शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
4
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
5
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
6
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
7
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
8
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय
9
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
Bengaluru Stampede : हृदयद्रावक! "मलाही इथेच राहायचंय..."; मुलाच्या कबरीला मिठी मारून ढसाढसा रडले वडील
11
Vat Purnima Vrat 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
12
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
13
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
14
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
15
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
16
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
17
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
18
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
19
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
20
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश

जुलाब, उलट्यांमुळे नागरिक झाले बेजार; पण पाणी शुद्ध असल्याचा महापालिकेचा टाहो

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 14:23 IST

 - रावेत, मोशी, वाल्हेकरवाडी, जाधववाडी, चऱ्होली आदी भागांत दूषित पाणीपुरवठा;नागरिकांची दवाखान्यांमध्ये गर्दी

पिंपरी : शहरातील विविध भागांत मागील काही दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. पाणी दूषित व दुर्गंधीयुक्त येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. जुलाब, उलट्या आणि सर्दीमुळे पिंपरी-चिंचवडकर बेजार आहेत. दवाखाने रुग्णांनी ओसंडून वाहत आहेत, तरी पाणी शुद्ध असल्याबाबतचा निर्वाळा खास प्रसिद्धीपत्रकाद्वारे महापालिकेने दिला आहे.

शहरातील रावेत, मोशी, वाल्हेकरवाडी, जाधववाडी, चऱ्होली आदी भागांत दूषित पाणीपुरवठा होत असूनही महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग याकडे दुर्लक्ष करीत असून, नागरिकांच्या जिवाशी खेळत असल्याची भावना येथील नागरिक व्यक्त करत आहेत. सध्या पावसाळा सुरू नाही. गढूळ पाणी येण्याचा काहीच संबंध नाही. मात्र पाणी पिवळसर दिसत असून, त्याला उग्र दर्प येत आहे. हे पाणी पिण्याचे आहे की ड्रेनेजमिश्रित पाणीपुरवठा महापालिकेकडून करण्यात येत आहे, असा प्रश्न नागरिकांना पडत आहे.

जलवाहिन्यांची चाळणी आणि असुरक्षित पाणी साठवण

जलवाहिन्यांची काही ठिकाणी चाळण झाली आहे. असुरक्षित पाणी साठवण टाक्क्यांमुळे पाणी दूषित येते, असे नागरिकांचे म्हणणे आहे. महापालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्र आणि खासगी दवाखान्यांमध्ये संबंधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे वैद्यकीय विभागाने सांगितले.

महापालिकेच्या अहवालात पाणी पिण्यायोग्यच.....

मागील काही दिवसांत शहरातील समाविष्ट गावांमध्ये अचानक गॅस्ट्रोचे पेशंट वाढले. त्यामुळे महापालिकेने तातडीने सर्व गाव विभागाला पाणीपुरवठा होत असलेल्या शुद्धीकरण प्रकल्पातील पाणी नमुने महापालिकेच्या निगडी येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले. हे पाणी पिण्यायोग्य असल्याचा अहवाल प्राप्त झाला. त्यानंतर फिल्टर प्लांटपासून पाणी पुढे सोडल्यानंतर नेमके पुढे कुठे जाऊन पाणी खराब होत आहे काय? याबाबत तपासणी करण्यासाठी गाव भागातील अनेक ठिकाणी प्रत्यक्ष नळतोटीच्या पाण्याचे नमुने घेण्यात येऊन तेही प्रयोगशाळेत तपासणीसाठी देण्यात आले. त्यातील ९० टक्के अहवालानुसार पाणी पिण्यायोग्य असल्याचे निष्कर्ष आले; काही भागातील पाणीपुरवठा खराब झाल्याचा निष्कर्ष आला होता. मात्र, दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच भागातील पाणी नमुने पिण्यायोग्य असल्याचा अहवाल आला. ही समस्या नेमक्या कोणत्या कारणामुळे उद्भवत आहे, याबाबत ठोस उत्तरे महापालिका देऊ शकत नाही.

सद्य:स्थितीत जुलाब, उलटीचे रुग्ण अधिक आहेत. हे आजार दूषित पाण्यामुळे होत आहेत. तसेच सध्या ऊन वाढले आहे. त्याचाही अधिक जणांना त्रास होत आहे. पाणी उकळून पिणे तसेच उन्हात जास्त न फिरणे यावर उपाय आहेत. - डॉ. विक्रम महाडिक, वाल्हेकरवाडीगेल्या दोन तीन दिवसांपासून जुलाब, उलटी, पोटदुखीचे रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे दूषित पाणी असू शकते. तसेच उन्हामुळे नागरिक सध्या थंड पदार्थ खात आहेत. त्यामुळे त्रास होत असावा. - डॉ. उमेश चौधरी, मोशी महापालिकेच्या वतीने ज्यामध्ये दररोज वेगवेगळ्या भागांतील पाणी नमुने तपासणी करणे, एखाद्या ठिकाणी जलवाहिनी फुटून अशुद्ध पाणी पाइपलाइनमध्ये जात आहे? काय याचा शोध घेणे, जलवाहिनीची दुरुस्ती करणे, याबाबी केल्या जात आहेत. अन्य काही कारणांमुळे ही समस्या उद्भवली आहे काय? याचाही शोध घेतला जात आहे. सद्यःस्थितीत नागरिकांनी पाणी गाळून व उकळून प्यावे. अन्य काही अफवांवर कृपया विश्वास ठेवू नये. - प्रमोद ओंबासे, मुख्य अभियंता, पाणीपुरवठा विभाग, महापालिका

 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडWaterपाणीwater pollutionजल प्रदूषणwater shortageपाणीकपातHealthआरोग्य