शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजानानं Live शोमध्ये लुटली मैफिल (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

पिंपरीत आईवडिलांना मुले झाली नकोशी, गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2018 20:36 IST

केंद्र सरकार बेटी बचाव आणि बेटी पढाव उपक्रम राबवित असतानाच आकुर्डीतील एका पोटची मुले नकोशी झाली आहे. पालकांनी मुलीला पोलिसांच्या ताब्यात दिले असून पोलिसांवर समृद्धी आणि शौर्य या दोघांना सांभाळण्याची जबाबदारी आली आहे. याप्रकरणी राजेश आणि प्रतिभा भोसले यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

पिंपरी : केंद्र सरकार बेटी बचाव आणि बेटी पढाव उपक्रम राबवित असतानाच आकुर्डीतील एका पोटची मुले नकोशी झाली आहे. पालकांनी मुलीला पोलिसांच्या ताब्यात दिले असून पोलिसांवर समृद्धी आणि शौर्य या दोघांना सांभाळण्याची जबाबदारी आली आहे. याप्रकरणी राजेश आणि प्रतिभा भोसले यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकुर्डीतील पंचतारानगरातील स्वप्नपूर्ती बिल्डिंग येथे भोसले दाम्पत्य वास्तव्यास आहे. त्यांना दहा वर्षांची मुलगी समृद्धी, अडीच वर्षांचा मुलगा शौर्य अशी दोन अपत्ये आहेत. मागील काही दिवसांपासून दाम्पत्यामध्ये भांडण सुरु होते. त्यामुळे ते दोघेही एकमेकांपासून वेगळे राहत होते. भांडण वाढल्याने मुलांचा सांभाळ कोण करणार? असा प्रश्न निर्माण झाला. या दाम्पत्यांमधील वाद विकोपाला गेल्याने वाद काही दिवसांपूर्वी निगडी पोलीस ठाण्यात पोहोचला. सुरूवातीला दाम्पत्याने मुलाचा सांभाळ करण्यास होकार दिला. पण, मुलीला घरी नेण्यास दोघांनीही नकार दिला. त्यानंतर पोलिसांनी समजूत काढल्यानंतर ते दाम्पत्य बुधवारी दोन्ही मुलांना घेऊन घरी गेले. मात्र, दुस-याच दिवशी गुरूवारी त्यानी दोन्ही मुलांना पुन्हा पोलीस ठाण्यात आणून सोडले. मुलांचा सांभाळ करण्यासाठी पैसे द्यावेत, असे आईचे म्हणने आहेत. परिणामी आई- वडिलांच्या वादात दोन्ही मुलांचे हाल झाले आहेत. सध्या दोन्ही मुलं पोलिसांकडेच असून निगडी पोलीसच त्यांचा सांभाळ करीत आहे. अशोक खंडागळे यांनी गुरूवारी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना न्यायालयासमोर हजर केले आहेत.

भांडणासाठी मुलांना सोडणे चुकीचे प्रत्येक आई-वडिलांसाठी मुलांचा जन्म हा आनंददायी असते. त्यांच्या संगोपनामध्ये आपले संपूर्ण आयुष्य खर्ची करतात.  मन मारून त्यांना सर्व सुख, सोयी आणि सुविधा पुरविल्या जातात. लाडात वाढलेली हीच मुले पुढे होतात, सर्वच नाही पण काही मुले आई-वडिलांचे उपकार विसरतात आणि त्यांच्या म्हातारपणी आधार देण्याऐवजी वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवतात. अशा अनेक घटना घडल्या आहेत. मात्र, आई-वडिलांनी पोटच्या मुलांना सोडणे ही घटना पिंपरी-चिंचवडमध्ये प्रथमच घडली आहे. भांडणासाठी मुलांना सोडणे चुकीचे आहे, अशी पालकांवर कडक कारवाई करायला हवी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrimeगुन्हा