शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

पिंपरी-चिंचवड शहरातील पाणीटंचाई मिटणार; इंद्रायणी नदीतून शंभर एमएलडी पाणी उचलणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 17:22 IST

शहराची लोकसंख्या सुमारे २७ लाखांच्या घरात पोहोचली आहे. त्यामुळे पाणीटंचाई जाणवत आहे...

ठळक मुद्देपिंपरी-चिंचवड महापालिका पवना धरणातून करते ५०० एमएलडी पाणी नदीतून उपसाचिखली जलशुद्धीकरण प्रकल्प ते देहूपर्यंत भूमिगत जलवाहिनी टाकण्यात येणार

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील पाणीटंचाई सोडविण्यासाठी देहूगाव येथील इंद्रायणी नदीतून १०० एमएलडी पाणी आणण्यासाठी प्रकल्पाची सुरुवात मंगळवारी झाली आहे. चिखली येथील नियोजित जलशुद्धीकरण केंद्र ते देहू अशुद्ध जलउपसा केंद्रापर्यंत एम. एस. जलवाहिनी पुरवणे व टाकणे काम सुरू झाले.

पवना धरणातून पिंपरी-चिंचवडसाठी १९८४ मध्ये पाणीपुरवठा सुरू केला. त्यावेळी शहराची लोकसंख्या सुमारे ८ लाख इतकी होती. सद्य:स्थितीला शहराची लोकसंख्या सुमारे २७ लाखांच्या घरात पोहोचली आहे. त्यामुळे पाणीटंचाई जाणवत आहे. त्यामुळे चिखली येथे १०० एमएलडी क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येणार आहे. चिखली जलशुद्धीकरण प्रकल्प ते देहूपर्यंत भूमिगत जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. जलवाहिनीचा १२५० ते १४०० इतका डायमीटर आहे. १० किलोमीटर लांबीच्या या जलवाहिनीतून १०० एमएलडी इतके पाणी उचलण्यात येईल. देहू येथे इंद्रायणी नदीतून पाणी उचलण्यात येईल. पाणी चिखली जलशुद्धीकरण प्रकल्पात आणले जाईल. चºहोली, मोशी, डुडुळगाव, तळवडे, दिघी, चिखली आदी समाविष्ट भागात पाणीपुरवठा करण्यात येईल.   

पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या वतीने झालेल्या कार्यक्रमास महापौर उषा ढोरे, आमदार महेश लांडगे, उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके आदी उपस्थित होते.   

प्रकल्पामुळे पाण्याची...पिंपरी-चिंचवड महापालिका पवना धरणातून ५०० एमएलडी पाणी नदीतून उपसा करते. त्यापैकी ३० टक्के म्हणजे सुमारे १५० एमएलडी पाणी वाया जाते. मात्र, या बंदिस्त जलवाहिनीद्वारे पाणी थेट जलशुद्धीकरण प्रकल्पात आणणार आहे. त्यामुळे पाणी वाया जाणार नाही. समाविष्ट गावातील पाणीपुरवठा सक्षम केल्यामुळे संपूर्ण पिंपरी-चिंचवडवरील पाणीपुरवठ्याचा ताण कमी होईल. आगामी वर्षभरात हा प्रकल्प कार्यान्वित होईल, असा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडWaterपाणीindrayaniइंद्रायणीriverनदीshravan hardikarश्रावण हर्डिकर