शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
5
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
6
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
7
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
8
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
9
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
10
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
11
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
12
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
13
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
14
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
15
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
16
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
17
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
18
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
19
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
20
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...

जातीयवादामुळे महाराष्ट्राला देशाचे नेतृत्व करता आले नाही - डॉ. सदानंद मोरे

By विश्वास मोरे | Updated: March 9, 2025 19:11 IST

उत्तरपेशवाई सारखी महाराष्ट्रात स्थिती 

 पिंपरी:  पुढील १०० वर्षात मराठे जगात पहिल्या क्रमांकावर जातील, असे इतिहास संशोधक जदुनाथ सरकार यांनी सांगितले होते. मात्र तसे झाले नाही. कारण जातीयवादामुळे महाराष्ट्राला देशाचे नेतृत्व करता आलेले नाही. आजवर इतिहासात सर्व जाती एकत्र आल्या म्हणून विजय मिळाले. जातींचे ऐक्य नष्ट झाले कि राज्य संपले. उत्तरपेशवाई सारखी महाराष्ट्रात स्थिती आज आहे. जोपर्यंत आपण आयडियॉलॉजीला आपली आयडेंटिटी करत नाही, तोपर्यंत आपण जगात अग्रेसर होऊ शकत नाही. सर्वांना एकत्रित घेणारा महाराष्ट्र धर्म हीच आपली आयडियॉलॉजी असली पाहिजे, असे मत अखिल मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले. 

पिंपरी मनसेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात राज ठाकरे यांच्या हस्ते ज्येष्ठ साहित्यिक संत साहित्याचे गाढे अभ्यासक  प्रा. सदानंद मोरे यांचा सन्मान केला. त्यानंतर  'महाराष्ट्र काल आज आणि उद्या'  यावर प्रा. डॉ. सदानंद मोरे यांनी व्याख्यान दिले. 

रामाचा पहिला राज्याभिषेक नाशिकमध्येडॉ सदानंद मोरे म्हणाले, 'मी आज महाराष्ट्र आणि महाराष्ट्रच भूतकाळ आणि भविष्य आणि वर्तमान काय याबाबत बोलणार आहे. महाराष्ट्राशी माझा संबंध लहानपणापासून आला. तेव्हापासून माझा अभ्यास सुरू आहे. आचार्य अत्रे, अनेक संघटना, माझा वावर त्यात होता. पण मी राजकारणापासून अलिप्त राहिलो.  मी ऐकले नाशिक शहर हे राज ठाकरे यांचे आवडत ठिकाण आहे. रामायणाचा संबंध नाशिकशी आहे. भरत आणि श्रीराम यांची भेट तिथं झाली. भरताने रामाचा पहिला राज्याभिषेक नाशिकमध्ये केला ही बाब नाशिकच्या लोकांना माहिती नाही. त्यानंतर अयोध्येला राज्याभिषेक झाला. ब्रिटिश अधिकारी हंटर यांनी दिल्ली ऐवजी भारताची राजधानी नाशिक असायला हवी होती.' महाराष्ट्र धर्म हीच आपली आयडियॉलॉजी डॉ मोरे म्हणाले, ब्रिटिश काळात महाराष्ट्राच्या इतिहासाचे संशोधन होऊ लागले. जदुनाथ सरकारने औरंगजेबावर पुस्तक लिहिले.  त्यात वारंवार छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव येत होते. महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रातले सगळे सगळे. त्यात मराठा, दलीत असे सगळे त्यात आले. इतिहासात महाराष्ट्राचा दृष्टिकोन व्यापक राहिलेला आहे. हिमालयाच्या मदतीला सह्याद्री गेला, अशी आपण यशवंतराव चव्हाण यांची आठवण काढतो. असे अनेक प्रसंग आहेत.'

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रRaj Thackerayराज ठाकरेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड