शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

शक्ती जगाला घाबरविण्यासाठी नव्हे, जगद्कल्याणासाठी हवी- राजनाथ सिंह

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2022 18:37 IST

पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ पुणे यांच्या १३ व्या पदवीदान समारंभात राजनाथ सिंह बोलत होते...

पिंपरी : जीवनात ज्ञानास जेवढे महत्व आहे, तेवढेच संस्कारांना आहे. जीवनमुल्यांशी आपण नेहमी कटीबद्ध असायला हवे. आपली जीवनमुल्ये व्यक्तीमत्व घडवित असतात. शिक्षण, अध्यात्म, संस्कारच देशाला पुढे नेतील. भारताला जगदगुरूंचे स्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. ज्ञान, धन संपत्तीबरोबरच व्यक्तीमत्व विकासाकडे लक्ष घ्यायला हवे. त्यातूनच शक्तीवान, ज्ञानवान, धनवान बनू शकणार आहोत, आपली शक्ती  जगाला घाबरविण्यासाठी नव्हे, जगद्कल्याण भावनेने प्रेरीत असायला हवी, असे मत देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पिंपरी येथे शुक्रवारी व्यक्त केले.

तरूणांची जाणीव समृद्धज्ञान, विज्ञान आणि अध्यात्म यांचे जीवन घडविण्यासाठी असणारे महत्व, मनसंस्कार, मनस्वास्थ यावर मार्गदर्शन करताना महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे दाखले देऊन तरूणांची जाणीव समृद्ध केली. ज्ञान आणि तत्वज्ञानाचे दाखले आणि किस्से सांगितले. त्यास टाळ्यांचा कडकडाट देऊन तरूणाईने दाद दिली.

राजकारणात असतानाही संतुलन ठेवले पाहिजेजीवनात शिक्षण, ज्ञान, संस्कार महत्वाचे आहे. शिक्षणाचा परिणाम व्यक्तिमत्त्व घडण्यास होत असतो. ओसामा बिन लादेन अरबपती, खरबपती होता. मात्र, त्याने ज्ञानाचा दुरुपयोग केला. दुसरीकडे पेपर विक्रेता असणारे ए.पी.जे अब्दुल कलाम हे शास्त्रज्ञ झाले, पुढे देशाचे राष्ट्रपती झाले. देशाला विकास पथावर नेण्यास योगदान दिले. दोन व्यक्तींचा विचार केल्यास शिक्षण आणि संस्कार याचा हा परिणाम आहे, राजकारणात असतानाही संतुलन ठेवले पाहिजे. ते अध्यात्माने येते, असेही राजनाथ सिंह म्हणाले.स्वदेशी २ ची हाकराजनाथसिंह म्हणाले, ‘‘ स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने आत्मनिर्भर होण्याचा संकल्प केला आहे. आपल्या गरजांसाठी दुसऱ्या देशांवर भारत आता अवलंबून राहू इच्छित नाही. त्यासाठी 'व्होकल फॉर लोकल'ची हाक पंतप्रधानांनी दिली आहे. स्वदेशी-२ हा त्याच योजनेचा भाग आहे. स्वदेशीची पहिली हाक याच पुण्यातून लोकमान्य टिळक व महात्मा गांधी यांनी दिली होती. विद्यार्थ्यांनी व्यवसाय-उद्योगात नव्या संकल्पना आणण्यावर भर द्यावा.’’

पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ पुणे यांच्या १३ व्या पदवीदान समारंभात संरक्षण मंत्री बोलत होते. यावेळी व्यासपीठावर यावेळी डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती  डॉ. पी. डी. पाटील, प्र-कुलपती डॉ. भाग्यश्री  पाटील, कुलगुरू  डॉ. एन. जे. पवार, सचिव डॉ. सोमनाथ पाटील, विश्वस्त व संचालिका डॉ. स्मिता जाधव  विश्वस्त व कोषाध्यक्ष  डॉ. यशराज पाटील उपस्थित होते.

यावेळी प्रसिद्ध उद्योगपती व फोर्स मोटर्सचे अध्यक्ष डॉ. अभय फिरोदिया, उद्योजक प्रतापराव पवार यांना डी.लिट आणि दत्ता मेघे इन्स्टिटयूट ऑफ मेडिकल सायन्सेस, नागपूरचे  प्र-कुलपती  डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांना डॉक्टर आॅफ सायन्स (डी.एससी) ही मानद पदवी देऊन गौरविले.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडRajnath Singhराजनाथ सिंह