शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
3
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
4
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
5
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
6
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
7
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
8
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
9
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
10
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
11
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
12
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
13
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
14
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
15
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
16
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
17
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
18
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
19
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
20
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."

वृक्ष संवर्धनाची शपथ घेत साजरा केले रक्षाबंधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2018 14:47 IST

झाडांभाेवतीचे लाेखंडी जाळ्या काढून झाडांना राखी बांधत अनाेख्या पद्धतीने रावेत येथे रक्षाबंधन साजरे करण्यात अाले.

रावेत : रक्षाबंधन निमित्त पर्यावरणाच्या रक्षणासाठी अंघोळीची गोळी ,  रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी , संवाद युवा प्रतिष्ठान, केदारेश्वर प्रतिष्ठान , शेखर चिंचवडे युथ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने  झाडाभोवती असणाऱ्या लोखंडी जाळ्या काढून रक्षाबंधनानिमित्त वृक्षसंवर्धन करण्याची शपथ घेवून वृक्षांना राखी बांधली. झाडांना राखी बांधत रक्षाबंधन सण वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला.

      प्रत्येक भाऊ आपल्या बहिणीची रक्षा करण्याकरिता सदैव कटीबद्ध असतो. त्याचप्रमाणे झाडाला राखी बांधून त्याची रक्षा व संगोपन करण्याची शपथ यावेळी  घेण्यात आली. शहरात वृक्षारोपण करताना झाडांच्या सुरक्षतेसाठी लावण्यात आलेल्या लोखंडी जाळ्या वर्षोनुवर्षे झाडाभोवती तशाच राहिल्याने झाडांची वाढ खुंटत होती परिपूर्ण वाढ झालेल्या झाडाभोवतालची लोखंडी जाळ्या काढून झाडांना राखी बांधून आगळा वेगळा रक्षा बंधन वाल्हेकरवाडी येथे साजरा करण्यात आला.  या सामाजिक संस्थाने अनोखं रक्षाबंधन साजरे करून झाडांना लोखंडी जाळ्याच्या जोखडीतून मुक्त करण्यात आले. वाल्हेकरवाडी येथील गावठाण परिसरातील मोठ्या झाडाभोवताली असणाऱ्या लोखंडी जाळ्या झाडाच्या वाढीला रोखून ठेवत होत्या ही बाब पर्यावरण प्रेमींच्या लक्षात आल्या नंतर त्यांनी झाडाभोवती असणाऱ्या लोखंडी जाळ्या काढल्या त्यामुळे झाडांनी मोकळा श्वास घेतला.प्रदीप वाल्हेकर, सुभाष वाल्हेकर, युवराज वाल्हेकर, सचिन काळभोर,पंडित वाल्हेकर, कोंडीबा शिवले , अभिषेक वाल्हेकर, गणेश बोरा , सुयोग वाल्हेकर, गौतम बागुल,राहुल धनवे, प्रदीप पटेल,प्राजक्ता रुद्रवर, स्वाती  वाल्हेकर, राजीव भावसार,अन्वर मुलाणी,रवींद्र कुंवर,माऊली जगताप,संतोष वाघ,किशोर तांगडे पाटील आदी रोटरी सदस्य अंघोळीच्या गोळीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

    रक्षाबंधनानिमित्त ज्या झाडाला राखी बांधली त्याचे आयुष्यभर संवर्धन करावे. तसेच अन्यत्रही असलेल्या झाडांचे संवर्धन करावे, सध्या पर्यावरणाचा  ऱ्हास मोठ्या प्रमाणात होत आहे. झाडांच्या कत्तली होत आहे. त्यामुळे झाडांची लागवड करून रक्षण करणे नितांत गरजेचे आहे. वृक्षारोपण करताना रस्‍त्‍याच्‍या दुतर्फा असलेल्‍या वृक्षांच्‍या खोडाच्‍या सभोवताली लोखंडी जाळ्या बसविल्याने वृक्षाच्‍या खोडाला व मुळांना हवा (ऑक्सिजन) व पाणीपुरवठा होण्‍यास अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे या वृक्षांच्‍या खोडाच्‍या सभोवताली असणाऱ्या जाळ्या काढून टाकण्यात आल्या.

    यावेळी वृक्षांच्‍या खोडाच्‍या सभोवताली असणाऱ्या जाळ्या काढल्याने   वृक्ष आता मोकळा श्वास तर घेणार आहेतच शिवाय त्यांचे आयुर्मान वाढण्यासही मदत होणार असल्याचे मत अंघोळीची गोळी पिंपरी चिंचवड चे अध्यक्ष सचिन काळभोर यांनी व्यक्त केले आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेRaksha Bandhanरक्षाबंधनnewsबातम्याravetरावेत