शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

पिंपरी- चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपला अति घाई भोवली? ३ हजारांच्या मदतीची घोषणा 'कायदेशीर' कात्रीत सापडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2021 22:16 IST

महापालिकेकडून कायदेशीर तरतूद न पाहताच घोषणेची घाई; लॉकडाऊन संपत आला कष्टकऱ्यांना मदत मिळणार कधी?

पिंपरी : कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी लॉकडाऊन केला आहे. या कालखंडात गरीबांना मदत करावी यादृष्टीने कष्टकºयांना तीन हजार रुपये मदत देण्याची घोषणा सत्ताधारी भाजपाने केली होती. कायदेशीर तरतूद न पाहताच घोषणा केल्याने लॉक डाऊन संपत आला तरी कष्टकºयांना मदत मिळालेली नाही, यावर नाराजी व्यक्त होत आहे. कायदेशीर तरतूद नसल्याने हा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे.  कोरोनाचा प्रादूर्भाव राज्यात वाढू लागल्यानंतर राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आघाडी सरकारने लॉकडाऊन केले. हा निर्णय घेताना हातावरचे पोट असणाऱ्या कष्टकरी वर्गाचा विचार त्यांनी करून आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.राज्याने निर्णय घेताच भाजपची सत्ता असणाऱ्या पिंपरी-चिचंवड महापालिकेतील पदाधिकाऱ्यानी कोणतेही नियोजन न करता, निर्णय जाहिर केला आहे. मात्र, घोषणा करून दीड महिना होत आला तरी ही घोषणा सत्यात आली नाही...........अतिघाई सत्ताधाºयांना नडणार  महापालिकेतर्फे विविध योजनांअंर्तगत मदत दिली जाते. विविध कल्याणकारी योजनाशिवाय नागरिकांना थेट मदत देण्याची तरतूद महापालिकेत नाही. याबाबत कोणतेही नियोजन न करता योजना जाहिर करण्याची घाई केली. रिक्षाचालक, परवानाधारक फेरीवाले, नोंदणीकृत घरेलु कामगार, चर्मकार, नाभिक, शालेय विद्यार्थी वाहतुक करणारे चालक, जिम ट्रेनर इ. आर्थिक दुर्बल घटकातील नोंदणीकृत व्यवसाय करणाºयांना मदत कधी मिळणार? बांधकाम प्रकल्पांवर काम करणारे गवंडी, इलेक्ट्रिशियन,  घरांना रंग देणारे रंगारी यांच्यासह नंदीवाले, गोंधळी, भराडी, बँडवाले, वाजंत्री असे विविध लोककलावंत आणि चित्रकार, शिल्पकार, लेखक आणि कवी वास्तव्यास आहेत. त्यांनाही मदत द्यावी, अशी मागणी केली होती.......................महापालिका अधिनियम ६३ अन्वये महापालिकेला मदत करण्याचा अधिकार आहे. कोवीडच्या काळात गोरगरीबांना मदत करण्यासाठी सर्व प्रक्रिया पूर्ण केली. मात्र, प्रशासनाने विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव पाठविला आहे. याबाबत प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा. नामदेव ढाके (सत्तारूढ पक्षनेते)...............................केवळ घोषणा करण्यात सत्ताधाºयांना रस आहे. महापालिकेच्या कोणत्या योजनेअंतर्गत मदत करता येईल,  मदत देण्याविषयीची कार्यपद्धती जाहिर केलेली नाही. अशातच काही नगरसेवकांनी अर्ज गोळा करण्यास सुरूवात केली आहे. ही बाब चुकीची आहे.-राजू मिसाळ, विरोधी पक्षनेता..............................कोरोनाच्या कालखंडात गोरगरीबांना मदत करणे ही योजना चांगली आहे. मात्र, ती योजना कोणत्या नियमांनुसार देण्यात येऊ शकते. याचा अभ्यास न करता नागरिकांच्या भावनेशी खेळण्याचा प्रयत्न महापालिकेतील सत्ताधारी करीत आहे. खरे तर ही राजकीय घोषणा ठरू नये, यासाठी नियोजन सर्व घटकांतील कष्टकºयांना लॉकडाऊन संपण्यापूर्वी प्रत्येक पाच हजार रूपये मदतीचे वाटप होणे गरजेचे आहे.  राहुल कलाटे, गटनेता शिवसेना

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcorona virusकोरोना वायरस बातम्याState Governmentराज्य सरकारBJPभाजपा