शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

धुवाधार पावसाने उद्योगनगरीची उडविली दाणादाण; लाखोंचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2020 17:49 IST

भोसरी एमआयडीसी, शांतीनगर परिसर आणि शहरातील विविध लहान मोठ्या कंपन्यांमध्ये पाणी शिरल्याने मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले.

ठळक मुद्देपाणी शिरल्याने लाखोंचे नुकसान : गुरुवारचा दिवस स्वच्छतेने वाया

पिंपरी : शहरात झालेल्या जोरदार पावसामुळे उद्योगनगरीची दाणादाण उडविली. भोसरी एमआयडीसी, शांतीनगर परिसर आणि शहरातील विविध लहान मोठ्या कंपन्यांमध्ये पाणी शिरल्याने मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले. काही हॉटेलमध्ये पाणी शिरल्याने नुकसान झाले. पाणी गेल्याने इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि यंत्रातील महागडे ऑईल खराब झाल्याने कंपन्यांना लाखो रुपयांचा भुर्दंड सोसावा लागणार आहे. 

पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवडसह बहुतांश भगात बुधवारी सायंकाळी पाऊस सुरू झाला. रात्रभर जोरदार पाऊस झाला. त्यामुळे रस्त्यांना ओढ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. अनेक हॉटेल, कंपन्या आणि लहान मोठे वर्क शॉपमध्ये पाणी शिरले. या ठिकाणी पाण्याची पातळी पाच ते सहा फुटांपर्यंत गेली होती. 

भोसरीतील शांतीनगर इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये दोनशे ते तीनशे वर्कशॉपमध्ये पाणी गेले होते. येथील दुकानामफहे पाच ते सहा फूट पाणी जमा झाले. इलेक्ट्रॉनिक मोटार, यंत्र आणि मशीन पाण्याखाली गेले. यंत्रामधील इलेक्ट्रॉनिक भाग खराब झाले आहेत. तेथे सीएनसी, व्हीएनसी, सिलिंडर ग्राइंडिग मशीनचा वापर होतो. यंत्रामधील हायड्रोलिक ऑइलचे नुकसान झाले. प्रत्येक यंत्रात २५ ते तीस हजार रुपयांचे ऑइल असते. त्यामुळे या परिसरातील उद्योजकांचे किमान पन्नास लाख रुपयांचे थेट नुकसान झाले आहे. काम खोळंबल्याने होणारे अप्रत्यक्ष नुकसान वेगळे असल्याचे लघु उद्योजक राजेंद्र नाझीरकर यांनी सांगितले.

-----

गेल्या अठ्ठावीस वर्षांपासून भोसरी परिसरात व्यवसाय करीत आहे. गेल्या चार पाच वर्षांपासून पावसाचे पाणी शिरल्याने नुकसान होण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. गेल्या वर्षी देखील पावसामुळे असेच नुकसान झाले होते. कल झालेल्या पावसामुळे दोनशे ते तीनशे लघु आउद्योजकांचे पन्नास हजार रुपयांपासून एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. पाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था उभारली पाहिजे.

राजेंद्र नाझीरकर, लघु उद्योजक, शांतीनगर, भोसरी

-----

भोसरी एमआयडीसी मधील अनेक कंपन्या १९७३ मध्ये सुरू झाल्या. रस्त्यांचे थरावर थर अंथरल्याने कंपन्या रस्त्याच्या खाली गेल्या आहेत. जोरदार पाऊस झाल्यास पाणी शिरते. तयार मालाचे नुकसान झाले. दसऱ्याची मागणी पूर्ण करण्यासाठी अनेक कंपन्या गुरुवारी देखील सुरू असतात. मात्र त्यांचा कामाचा खोळंबा झाला. विद्युत यंत्रणेत पाणी गेल्याने काहींना काम थांबवावे लागले.

अभय भोर, अध्यक्ष, फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन

----

शहरातील पिंपरी, चिंचवड आणि आकुर्डी येथील काही हॉटेल मध्ये पाणी शिरल्याने नुकसान झाले. काहींमध्ये गुडघाभर पाणी शिरले होते. पाण्याचा निचरा होत नसल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. या पूर्वी देखील संघटनेने महापालिकेकडे तक्रार केली होती. मात्र त्यावर उपाययोजना केली गेली नाही. 

गोविंद पानसरे, कार्याध्यक्ष पिंपरी चिंचवड हॉटेल असोसिएशन

--/

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडbusinessव्यवसायMIDCएमआयडीसीRainपाऊसhotelहॉटेल