शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पवन मावळातील ब्राह्मणोलीत आढळला काळे पाटलांचा स्मृती शिलालेख

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 14:04 IST

- दोन ओळींत देवनागरी लिपीत मराठीत कोरलेला मजकूर, अनेक वर्षे उघड्यावर असल्याने अक्षरे झाली पुसट

- सचिन ठाकर

पवनानगर : मावळ तालुक्यातील पवन मावळ भागातील मौजे ब्राह्मणोली गावात ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरासमोर एका शिळेवर स्मृती शिलालेख आढळला आहे. शिलालेख कोरीव असून, दोन ओळींचा देवनागरी लिपीत मराठी भाषेत कोरलेला आहे. शिलालेख अनेक वर्षे उघड्यावर असल्याने त्यावर वातावरणाचा परिणाम होऊन अक्षरे पुसट झाली आहेत. या शिलालेखाचे वाचन इतिहास अभ्यासक अनिल दुधाने यांनी केले. शिलालेखावरील मजकुरानुसार तो एका काळे पाटलांचा स्मृती शिलालेख असल्याचे समजते.

शिलालेखावर ‘भिकाजी पा. काळा, शके १७११ पौ.मास’ असा मजकूर लिहिलेला आहे. त्याचा अर्थ, शालिवाहन शकाच्या १७११ व्या वर्षी सौम्य नाम संवत्सरात पौष महिन्यात म्हणजेच सन १७८९ व्या वर्षी जानेवारी महिन्यात भिकाजी काळा (काळे) पाटील यांची स्मारक शिळा किंवा समाधी तयार केली किंवा त्या दिवशी त्यांचा मृत्यूही झालेला असू शकतो? शिळेवर सूर्य, चंद्र कोरलेलेया स्मारक शिळेच्या वरील बाजूला सूर्य, चंद्र दाखवलेले आहेत. सूर्य, चंद्र याचा अर्थ ‘यावत चन्द्रो दिवाकरो विलसत स्तावत सभृज्ज्यमते’. म्हणजेच जोपर्यंत या पृथ्वीतलावर सूर्य, चंद्र, तारे आहेत, तोपर्यंत या स्मारक शिळेची, त्या व्यक्तीच्या नावाची व कार्याची कीर्ती चिरकाळ टिकून राहील. शिलालेखाच्या सुरुवातीला व शेवटी उभे दोन दंड दिलेले आहेत. शिलालेखावरील मजकुरावरून काय अंदाज येतो?

शिलालेखात आलेले नाव भिकाजी काळे हे गावाचे पाटील असावेत. त्यांच्या स्मरणार्थ हे पाषाण शिल्पस्मारक उभे केलेले आहे. त्यावर एक शिलालेख कोरलेला आहे. मध्ययुगीन काळातील हा अत्यंत दुर्मिळ स्मारक शिळा प्रकार असून, या शिलालेखाच्या माध्यमातून व्यक्तीचे महत्त्वही कळते. दुर्दैवाने भिकाजी काळे पाटील या व्यक्तीबद्दल इतर काहीही माहिती नाही.

पाटील/पाटीळ म्हणजे काय?

प्रत्येक गावाला पाटील असतो. पाटील हा काही कोणी राजाने दिलेला हुद्दा नसावा. सर्व अधिकार गावपाटलाला असून, तो गावातला राजाचा प्रतिनिधी होता. गाव वसवणारा पुढारी गावपाटील झाला. ज्यांनी गाव वसवला त्या मिरासदारांपैकी पाटलाचे घराणे प्रमुख होते. जो गावची बाजू सावरून व उचलून धरणारा होता. गावाला घेऊन चालणारा म्हणून रयतेला पटला आणि सरकारी काम, बंदोबस्त करणारा म्हणून सरकारला पटला. तो गावचा पाटील केला. पाटलांना गावापुरते मुलकी, दिवाणी, फौजदारी वगैरे कुल अधिकार असत.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड