शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

पत अन् प्रतिष्ठेसाठी गावचे कारभारी बदलाचा मुळशी पॅटर्न 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2019 14:44 IST

गावागावांत, वाड्या वस्त्यांवरील ग्रामस्थांच्या हातात मुबलक पैसा खेळू लागला. ‘पत आणिप्रतिष्ठा’ याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.

ठळक मुद्देपाच वर्षांत महत्त्वाची पदे ठराविक कालावधीसाठी वाटून घेण्याची नवीन पद्धत रूढ

- रोहिदास धुमाळ-  हिंजवडी : मुळशी तालुक्यातील वाढत्या औद्योगिकीकरणामुळे ग्रामीण भागाचा झपाट्याने विकास होऊ लागला आहे. यामुळे गावागावांत, वाड्यावस्त्यांवरील ग्रामस्थांच्या हातात मुबलक पैसा खेळू लागला. ‘पत आणि प्रतिष्ठा’ याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. यातूनच निवडणुकांमध्ये वारेमाप खर्च करून साम, दाम, दंड या त्रिसूत्रीचा वर करून निवडून यायचे. त्यानंतर वाद होण्याऐवजी ग्रामपंचायतीच्या जास्तीत जास्त सदस्यांना सरपंच व उपसरपंच होण्याची संधी देण्याचा नवा मुळशी पॅटर्न सुरू झाला आहे.  सध्या मुळशी परिसरातील राजकीय परिस्थितीत काहीसा बदल होऊ लागला आहे. लोकप्रतिनिधींनी एक पाऊल पुढे टाकत आपापसातील वाद मिटविण्यासाठी नवीन पॅटर्न सुरू केला आहे. विनाकारण वाद नकोत म्हणून निवडून आलेले आपले सदस्य खूश राहण्यासाठी पाच वर्षांत महत्त्वाची पदे ठराविक कालावधीसाठी वाटून घेण्याची नवीन पद्धत रूढ केली आहे. मात्र दर चार, सहा महिन्यांनी ग्रामपंचायतीमधील कारभारी बदलत असल्याने याचा थेट फटका गावातील मूलभूत सोयी सुविधांचे व्यवस्थापन व नियोजनबद्ध विकासकामांवर पडत आहे. अधिकार आणि निर्णय प्रक्रियेचे विकेंद्रीकरण होण्यासाठी देशभरातील स्थानिक स्वराज्य संस्था अगदी ग्रामपंचायतपर्यंत विशेष अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे समाजातील सर्व घटकांचा सर्वांगीण विकास जलद गतीने होण्यासाठी सरपंच पाच वर्षांसाठी निवडला जात आहे. सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामविकास अधिकारी यांनी एकत्रितपणे आपल्या अधिकाराचा योग्य वापर करून गावाच्या नियोजनबद्ध विकासासाठी जलदगतीने निर्णय घ्यायचे असतात. मात्र, मुळशी तालुक्यात पत अन् प्रतिष्ठा सर्वांना मिळण्यासाठी सरपंच, उपसरपंचांना आपले अधिकार आणि कर्तव्य याची पूर्ण माहिती होते ना होते तोच कारभारी बदलला जात आहे.वकास प्रक्रियेला अडथळाग्रामपंचायतीचे कारभारी सतत बदलत असल्याने निर्णय प्रक्रियाही बदलत आहे. त्यामुळे विकासकामांना खीळ बसत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळत आहे. गावाच्या नियोजनबद्ध विकासापेक्षा महत्त्वाची पदे ठराविक कालावधीसाठी आपआपसात वाटून घेत आहेत. महत्त्वाच्या पदावरील व्यक्ती ठराविक दिवसांनी सतत बदलत असल्याने पंचायत निर्णय प्रक्रियेत अडथळे निर्माण होतात. यामुळे कामाचा अप्रत्यक्ष ताण स्थानिक प्रशासनावर पडतो.........शासन निर्णयानुसार आता, सरपंच हा थेट जनतेतून निवडला जाणार आहे़ त्यामुळे अशा प्रकाराला चपराक बसेल. मात्र उपसरपंच वारंवार बदलला जात असल्याने ग्रामपंचायतीच्या नियोजनबद्ध विकासकामात अडचणी निर्माण होतात. विकास कामाला खिळ बसते. - संदीप कोहिनकर,उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत विभाग,जि. प. पुणे. 

टॅग्स :hinjawadiहिंजवडीPoliticsराजकारणCrime Newsगुन्हेगारीMONEYपैसा