शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी-चिंचवडकरांवर ओढवणार पाणीकपातीचे संकट, धरणक्षेत्रात गतवर्षीपेक्षा ६५० मिमी कमी पाऊस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2020 13:33 IST

पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणाऱ्या पवना धरण पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडलेला नाही

ठळक मुद्देपवना धरणक्षेत्रात १ जूनपासून १५ जुलैपर्यंत फक्त ४२५ मिमी पावसाची नोंद

पिंपरी : कोरोना पाठोपाठ आता पिंपरी-चिंचवडकरांवर पाण्याचे संकट ओढवणार असल्याचे दिसून येत असून, पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटला तरी पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणाऱ्या पवना धरण पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडलेला नाही. गतवर्षी १०७५ मिमी पाऊस पडला होता. त्यातुलनेत यंदा ४२५ मिमी पाऊस पडला आहे. ६५० मिमी कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे दिवसाआड पाण्याचे संकट शहरवासीयांवर राहणार आहे.औद्योगिकनगरी पिंपरी-चिंचवड शहरास मावळातील पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. पाणीपुरवठा विभागाने समन्यायी पाणीवाटप करण्यासाठी २५ नोव्हेंबर २०१९ पासून दिवसाआड पाणीपुरवठा केला होता.  अजूनही समाधानकारक पाऊस पडला नाही. पवना धरणक्षेत्रात १ जूनपासून १५ जुलैपर्यंत फक्त ४२५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे दीड महिन्यात ५.८४ टक्क्यांनी साठ्यात वाढ झाली आहे. धरणात सध्या ३४.१८ टक्के पाणीसाठा आहे. तर, गतवर्षी आजपर्यंत १०५ मिमी पावसाची नोंद झाली होती. तर ४२.१८ टक्के साठा होता. त्यामुळे साडेसहाशे मिमी पाऊस कमी झाला आहे. आठ टक्क्यांनी धरणात साठा कमी आहे...........................तूर्तास कपात वाढविणार नाहीमहापालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे सहायक आयुक्त रामदास तांबे म्हणाले, पवना धरणक्षेत्रात पाऊस पडत आहे. गतवर्षीच्या तुलनेत पाऊस कमी आहे, हे वास्तव आहे. परंतु, पवना धरणातील साठ्यात वाढ होत आहे. त्यामुळे शहरात दिवसाआड पाणीपुरवठा सुरू राहणार आहे. तूर्तास अतिरिक्त कोणतीही पाणीकपात वाढविली जाणार नाही. ऑगस्टपर्यंत आढावा घेऊन निर्णय घेऊ................................. धरणक्षेत्रात कमी पावसाची नोंद दीड महिन्यात पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडला नाही. धरणक्षेत्रात १५जुुलैपर्यंत ४२५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. दीड महिन्यात ५.८४ टक्क्यांनी साठा वाढला असून, धरणात ३४.१८ टक्के साठा आहे. गतवर्षी धरणात ४२.१८ टक्के साठा होता. गेल्यावर्षी साडेसहाशे मिमी अधिक पाऊस झाला होता. दोन महिने पुरेल एवढा हा साठा आहे. सध्या पाण्याची काटकसर करण्याची आवश्यकता नाही. लॉकडाऊन असल्याने नागरिक घरी आहेत. उद्योग बंद आहेत. पण, घरगुती पाणीवापर वाढला आहे. लॉकडाऊनमध्ये नागरिकांना पाणी कमी पडू दिले नाही.-एम. ए. गडवाल, शाखा अभियंता, पवना धरण

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडRainपाऊसWaterपाणी