शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

पत अन् प्रतिष्ठेसाठी गावचे कारभारी बदलाचा मुळशी पॅटर्न 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2019 14:44 IST

गावागावांत, वाड्या वस्त्यांवरील ग्रामस्थांच्या हातात मुबलक पैसा खेळू लागला. ‘पत आणिप्रतिष्ठा’ याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.

ठळक मुद्देपाच वर्षांत महत्त्वाची पदे ठराविक कालावधीसाठी वाटून घेण्याची नवीन पद्धत रूढ

- रोहिदास धुमाळ-  हिंजवडी : मुळशी तालुक्यातील वाढत्या औद्योगिकीकरणामुळे ग्रामीण भागाचा झपाट्याने विकास होऊ लागला आहे. यामुळे गावागावांत, वाड्यावस्त्यांवरील ग्रामस्थांच्या हातात मुबलक पैसा खेळू लागला. ‘पत आणि प्रतिष्ठा’ याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. यातूनच निवडणुकांमध्ये वारेमाप खर्च करून साम, दाम, दंड या त्रिसूत्रीचा वर करून निवडून यायचे. त्यानंतर वाद होण्याऐवजी ग्रामपंचायतीच्या जास्तीत जास्त सदस्यांना सरपंच व उपसरपंच होण्याची संधी देण्याचा नवा मुळशी पॅटर्न सुरू झाला आहे.  सध्या मुळशी परिसरातील राजकीय परिस्थितीत काहीसा बदल होऊ लागला आहे. लोकप्रतिनिधींनी एक पाऊल पुढे टाकत आपापसातील वाद मिटविण्यासाठी नवीन पॅटर्न सुरू केला आहे. विनाकारण वाद नकोत म्हणून निवडून आलेले आपले सदस्य खूश राहण्यासाठी पाच वर्षांत महत्त्वाची पदे ठराविक कालावधीसाठी वाटून घेण्याची नवीन पद्धत रूढ केली आहे. मात्र दर चार, सहा महिन्यांनी ग्रामपंचायतीमधील कारभारी बदलत असल्याने याचा थेट फटका गावातील मूलभूत सोयी सुविधांचे व्यवस्थापन व नियोजनबद्ध विकासकामांवर पडत आहे. अधिकार आणि निर्णय प्रक्रियेचे विकेंद्रीकरण होण्यासाठी देशभरातील स्थानिक स्वराज्य संस्था अगदी ग्रामपंचायतपर्यंत विशेष अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे समाजातील सर्व घटकांचा सर्वांगीण विकास जलद गतीने होण्यासाठी सरपंच पाच वर्षांसाठी निवडला जात आहे. सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामविकास अधिकारी यांनी एकत्रितपणे आपल्या अधिकाराचा योग्य वापर करून गावाच्या नियोजनबद्ध विकासासाठी जलदगतीने निर्णय घ्यायचे असतात. मात्र, मुळशी तालुक्यात पत अन् प्रतिष्ठा सर्वांना मिळण्यासाठी सरपंच, उपसरपंचांना आपले अधिकार आणि कर्तव्य याची पूर्ण माहिती होते ना होते तोच कारभारी बदलला जात आहे.वकास प्रक्रियेला अडथळाग्रामपंचायतीचे कारभारी सतत बदलत असल्याने निर्णय प्रक्रियाही बदलत आहे. त्यामुळे विकासकामांना खीळ बसत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळत आहे. गावाच्या नियोजनबद्ध विकासापेक्षा महत्त्वाची पदे ठराविक कालावधीसाठी आपआपसात वाटून घेत आहेत. महत्त्वाच्या पदावरील व्यक्ती ठराविक दिवसांनी सतत बदलत असल्याने पंचायत निर्णय प्रक्रियेत अडथळे निर्माण होतात. यामुळे कामाचा अप्रत्यक्ष ताण स्थानिक प्रशासनावर पडतो.........शासन निर्णयानुसार आता, सरपंच हा थेट जनतेतून निवडला जाणार आहे़ त्यामुळे अशा प्रकाराला चपराक बसेल. मात्र उपसरपंच वारंवार बदलला जात असल्याने ग्रामपंचायतीच्या नियोजनबद्ध विकासकामात अडचणी निर्माण होतात. विकास कामाला खिळ बसते. - संदीप कोहिनकर,उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत विभाग,जि. प. पुणे. 

टॅग्स :hinjawadiहिंजवडीPoliticsराजकारणCrime Newsगुन्हेगारीMONEYपैसा