शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

आमचा लढा केवळ रास्त मागण्यांसाठीच!, चालक-वाहकांच्या प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 2:47 AM

आम्हाला प्रवाशांना वेठीस धरायचे नाही. आमच्या रास्त मागण्यांसाठी आमचा लढा आहे. इतर राज्यांच्या तुलनेत एसटी कर्मचा-यांची वेतनश्रेणी कमी आहे. सरकार व प्रशासनाने मागण्यांची दखल घ्यावी.

नेहरुनगर : आम्हाला प्रवाशांना वेठीस धरायचे नाही. आमच्या रास्त मागण्यांसाठी आमचा लढा आहे. इतर राज्यांच्या तुलनेत एसटी कर्मचा-यांची वेतनश्रेणी कमी आहे. सरकार व प्रशासनाने मागण्यांची दखल घ्यावी. अहोरात्र सेवा दिली जात असताना आमच्यावर असा अन्याय का? विश्रांतीगृह रिकामे करायला लावणे योग्य नाही. ऐन दिवाळीत रस्त्यावर येण्याची वेळ का आली याचाही विचार करावा, अशा संतप्त प्रतिक्रिया वल्लभनगर एसटी आगारातील वाहक-चालकांनी ‘लोकमत’कडे नोंदविल्या.पिंपरी-चिंचवड आगारएसटी कामगारांचा संप पदनिहाय वेतन श्रेणीसाठी आहे. याकडे शासनाने त्वरित लक्ष द्यावे. बाहेरील आगाराचे चालक/वाहक यांचे विश्रांतीगृह रिकामे करून त्यांची गैरसोय प्रशासनाने केली आहे. हे योग्य नाही. याबाबत त्वरित निर्णय घेण्यात यावा व ते पूर्ववत देण्यात यावे.- प्रवीण मोहिते, अध्यक्ष,एसटी कामगार संघटनादीड लाख कर्मचा-यांची दिवाळी रस्त्यावर साजरी केल्याबद्दल सरकारचे आभार मानायला हवे. या संपाची पूर्वकल्पना आपल्याला असताना मुद्दाम प्रवाशांचे व एसटी कर्मचाºयांचे हाल केले . इतर कर्मचाºयांना व एसटी कर्मचाºयांना किती पगार आहे, याची कल्पना आपल्याला आहे. तरी आपण जाणूनबुजून कर्मचाºयांची पिळवणूक करीत आहात.याचा जाहीर निषेध करीत आहे.- मारकर दीपक, पिंपरी-चिंचवडसंप हा कर्मचाºयांचा अधिकार, हक्क आहे. प्रत्येकाला काळानुसार/ महागाईनुसार/ सरकारच्या धोरणानुसार पगारात गुजराण करणे अवघड असते. त्यामुळे पगारवाढ होणे गरजेचे आहे. आम्हाला सांगण्यात येते की, सरकारी कर्मचारी आणि तुमचे काम यात फरक आहे. परंतु, ज्यांना आपण सुज्ञ म्हणतो तो कोणीही सांगेल की कोणताही सरकारी कर्मचारी एसटीच्या पगारात काम करु शकणार नाही.- प्रदीप बळीराम घोलप, वाहकमहाराष्ट्र राज्य वगळून गुजरात, मध्यप्रदेश व इतर राज्यातील परिवहन सेवा राज्य सरकारमध्ये आहे. परंतु, आपले महाराष्ट्र राज्याच्या परिवहन सेवा राज्य सरकारमध्ये विलीन का नाही ? गलिच्छ कारभारामुळे व बेजबाबदारपणामुळे दीड लाख कर्मचारी घरापासून दूर केले.- निवृत्ती ढगोबा रोकडे, खजिनदारशासनाने अद्याप निर्णय न घेतल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. आज बाहेरील आगाराचे चालक-वाहकांची गैरसोय करून प्रशासनाने हा अन्याय केला आहे. याचा आम्ही आमच्या संघटनेकडून निषेध करतो.- हरिभाऊ जाधव, सचिव,महाराष्ट्र एसटी कामगार संघटनाएसटीच्या संपात सरकार कुठे गेले आहे. हे कर्मचारी कुठल्या बाहेरील देशातील नव्हे तर महाराष्ट्रातीलच आहेत. त्या एसटी कर्मचाºयांना योग्य न्याय द्यावा.- सुर्वे बाळू रामचंद्र,चालकपरिवहन मंत्री व अध्यक्ष यांना माझी विनंती आहे की आम्ही एसटीमधील सर्व कर्मचारी हे महाराष्ट्रीय व मराठी आहोत. आपण जातीने लक्ष घालून एसटी कर्मचाºयांच्या संपाबाबत सन्मानाने तोडगा काढावा व कामगारांना न्याय द्यावा.- दिलीप भोसले, चालकमहामंडळाचे ब्रीदवाक्य आहे की, प्रवासी माझे दैवत व खासगी वाहतुकीने प्रवास करू नये. मग आता एसटीच्या ७० वर्षांच्या इतिहासामध्ये एसटी बसस्टँडमध्ये खासगी बस आणली. आता कुठे गेले ब्रीदवाक्य. जो अर्ध्या पोटी राहून आपले काम करतोय. ज्या सरकारला माणसाचा कळवळाच नाही.- मुळे विलासराव सुभाष,चालकसंप अगदी योग्य व रीतसर आहे. कर्मचाºयांवर अन्याय होत असल्यास त्यांना कोठे तरी वाचा फोडावी लागते. आणि तेच काम आम्ही केले आहे. आमच्या मागण्या प्रशासनाने व्यवस्थित पूर्ण कराव्यात, हीच विनंती. प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापनाच्या नावाखाली कर्मचाºयांचे विश्रांतीगृह रिकामे केले व त्यांना वाºयावर सोडले.- रवींद्र जगन्नाथ जगताप, येवला आगारहा संप हा कायदेशीर असून सर्व पूर्वकल्पना देऊन हा संप झालेला आहे. तरी एसटीने कर्मचाºयांचा विचार करावा.- रामदास मोहनराव साबळे, चालक

टॅग्स :ST Strikeएसटी संपpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड