शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

इथेनॉल निर्मितीतून रोजगार, शेती उद्योगात पडेल भर - नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2017 15:33 IST

हरीत उर्जा आणि हरीत इंधनाला सरकारने प्रोत्साहन देण्याचे निश्चित केले आहे. इथेनॉल, मिथेनॉल आणि इलेक्ट्रीक, बायो सीएनजीला प्राधान्य दिल्यास एक चांगली उर्जा आणि इंधन मिळेल, प्रदूषण मुक्त, पर्यायी आणि वाजवी स्वरूपात इंधन निर्मिती होईल, त्यातून रोजगार निर्मिती होईल, शेती उद्योगातही आर्थिक फायदा होईल, ग्रामीण आणि शहरी विकासात भर पडेल, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. 

पिंपरी-चिंचवड - हरीत उर्जा आणि हरीत इंधनाला सरकारने प्रोत्साहन देण्याचे निश्चित केले आहे. इथेनॉल, मिथेनॉल आणि इलेक्ट्रीक, बायो सीएनजीला प्राधान्य दिल्यास एक चांगली उर्जा आणि इंधन मिळेल, प्रदूषण मुक्त, पर्यायी आणि वाजवी स्वरूपात इंधन निर्मिती होईल, त्यातून रोजगार निर्मिती होईल, शेती उद्योगातही आर्थिक फायदा होईल, ग्रामीण आणि शहरी विकासात भर पडेल, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. 

पुणे-नाशिक महामार्गावरील नाशिकफाटा येथील सेंट्रल इन्सिस्टयुट आॅफ रोड ट्रान्सपोर्ट (सीआयआरटी) येथे केंद्रीय रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाच्या वतीने आयोजित केलेल्या ‘इथेनॉल : वाहतुकीसाठी इंधन’ या विषयावरील राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर केंद्रीय पेट्रोलियममंत्री धमेंद्र प्रधान, आयएफजीईच्या अध्यक्ष विद्या मुरकुंडी, आयएफजीईचे उपाध्यक्ष अण्णासाहेब एम के पाटील, ट्रान्सपोर्ट विभागाचे सह सचिव अभय दामले, राज्य मंत्री सुभाष देशमुख, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, अनिल शिरोळे, अमर साबळे, महापौर नितीन काळजे, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, उद्योगपती अभय फिरोदीया, सीआयआरटीचे प्रमुख राजेंद्र सनेर पाटील, प्रमोद चौधरी, विजयसिंह मोहितेपाटील, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे आदी उपस्थित होते.  

यावेळी गडकरी म्हणाले की, 'शेती व्यवसायाची अवस्था गंभीर होत आहे. हमी भाव मिळेलच. परंतु, अशा परिस्थितीत या व्यवसायाला आणि ग्रामीण अर्थकारणाला गती देण्यासाठी हरीत उर्जा आणि हरीत इंधनाला सरकारने प्रोत्साहन देण्याचे निश्चित केले आहे. देश 7 लाख कोटी रूपयांचे क्रुड आॅईल आयात करते. त्यामुळे भविष्यात पर्यायी इंधन निर्मिती करण्याचे आव्हान आपल्या समोर आहे. इंधन आयात करताना खर्च वाढतो. तसेच प्रदूषणाचेही प्रमाण वाढते. त्यामुळे प्रदूषण मुक्त, पर्यायी आणि वाजवी स्वरूपात इंधन निर्मिती होईल यासाठी मिथेनॉल इथेनॉलचा वापर करणे गरजेचे आहे. पर्यायी इंधन निर्मितीस प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. रोजगार निर्मितीबरोबरच शेतकरी कल्याणाचा भाव या नव्या धोरणामध्ये आहे. परदेशात इंथेनॉलचा वापर पर्यायी इंधन म्हणून केला जात आहे. पुणे-मुंबई, दिल्ली अशा विविध भागातही इंथेनॉल निर्मिती अधिक प्रमाणावर होऊ शकते. साखर कारखान्यांचे प्रमाण अधिक असल्याने इंथेनॉल निर्मिती वाढविण्याची गरज आहे. त्यास चांगला भाव देण्याची हमी सरकारकडून आम्ही देऊ.’’  

 '17 वर्षे दुर्लक्ष'

अण्णासाहेब पाटील म्हणाले, पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कालखंडात इंथेनॉल या इंधन वापरास प्रोत्साहन दिले. सुरूवातीला पेट्रालमध्ये पाच टक्के  इंथेनॉल मिक्सिंगला परवानगी दिली. पुढील काळात त्याकडे फारशे लक्ष दिले गेले नाही. इथेनॉल गेली १७ वर्षे या इंधनाला प्रोत्साहन दिलेले नाही. भाजपाचे सरकार आल्यानंतर पेट्रोलमध्ये वीस टक्क्यांपर्यंत इथेनॉल मिक्सिगचे धोरण स्वीकारले आहे.  त्यामुळे इंथेनॉलची निर्मिती वाढविणे गरजेचे आहे.   

नितीन गडकरी यांच्या भाषणातील मुद्दे  

१) राज्यात 500 साखर कारखाने आहेत. इथेनॉल या पर्यायी इंधनाने शेती व्यवसाय वाढेल, गावांकडून शहरांकडे होणारे स्थलांतर थांबेल. एक हजार उद्योग वाढतील, 50 लाख लोकांना रोजगार मिळेल.

२) ‘सेंकड जनरेशन इथेनॉल पॉलिसी’ राबविण्याची गरज. बायो इथेनॉल निर्मितीचे धोरण निश्चित करण्याची गरज आहे. कॉर्टन स्ट्रॉ, भाताची काडे, उसाचा बगॅस, शहरातील कच-यातूनही इंधन निर्मिती, बाबू यातून वीज, उर्जा निर्मिती होऊ शकते. पेट्रोलियम मंत्रालयाने पुढाकार घ्यावा.

३) बांबू या गवतातून आचार, फर्निचर, शर्ट बनविले जाऊ शकतात. त्यामुळे बांबू निर्मितीला प्रोत्साहन दिले जात आहे. त्यातून उसाचा भाव मिळाला तरी त्यातून शेती व्यवसायात भर पडेल. 

४) इथेनॉल खरेदी करार, धोरण हे दहा वर्षांसाठी असेल. त्यामुळे निर्मितीत वाढ होईल. पर्यायी इंधनातून रोगार निर्मिती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेस बळकटी मिळेल. स्मार्ट गावांची निर्मिती होईल.

५) इथेनॉलवरील वाहनांना परवागनी दिली असली तरी ही वाहने रस्त्यावर आणण्यासाठी ट्रान्सपोर्ट विभागाने संबंधित वाहने आणि वाहतूक विषयक नियमावली तातडीने तयार करावी. 

टॅग्स :Nitin Gadakriनितिन गडकरीFarmerशेतकरी