षाबंधन सण वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला.

      प्रत्येक भाऊ आपल्या बहिणीची रक्षा करण्याकरिता सदैव कटीबद्ध असतो. त्याचप्रमाणे झाडाला राखी बांधून त्याची रक्षा व संगोपन करण्याची शपथ यावेळी  घेण्यात आली. शहरात वृक्षारोपण करताना झाडांच्या सुरक्षतेसाठी लावण्यात आलेल्या लोखंडी जाळ्या वर्षोनुवर्षे झाडाभोवती तशाच राहिल्याने झाडांची वाढ खुंटत होती परिपूर्ण वाढ झालेल्या झाडाभोवतालची लोखंडी जाळ्या काढून झाडांना राखी बांधून आगळा वेगळा रक्षा बंधन वाल्हेकरवाडी येथे साजरा करण्यात आला.  या सामाजिक संस्थाने अनोखं रक्षाबंधन साजरे करून झाडांना लोखंडी जाळ्याच्या जोखडीतून मुक्त करण्यात आले. वाल्हेकरवाडी येथील गावठाण परिसरातील मोठ्या झाडाभोवताली असणाऱ्या लोखंडी जाळ्या झाडाच्या वाढीला रोखून ठेवत होत्या ही बाब पर्यावरण प्रेमींच्या लक्षात आल्या नंतर त्यांनी झाडाभोवती असणाऱ्या लोखंडी जाळ्या काढल्या त्यामुळे झाडांनी मोकळा श्वास घेतला.प्रदीप वाल्हेकर, सुभाष वाल्हेकर, युवराज वाल्हेकर, सचिन काळभोर,पंडित वाल्हेकर, कोंडीबा शिवले , अभिषेक वाल्हेकर, गणेश बोरा , सुयोग वाल्हेकर, गौतम बागुल,राहुल धनवे, प्रदीप पटेल,प्राजक्ता रुद्रवर, स्वाती  वाल्हेकर, राजीव भावसार,अन्वर मुलाणी,रवींद्र कुंवर,माऊली जगताप,संतोष वाघ,किशोर तांगडे पाटील आदी रोटरी सदस्य अंघोळीच्या गोळीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

    रक्षाबंधनानिमित्त ज्या झाडाला राखी बांधली त्याचे आयुष्यभर संवर्धन करावे. तसेच अन्यत्रही असलेल्या झाडांचे संवर्धन करावे, सध्या पर्यावरणाचा  ऱ्हास मोठ्या प्रमाणात होत आहे. झाडांच्या कत्तली होत आहे. त्यामुळे झाडांची लागवड करून रक्षण करणे नितांत गरजेचे आहे. वृक्षारोपण करताना रस्‍त्‍याच्‍या दुतर्फा असलेल्‍या वृक्षांच्‍या खोडाच्‍या सभोवताली लोखंडी जाळ्या बसविल्याने वृक्षाच्‍या खोडाला व मुळांना हवा (ऑक्सिजन) व पाणीपुरवठा होण्‍यास अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे या वृक्षांच्‍या खोडाच्‍या सभोवताली असणाऱ्या जाळ्या काढून टाकण्यात आल्या.

    यावेळी वृक्षांच्‍या खोडाच्‍या सभोवताली असणाऱ्या जाळ्या काढल्याने   वृक्ष आता मोकळा श्वास तर घेणार आहेतच शिवाय त्यांचे आयुर्मान वाढण्यासही मदत होणार असल्याचे मत अंघोळीची गोळी पिंपरी चिंचवड चे अध्यक्ष सचिन काळभोर यांनी व्यक्त केले आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेRaksha Bandhanरक्षाबंधनnewsबातम्याravetरावेत